पर्यावरण निर्देशांकात भारताचा नंबर तळाशी, तब्बल 180 देश पुढे; आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी
World Investment Index: हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत आणि चीनची कामगिरी अत्यंत खराब आहे.

World Investment Index: हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत आणि चीनची कामगिरी अत्यंत खराब आहे. एका अमेरिकन संस्थेने पर्यावरणीय कामगिरीच्या आधारे 180 देशांची यादी तयार केली असून त्यात भारताला सर्वात खालच्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. येल सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल लॉ अँड पॉलिसी आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी सेंटर फॉर इंटरनॅशनल अर्थ सायन्स इन्फॉर्मेशन नेटवर्क यांनी अलीकडेच प्रकाशित केलेल्या 2022 एन्व्हायर्नमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स (EPI) मध्ये डेन्मार्क अव्वल आहे.
डेन्मार्क नंतर ब्रिटन आणि फिनलँडचा क्रमांक लागतो. अलिकडच्या वर्षांत हरितगृह वायू उत्सर्जनात घट झाल्यामुळे डेन्मार्क, ब्रिटन आणि फिनलंड हे देश आघाडीवर आहेत. अहवालानुसार, अत्यंत धोकादायक हवेच्या गुणवत्तेची पातळी आणि हरितगृह वायूंचे वेगाने वाढणारे उत्सर्जन यामुळे भारत प्रथमच या यादीत तळाशी आला आहे.
अमेरिकेची स्थितीही चांगली नाही
हा अहवाल तयार करताना, 40 कार्यप्रदर्शन निर्देशक वापरले गेले आहेत, जे 11 श्रेणींमध्ये विभागलेले आहेत. हे संकेतक दाखवतात की पर्यावरणासाठी निश्चित केलेल्या धोरणात्मक उद्दिष्टांपासून देश किती दूर आहे. या आधारावर, या निर्देशांकातील हवामान बदल कामगिरी, पर्यावरणीय आरोग्य आणि इकोसिस्टमची कामगिरी या आधारावर 180 देशांची क्रमवारी निश्चित केली जाते.
ताज्या निर्देशांकात 180 देशांपैकी भारताला सर्वात कमी 18.9 गुण मिळाले आहेत. म्यानमार (19.4), व्हिएतनाम (20.1), बांगलादेश (23.1) आणि पाकिस्तान (24.6) हे देखील पर्यावरण धोरण उद्दिष्टे साध्य करण्याच्या बाबतीत खराब कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये आहेत. हे रँकिंग सूचित करते की या देशांनी पर्यावरणीय स्थिरतेपेक्षा आर्थिक वाढीला अधिक महत्त्व दिले आहे. या निर्देशांकात चीन 28.4 गुण मिळवून 161 व्या क्रमांकावर आहे. पश्चिमेकडील 22 सर्वात श्रीमंत लोकशाही देशांमध्ये अमेरिका 22 व्या क्रमांकावर आहे, तर संपूर्ण यादीत 42 व्या क्रमांकावर आहे. ईपीआयच्या अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाच्या काळात पर्यावरण रक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अमेरिकेचे मानांकन खाली आले आहे. या यादीत रशिया 112व्या स्थानावर आहे.
2050 साठी अंदाज काय आहेत
या अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की 2050 सालापर्यंत चीन हा जगातील सर्वात मोठा हरितगृह वायू सोडणारा देश असेल, तर भारत या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असेल. या देशांनी अलीकडेच प्रदूषण कमी करण्याचे आश्वासन दिले आहे, असे असूनही, अंदाजानुसार भविष्यातील परिस्थिती चिंताजनक दिसते.
डेन्मार्क आणि ब्रिटनसारखे काही देश आहेत जे 2050 पर्यंत ग्रीनहाऊस गॅस तटस्थतेपर्यंत पोहोचू शकतात, तर चीन, भारत आणि रशियासारखे महत्त्वाचे देश उलट दिशेने जात आहेत. म्हणजेच येथे हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढत आहे. EPI अंदाजानुसार, जर हरितगृह वायू उत्सर्जनाचा सध्याचा कल असाच चालू राहिला तर 50 टक्क्यांहून अधिक वायू केवळ चार देश, चीन, भारत, अमेरिका आणि रशियामधून येतील.
भारताने व्यक्त केली नाराजी
भारत पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकात 180 देशांपैकी 180 व्या स्थानावर पोहोचल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, भारतानं याला विरोध केलाय. ज्यात वापरलेली प्रक्रिया अवैज्ञानिक पद्धतीनं केल्याचं भारतानं म्हंटलंय.
Before You Go
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ























