एक्स्प्लोर

Pandharpur : सुमारे 700 वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर पुन्हा अवतरणार, 73 कोटी विकास आराखड्याचे टेंडर फायनल

Pandharpur Vitthal Mandir : मुंबईतील सावनी हेरिटेज अँड कॉन्सर्व्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या विकास आराखड्याचं काम देण्यात आलं आहे. 

सोलापूर: ज्ञानोबा, तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर (Pandharpur Vitthal Mandir) कसे असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागलेली आहे. आता या 73 कोटींच्या विकास आराखड्याच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या टेंडर प्रक्रियेत मुंबई येथील विठ्ठल मंदिराच्या 73 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम सावनी हेरिटेज अँड कॉन्सर्व्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळालं आहे. 

पहिल्या टप्प्यातील 26 कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात कार्तिकी यात्रेनंतर होण्याचे संकेत मंदिर प्रशासनाने दिले आहेत.  पुरातत्व विभागाने दिलेल्या निविदेत आता ठेकेदार निश्चित झाल्याने पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती कामे करायची यासाठी पुरातत्व विभाग, मंदिर समिती आणि ठेकेदार यांची एक बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर या कामाला सुरुवात होईल असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 

मंदिरातील 700 वर्षांपूर्वीचे मूळ रूप पुन्हा दिसणार

नामदेव महाद्वार, दर्शन व्यवस्था, महालक्ष्मी मंदिरावरील स्लॅब, शनी मंदिराजवळील काम आणि मंदिरातील दगडी फ्लोरिंग या कामाला पहिल्या टप्प्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात लावलेले ग्रॅनाईट आणि मार्बल हटवून पूर्वीच्या मूळ दगडी भिंती पुन्हा भाविकांना पाहता येणार आहेत. याशिवाय संपूर्ण मंदिराचे फ्लोरिंग हे मूळ दगडी केले जाणार आहे.  

संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या काळात ज्या पद्धतीने विठ्ठल मंदिराचे स्वरूप होते त्याच पद्धतीने आता भाविकांना पाहायला मिळणार आहे. देशातील पुरातन मंदिराप्रमाणे विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप मिळणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत असून यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाने हा विकास आराखडा तयार केल्याचे औसेकर यांनी सांगितले. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आराखड्याची विशेष परिश्रम घेतल्याने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली 73 कोटी 80 लाख रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. तोच आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू करण्यास निधीची तरतूद केल्याने आता विठ्ठलभक्ताना विठ्ठल मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे रूप येत्या काळात पाहायला मिळणार आहे. 
       
विठुरायाच्या बाबतीत 'नाही घडविला, नाही बैसविला' ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे.  विठ्ठल मंदिर हे 11 व्या शतकातील असल्याचे अभ्यासक मनात असले तरी त्याहीपूर्वीपासून विठुरायाचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. आता पुन्हा 700 वर्षापूर्वीचे मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा  पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार बनविण्यात आला आहे. या आराखड्याचे पाच टप्प्यात कामे केली जाणार असून यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथे दगडांची झीज झाली आहे अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केले जाणार आहे. याशिवाय मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचे काम केले जाणार आहे.
 
तिसऱ्या टप्प्यात नव्या पद्धतीने बांधलेले नामदेव महाद्वाराच्या आरसीसी काम पाडून तेथे मूळ मंदिराला शोभेल अशा पुरातन दगडात महाद्वार बनविले जाणार आहे. याशिवाय मंदिरावरून जाणारी दर्शन रांग काढून मंदिराशेजारी एक स्काय वॉक  बनविला जाणार आहे. अखेरच्या टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा , वायरिंग आणि वातानुकूलित यंत्रणा याचे काम केले जाणार आहे.  एका बाजूला विठ्ठल मंदिराचा विकास आराखडा राबविण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले असले तरी लाखो विठ्ठल भक्तांची मागणी असलेल्या निवाऱ्यातील दर्शन व्यवस्थेबाबत शासन आणि मंदिर समिती काहीच करीत नसल्याने भाविकांच्या माथी तासंतास मरणप्राय वेदना सोसत दर्शन रांगेतील दर्शन घेणेच नशिबी असणार आहे. 

ही बातमी वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 
अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget