एक्स्प्लोर

Sujat Ambedkar : बोहल्यावर कधी चढणार? सुजात आंबेडकरांनी दिले सूचक उत्तर 

Sujat Ambedkar : भिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या पत्नी अंजली आंबेडकरही उपस्थित होत्या.

Sujat Ambedkar : राजकारणातील युवा नेत्यांच्या लाईफ स्टाईलची महाराष्ट्रात नेहमी चर्चा असते. तेवढीचं चर्चा ते लग्न कधी उरकणार यावरही होत असते. यापूर्वी शिवसेना नेते (उ.बा.ठा) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या लग्नाबाबतच्या चर्चा रंगत होत्या. सध्या वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या पत्नी अंजली आंबेडकरही उपस्थित होत्या. यावेळी सुजात आंबेडकर यांनी त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केले आहे. 

 काय म्हणाले सुजात आंबेडकर?

वर्ष 2024 मध्ये सुजातसाठी 'यंदा कर्तव्य आहे' का? असा प्रश्न या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता.  या प्रश्नाला सुजात यांनी सूचक उत्तर दिले आहे. सुजात आंबेडकर म्हणाले, " माझ्यासमोर पहिलं कर्तव्य अकोला लोकसभेचं आहे. 
माझ्या प्रत्येक प्रश्नाचं न थकता आतापर्यंत आई-बाबांनी उत्तरं दिलीत. त्यामुळेच मी घडू शकलो." सुजात आंबेडकरांनी लग्नापेक्षा लोकसभा निवडणुकीला महत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रकाश आंबेडकरांशी विवाह झाल्यामुळे आंबेडकरी चळवळीचा भाग होता आले : अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar)

प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या मुलाखती दरम्यान, त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनीही अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अंजली आबेडकर (Anjali Ambedkar) या वेळी बोलताना म्हणाल्या, आमच्या लग्नामुळे मला आंबेडकरी चळवळीचा भाग होता आले याचे समाधान आहे. शिवाय, मी त्यामुळेच आनंदी असते. 'वंचित'ला सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री कोण बनेल? असा सवाल अंजली आंबेडकरांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अंजली आंबेडकर म्हणाल्या, "ज्या दिवशी वंचित घटकातील महिला मुख्यमंत्री बनेल तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस असेल" कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर आम्हाला सुरक्षेबाबत चिंता वाटायची. आपण सुरक्षा घ्यावी, असा प्रस्ताव आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर ठेवला होता. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी हा प्रस्ताव फेटाळला होता, असे अंजली आंबेडकर म्हणाल्या आहेत. 

 राज्यसभेच्या कार्पेटचा रंग लाल असल्याने त्याला लाल बावटा म्हणायचो : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)

अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांना अकोल्यात दिलेल्या मुलाखतीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.  "मी जेव्हा संसदेमध्ये पाऊल ठेवणार होतो, तेव्हा चालत गेलो होतो. तेव्हा संसदेची एक वेगळी सुरक्षा व्यवस्था होती. तिथे गेल्यानंतर सुरक्षारक्षकांनी स्वागत केले. त्यामुळे मी अवाक् झालो होतो. राज्यसभेच्या कार्पेटचा रंग लाल होता, त्यामुळे मी त्याला लाल बावटा म्हणायचो. लोकसभेचा रंग हा हिरवा असल्याने तिथे जातांना ते नैसर्गिक अधिवासात आल्यासारखं वाटलं", असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला. 

काही गोष्टी सिक्रेट राहिल्या तर चांगल्या : प्रकाश आंबेडकर  (Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकरांचा विवाह कसा झाला? याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रकाश आंबेडकरांनी टाळले आहे. काही गोष्टी सिक्रेट राहिल्या तर चांगल्या असतात, असे उत्तर आंबेडकरांनी दिले. तर अंजली आंबेडकरांनी या प्रश्नाचे दिलखुलासपणे उत्तर दिले आहे. अंजली आंबेडकर याबाबत बोलताना म्हणाल्या, आमचा विवाह म्हणजे काही मित्रांनी जमवून दिलेला प्रेमविवाह आहे. आमची पहिली भेट भारिपच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात झाली. तेव्हाही बाळासाहेब प्रसिद्ध होते. आम्ही अनेकदा ट्रेनमध्ये प्रवास करत भेटत होतो. त्या काळात मी जळगावमध्ये नोकरी करत होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

Sharad Pawar Meet Bachchu Kadu : शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात झाली भेट; नेमकी काय झाली चर्चा ?

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई, डिझेल मिळवण्याच्या कारणावरुन ग्राहकांची तुंबळ हाणामारी 
वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई, डिझेल मिळवण्याच्या कारणावरुन ग्राहकांची तुंबळ हाणामारी 
KKR vs GT LIVE score IPL 2026 : कोलकात्याच्या 'नाईट्स' समोर टायटन्स सपशेल लोटांगण; केकेआरने गुजरातला चारली पराभवाची धूळ
KKR vs GT LIVE Update : कोलकात्याच्या 'नाईट्स' समोर टायटन्स सपशेल लोटांगण; केकेआरने गुजरातला चारली पराभवाची धूळ
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Sadabhau Khot : गोपीचंद पडळकर म्हणजे आजच्या काळातले सरसेनापती मल्हारराव होळकर : सदाभाऊ खोत
गोपीचंद पडळकर म्हणजे आजच्या काळातले सरसेनापती मल्हारराव होळकर : सदाभाऊ खोत

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
Embed widget