एक्स्प्लोर

Kopari Bridge: ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका, कोपरी रेल्वे पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Thane Kopri Bridge : मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील कोपरी रेल्वे पुलाचं उद्घाटन करण्यात आले.

Thane Kopri Bridge Inauguration : ठाणे-मुंबई शहरांना जोडणाऱ्या कोपरी पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कोपरी पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA अंतर्गत तयार झाला आहे. कोपरी पुलामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात का होईना पण कमी होण्यास मदत होणार आहे. ठाणे, घोडबंदर, भिवंडी, नाशिक, कल्याण -डोंबिवली येथून चाकरमानी आणि प्रवाशी मोठ्या प्रमाणात या कोपरी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. मात्र अपुऱ्या पुलामुळे या पुलाजवळ आणि टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. मात्र हा पूल खुला झाल्यामुळे प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे.

मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने ठाणे शहरातील कोपरी येथे 2+2 पथ मर्गिकेच्या रेल्वे ओलंडणी पुलाचे 4+4 मार्गिका असे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामाकरता प्राधिकरणकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी 784 मीटर तर रुंदी 37.04 मीटर  इतकी आहे. 

पूर्व द्रुतगती महामार्गावर हा 5+5 मार्गिकांचा आहे तर ठाणे शहारातील कोपरी रेल्वे ओलांडणी पुल हा 2+2 मार्गिकांचा होता, या अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे  सकाळ व संध्याकाळच्या कालावधीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. सदर वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. 2+2 पथ मर्गिकेच्या पुलाचे 4+4 असे अपग्रेड केल्यामुळे मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होऊन फायदा पूर्व द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना होणार आहे. 

या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेज पर्यंत महामार्गाखालून वाहानांच्या रहदारीकरीता 2+2 मार्गिकांचा 40 मीटर लांब आणि 21.2 मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्टेशनला जोडणारा वाहनांसाठी भूयारीमार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जलवहिनीची (स्ट्रॉम वॉटर ड्रेनची) सुविधा उपलब्ध करून देणारा बंधिस्त नाल्याचे सुधारीकारण देखील करण्यात आले आहे. 

"कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जुना पूल हा अरुंद असल्यामुळे व्यस्त तासांत (पीक अवर्स) मध्ये वाहनचालकांना काही मीटरचा प्रवास करण्यासाठी 30 ते 40 मिनिटे लागतात. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा आता हा वेळ वाचणार आहे. त्यासोबतच तीन हात नाका परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे" असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त  श्रीनिवास म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thane-Borivali Twin Tunnel Project: नॅशनल पार्कच्या खालून तीन लेन रस्ता; 90 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत होणार; कसा आहे ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प?
नॅशनल पार्कच्या खालून तीन लेन रस्ता; 90 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत होणार; कसा आहे ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प?
Devendra Fadnavis and Pratap Sarnaik: मिरा-भाईंदरच्या 30 टक्के जमिनी नरेंद्र मेहतांच्या, मला 10 टक्के द्यायला तयार, सरनाईकांच्या वाक्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळं रेकॉर्ड होतंय बरं का'
मिरा-भाईंदरच्या 30 टक्के जमिनी नरेंद्र मेहतांच्या, मला 10 टक्के द्यायला तयार, सरनाईकांच्या वाक्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळं रेकॉर्ड होतंय बरं का'
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
Thane Crime News: ठाण्यात संतापजनक घटना, अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीसोबत कन्स्ट्रक्शन साईटवर नको ते कृत्य, नराधमाला बेड्या
ठाण्यात संतापजनक घटना, अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीसोबत कन्स्ट्रक्शन साईटवर नको ते कृत्य, नराधमाला बेड्या

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
Beed : नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Solapur Anjangaon Laxman Hake: अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
Embed widget