एक्स्प्लोर
Delhi Pollution: दिल्लीतील प्रदूषणावाढ मृत्यूला कारणीभूत ठरेल, एम्सचे माजी संचालक नेमकं काय म्हणाले?
Delhi Pollution: एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया आणि इतर तज्ज्ञांनी दिल्लीतील प्रदूषण दूर करण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी ती दूर केली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

Delhi Pollution
1/9

दिल्लीमध्ये सातत्याने प्रदूषणामध्ये वाढ होत चालल्याचं पाहायला मिळतंय.
2/9

याच मुद्द्यावर तज्ज्ञांनी देखील मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत म्हटलं की, राजधानी दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे.
3/9

एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, दिल्लीची हवा सातत्याने प्रदूषित होत आहे. आरोग्यावरील नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी, कठोर पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे.
4/9

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, प्रदूषण हा सायलेंट किलर बनला आहे. ते कोणत्याही परिस्थितीत संपवणं आवश्यक आहे.
5/9

वाढत्या प्रदूषणामुळे लोकांच्या हृदयावर, मेंदूवर आणि श्वासाचा त्रास असणाऱ्यांवर वाईट परिणाम होत असल्याचं तज्ञ्जांनी म्हटलं आहे.
6/9

संशोधनात असेही समोर आले आहे की, प्रदूषणात वाढ झाल्यामुळे मुलांना केवळ दम्याचा त्रास होत नाही तर त्यांची बुद्धीही कमी होते. प्रदूषणावर लवकरात लवकर प्रभावी कारवाई न केल्यास समस्या मोठी होऊ शकते.
7/9

दिल्लीतील प्रदूषणाची समस्या लक्षात घेता, AIIMS येथे वायु प्रदूषण आणि आरोग्य - विज्ञान, धोरण, कार्यक्रम आणि समुदाय सहभागावर पुढे जाण्यासाठी कृती या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय चर्चासत्रात आरोग्य तज्ज्ञांनी अनेक प्रभावी उपाय सुचवले आहेत.
8/9

प्रदूषण रोखण्यासाठी एक टास्क फोर्स देखील तयार केला जाऊ शकतो, जो राज्यांमधील प्रदूषणाचे घटक समजून घेईल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलेल.
9/9

सायन्स मॅगझिन लॅन्सेटच्या अहवालानुसार, भारतात एका वर्षात सुमारे 24 लाख लोकांच्या मृत्यूला प्रदूषण जबाबदार आहे. त्यानुसार प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे दररोज साडेसहा हजार लोकांचा मृत्यू होतो.
Published at : 20 Nov 2023 11:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
