एक्स्प्लोर

5G Service : Airtel की Jio? कोणतं नेटवर्क सर्वात स्वस्त? काय असेल फरक?

Airtel vs Jio 5G Network : एअरटेल 5G आणि जिओ 5G यांच्यात नेटवर्कमध्ये काय फरक असेल. कोणाचं नेटवर्क स्वस्त असेल? येथे जाणून घ्या.

5G Internet : भारतात नुकतीच 5G इंटरनेट सेवा (5G Service) सुरु करण्यात आली आहे. या हायस्पीड 5G इंटरनेटमुळे (5G Internet) येत्या काळात अमुलाग्र बदल होणार आहेत. 5G इंटरनेटमुळे आता शिक्षण, आरोग्य, कृषी आणि बँकिंगसह अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे बदल घडून येतील. याचा परिणा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. भारताआधी अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्रिटन, जपान, चीन आणि युरोपमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. 

5G इंटरनेट सेवा 4G पेक्षा दहापट वेगवान इंटरनेट स्पीड देईल. दिवाळीपर्यंत ग्राहकांना 5G इंटरनेट सर्विस वापरता येईल. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्या सर्वात आधी 5G इंटरनेट सेवा पुरवणार आहेत. सुरुवातील 13 शहरांमध्ये सुरु होणारं हे 5G इंटरनेटचं जाळं पुढील वर्षापर्यंत देशभरात पसरेल. जिओने सर्वात स्वस्त 5G इंटरनेट देण्याचा दावा केलाय. त्यामुळे आता यांच्या किमती काय असतील, हे येत्या काळात समोर येईल. 

भारतीय टेलिकॉम ग्राहकांना येत्या काही महिन्यांत 5G सेवा मिळेल. भारतातील 5G सेवा पहिल्या टप्प्यात केवळ निवडक शहरांमध्ये आणली गेली आहे. ही सेवा पुढील काही वर्षांमध्ये संपूर्ण देशात पसरेल. रिलायन्स जिओचे मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे की, जिओ सर्वात स्वस्त 5G सेवा देईल. 2023 पर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण देशभरात जिओ 5G सेवा सुरु करण्यात येईल.

5G सिमकार्डबाबत ग्राहकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. एअरटेल कंपनीनं सांगितलंय की, सध्याचे सिम 5G मोबाईलवर काम करेल. कारण तुमच्या सध्याच्या एअरटेल 5G नेटवर्कमध्ये अपग्रेड होण्याचा पर्याय आधीचं देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या जुन्या सिमकार्डवर 5G इंटरनेट काम करेल. पण 5G वापरण्यासाठी ग्राहकांकडे 5G मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. फक्त सिमकार्ड 5G असून चालणार नाही. दरम्यान जिओने सिमकार्डबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. सुस्साट... वेगवान अशा 5G नेटवर्कचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे 5G फोनसह 5G सिमकार्ड असणे आवश्यक आहे.

एअरटेलकडून भारतात 5G सेवा सुरू

देशात 5G इंटरनेट सेवा सुरू करणारी एअरटेल (Airtel) ही पहिली कंपनी आहे. एअरटेलने सध्या दिल्ली, मुंबई, वाराणसी आणि बंगळुरूसह आठ शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू केली आहे. लवकरच संपूण देशामध्ये एअरटेल 5G चं जाळं पसरेल.

रिलायन्स जिओ दिवाळीपर्यंत 5G नेटवर्क आणणार

जिओकडून दिवाळीपर्यंत देशातील निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे. जिओ सुरुवातीला दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार मेट्रो शहरांमध्ये 5G सेवा सुरू करेल. जिओ योजना डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशात सेवा सुरु होईल, असे त्याचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे.

व्होडाफोन-आयडिया (Vodafone idea)

व्होडाफोन-आयडिया (VI) टेलिकॉम कंपनीने भारतात 5G सेवा सुरू करण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

5G ची किंमत

जिओने (Jio) 5G सेवांसाठी किंमत जाहीर केलेली नाही. मात्र जिओने खिशाला परवडणारी आणि स्वस्त 5G सेवा देण्याची घोषणा केली आहे. तर एअरटेलकडून सध्याच्या 4G दरातच 5G सेवा उपलब्ध करुन दिली आहे. येत्या काळात 5G साठी नवीन दराची घोषणानंतर केली जाईल.

200 शहरांमध्ये लवकरच 5G इंटरनेट सुरु होईल

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देत सांगितलं आहे की, सरकार येत्या सहा महिन्यांत 200 शहरांमध्ये 5G इंटरनेट सुरू करण्यासाठी काम करत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget