एक्स्प्लोर

संपूर्ण भारतात 5G साठी 2021 पर्यंत वाट पाहावी लागणार

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2 जी, 3 जी आणि आता 4 जीची चलती आहे. मात्र, आता याही पुढे जात 5 जी येत आहे. या संदर्भात रिलायन्सकडून एक महत्वाची घोषणा इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये केली आहे. 5 जी टेक्नॉलॉजी भारतातील काही महत्वाच्या भागात 2019-20 पर्यंत उपलब्ध होऊ शकेल तर जिओकडून 2021 पर्यंत सर्वांना परवडेल अशी 5 जी सुविधा भारतातील सर्व शहरात सुरु केली जाईल, असे रिलायन्सचे जिओचे प्रमुख मॅथ्यू ऊम्मन यांनी सांगितले आहे.

मुंबई: भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2 जी, 3 जी आणि आता 4 जीची चलती आहे. मात्र, आता याही पुढे जात 5 जी येत आहे. या संदर्भात रिलायन्सकडून एक महत्वाची घोषणा इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये केली आहे. 5 जी टेक्नॉलॉजी भारतातील काही महत्वाच्या भागात 2019-20 पर्यंत उपलब्ध होऊ शकेल तर जिओकडून 2021 पर्यंत सर्वांना परवडेल अशी 5 जी सुविधा भारतातील सर्व शहरात सुरु केली जाईल, असे रिलायन्सचे जिओचे प्रमुख मॅथ्यू ऊम्मन यांनी सांगितले आहे.
भारतात जवळपास 40 कोटी लोक फिचर फोन वापरतात आणि ह्या लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर 5 जीचे  दर वाढवले जाऊ शकत नाहीत, असेही मॅथ्यू यांनी सांगितले. 5 जी आल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार असून त्यासाठी आवश्यक संसाधनांची निर्मिती आपल्याला पहिल्यांदा करावी लागेल, असेही ते म्हणाले. आपल्याकडे आजही 5 जी वापरासाठीच डिव्हाईस उपलब्ध नाहीत. हे डिव्हाईस 2019 पर्यंत येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. सामान्यांना परवडेल अशा दरात ही सेवा 2021 पर्यंत संपूर्ण भारतात सुरु होईल असे त्यांनी सांगितले. आपण उत्पादनावर आधारित अर्थव्यवस्थेत जगत नसून गिगाबाईटवर आधारित अर्थव्यवस्थेत जगतोय, आपण डिजिटल क्षेत्राचा कायापालट करण्याची सुरुवात केली आहे. ज्याची सुरुवात अल्ट्रा ब्रॉडबँडने झाली आहे. आपण डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग अशा क्षेत्रात गुतंवणूक करायला हवी ज्याने कायापालट लवकरात लवकर होईल, असेही त्यांनी नमूद केले. 5जी टेकनोलोजी ही भारतात साधारण 2019-20 पर्यंत उपलद्ध होईल आणि जिओ 2021 पर्यंत सर्वाना परवडेल अशी  5जी सुविधा भारतातील सर्व शहरात सुरु करेल. 2019 मध्ये आर्थिक गणित काय असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे, कारण 2020-21 च्या शेवटी टेक्नॉलॉजीद्वारे होणारा विकास महत्वाचा असणार आहे. सध्या उपलब्ध मालमत्तांचा फायदा घेऊन क्षमता आणि अनुभव वाढवण्यावर भर दिला गेला पाहिजे हेही ऊम्मन यांनी नमूद केले. जिओला 5 जीच्या चाचणी साठी 28 गिगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मिळाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. स्वीडिश टेलिकॉम गिअर ने बनविलेल्या एरिक्सन कंपनीकडून जिओने चालक विरहित वाहन चालवायचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविले. आम्ही भारतात केलेल्या अभ्यासावरून 2016 पर्यंत 5 जी द्वारे 27 बिलियन अमेरिकी डॉलर इतका बिझनेस मिळवून देऊ, असे यावेळी मिर्तीलो यांनी यावेळी सांगितले.
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2G, 3G आणि आता 4G ची चलती आहे. मात्र, आता याही पुढे जात 5जी येत आहे. स्वीडनमधील एरिक्सन कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. भारतात एकीकडे सुपरफास्ट स्पीड आणि व्हॉईस-व्हिडीओच्या आकर्षक सुविधा देण्यासाठी 4G चा प्रसार केला जात आहे. रिलायन्स जिओने तर 4 G च्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. तर दुसरीकडे 5जी तंत्रज्ञानही भारतात पाऊल टाकण्यासाठी तयार झाले आहे.  स्वीडनस्थित एरिक्सन या टेलिकॉम उपकरणं बनवणाऱ्या कंपनीने भारतात 5 G तंत्रज्ञान आणण्यासाठी आयआयटी दिल्लीसोबत हातमिळवणी केली आहे. एरिक्सन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, "एरिक्सन आणि आयआयटी दिल्लीने भारतात 5 G तंत्रज्ञान आणण्यासाठी करार केला आहे." या करारानुसार एरिक्सन 5 G तंत्रज्ञानासाठी सुरुवातील एक परीक्षण केंद्र स्थापन करणार आहे. त्याचसोबत आयआयटी दिल्लीत एक सेंटरही सुरु केले जाणार आहे, ज्या माध्यमातून देशात 5 G तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.  2020 पर्यंत 5 G तंत्रज्ञान व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!

व्हिडीओ

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Sugercane : साखर हंगामासाठी घाई का? Special Report
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
Embed widget