एक्स्प्लोर
महाड दुर्घटनेला आम्ही जबाबदार, 180 दिवसात पूल उभारणार : गडकरी

नवी मुंबई : महाडमध्ये घडलेली दुर्घटना ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, अशी कबुली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नवी मुंबईत एका कार्यक्रमावेळी बोलत होते. महाडमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेला पूल हा येत्या ६ महिन्यात नव्यानं बांधला जाईल, तसंच मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं कामंही येत्या २ वर्षात पूर्ण होईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. यावेळी नितीन गडकरी म्हणाले,"महाडची घटना ही सरकार म्हणून आमची जबाबदारी. मात्र इथे 180 दिवसात नवा पूल बांधणार. त्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे 4 लेनचे काम डिसेंबरपर्यंत वेगाने सुरू होईल. येत्या दोन वर्षात हा मार्ग पूर्ण करणार. यासाठी लोकांनी लवकर जमिनी द्याव्या". आघाडी सरकारने गोंधळ घातला, काम लवकर केले नाही. तसेच जमीन संपादन समस्या असल्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण रखडल्याचं गडकरी म्हणाले. संबंधित बातम्या
महाड दुर्घटना : आतापर्यंत सापडलेले मृतदेह आणि त्यांची नावं
सावित्रीच्या वेगवान प्रवाहात जवानांची बोट उलटली
औरंगाबादमध्येही NDRF चं बचावकार्य, पुरात अडकलेल्यांना वाचवलं
महाड पूल दुर्घटना : दिवसभरात काय काय घडलं?
देवदूत… काळरात्री शेकडों जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!
महाड दुर्घटनेत दोन बहिणींसह कुटुंबातले चौघे बेपत्ता
महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री
महाड दुर्घटनेत दोन बहिणींसह कुटुंबातले चौघे बेपत्ता
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व























