शिरोळे गावाची 450 वर्षांची अनोखी 'गावपळण' परंपरा , देवाने कौल दिल्यानंतर अख्खं गाव आठवडाभर राहते वेशीबाहेर
दरवर्षी पौष महिन्याच्या सुरुवातीला शिराळे गावची गावपळण होते. गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वराने कौल दिल्यानंतर शिराळेवासियांनी गाव सोडले आहे
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg) वैभववाडी (VaibhavWadi) तालुक्यातील शिराळे गावची सुमारे 450 वर्षाची परंपरा असलेली गावपळण सुरू झाली आहे. शिराळेवासियांनी गुरे-ढोरे, कोंबडी, कुत्र्यांसह नजीकच्या सडुरे गावच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या राहुट्यामध्ये आपला संसार थाटला आहे. अख्ख गाव रिकामे झालं असून वेशीबाहेर गेलं आहे. गेले तीन चार दिवस जिल्हयात कडाक्याची थंडी पडत असून देखील गावापळण सुरू झाली आहे. देवीचा कौल होईपर्यंत पुढचे काही दिवस ग्रामस्थ गावाबाहेर वास्तव्य करणार आहेत.
सह्याद्रीच्या कुशित वसलेले शिराळे हे सुमारे 80 कुटुंबे असून 350 लोकसंख्या असलेले हे गाव आहे. दरवर्षी पौष महिन्याच्या सुरुवातीला शिराळे गावची गावपळण होते. गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वराने कौल दिल्यानंतर शिराळेवासियांनी गाव सोडले आहे. सडुरे गावच्या हद्दीत माळरानावर 40 राहुट्या उभारुन या राहुट्यांमध्ये संसार थाटला आहे.
देवाने हुकुम दिल्यानंतर पाच किंवा सात दिवासाने गावात परतणार
गावपळणी दरम्यान गावची प्राथमिक शाळाही राहुट्यानजीक असलेल्या आंब्याच्या झाडाखाली भरविली जाते. एस.टी. बस थांबाही तिथेच होतो. गावपळणी दरम्यान लगतच असलेल्या शुकनदी पात्रातील झ-यातील पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात. तीन दिवसानंतर परत ग्रामदैवताला कौल लावून गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो. देवाने हुकुम दिल्यानंतर पाच किंवा सात दिवासाने परत गावात जातात. गावपळणीचा आनंद घेण्यासाठी चाकरमानीही गावात दाखल झाले आहेत. गेले तीन चार दिवस तालुक्यात कडाक्याची थंडी पडत आहे. या कडाक्याच्या थंडीतही गावपळणीत गावातील अबालवृध्द मोठ्या श्रध्देने सहभागी झाले आहेत.
पुढील दोन दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा किमान तापमानात घट होणार
पुढील दोन दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात घट होणार आहे. पुण्यात आज 9.7 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे वर्षातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील किमान तापमान 15.2 सेल्सिअसवर, कुलाब्यात 18.5 अंश सेल्सिअसची नोंद. रत्नागिरीत तापमान 16.1 अंश सेल्सिअस तर डहाणूत तापमान 15.1 अंशांवर गेले आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकोट्या पेटविल्या जात आहे. थंडीसोबत धुक्याचे प्रमाणही वाढलेय. पुणे जिल्ह्यात कडाक्याची थंडीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे शहराच्या तापमान सातत्याने घट होत आहे. पुण्यातील अनेक ठिकाणावरील तापमान 10 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आले आहे.
हे ही वाचा :