एक्स्प्लोर

मजुरांच्या गावी परत जाण्याने बांधकाम व्यवसायाला फटका बसण्याची व्यावसायिकांना भीती

कंटेनमेंट क्षेत्राच्या बाहेरील बांधकाम प्रकल्पांचं काम सुरु करायला काही अटी आणि शर्ती घालून सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, मजुरांपासून अनेक अडचणींचा सामना व्यावसायिकांना करावा लागत आहे.

पुणे : कंटेनमेंट क्षेत्राच्या बाहेरील बांधकाम प्रकल्पांचं काम सुरु करायला काही अटी आणि शर्ती घालून सरकारने परवानगी दिली. पण हे सुरु होताना अनेक अडचणी येत आहेत. बांधकाम व्यावसायिकांच्या नेमक्या अडचणी समजून घेण्यासाठी बांधकाम व्यानसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका भागातल्या बांधकाम व्यावसायिकांसोबतच पीएमआरडीए भागातील व्यावसायिकांनी सहभाग घेतला. एकूण 216 व्यावसायिकांनी यात सहभाग घेतला.

या सर्व्हेक्षणामधून विविध मुद्दे पुढे आले. पण क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने सगळ्यात जास्त चिंता व्यक्त केली गेली ती मजूर परत गावी जाण्याची. ज्या व्यावसायिकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला त्यांच्याकडे आजच्या घडीला बांधकाम प्रकल्पावर उपलब्ध मजूर (जे साईटवर राहत आहेत) संख्या ही 45 हजार 700 इतकी आहे. तर सर्वेक्षणानुसार पुणे आणि परिसरातील 46% टक्के मजूर काम नसल्याने गावी परतण्याच्या तयारीत आहे. जर हे मजूर परत आपल्या गावी गेले तर बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसेल असं क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी सांगितलं. सरकारने तातडीची पावले उचलत या सर्व मजुरांना आश्वस्त करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. बांधकाम प्रकाल्पांवर राहणाऱ्या मजुरांना अनेक संस्थांनी मदत केली. पण कित्येक दिवस काम बंद असल्याने मजुरांमध्ये अस्वस्थता असल्याचं मर्चंट यांनी सांगितलं.

यासोबतच बांधकाम साहित्याची उपलब्धता, साहित्य प्रकलपाच्या ठिकाणी पोहोचविण्याकरिता येणाऱ्या अडचणी, स्थापत्य- अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या कर्मचारी वर्गाला प्रकल्प सुरु असलेल्या ठिकाणी पोहोचता न येणे अशा समस्या या सर्वेक्षणातून मांडल्या आहेत.

क्रेडाई पुणे मेट्रोने केलेल्या या सर्व्हेक्षणातील मुद्दे

  • या सर्व्हेक्षणामध्ये पुणे – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबरोबरच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मधील तब्बल 216 विकासकांनी सहभाग घेत त्यांना येणा-या समस्यांविषयी माहिती दिली.
  • या सर्व जणांकडे आजच्या घडीला बांधकाम प्रकल्पावर उपलब्ध मजुरांची संख्या ही तब्बल 45 हजार 700 इतकी आहे.
  • सर्व्हेक्षणानुसार पुणे व परिसरात असलेल्या एकूण मजुरांच्या संख्येपैकी 46% मजूर हे काही काम नसल्यामुळे घरी परतण्याच्या तयारीत आहेत.
  • लॉकडाऊन मधील नियम व अटीमुळे बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी काम करण्यासाठी येणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांपैकी 20% हून कमी कर्मचारी हे प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचू शकले. प्रशासनाकडून मिळालेल्या आदेशासंदर्भात स्पष्टता नसणे, ई पासेस उपलब्ध नसणे व स्थानिक पोलीस प्रशासनाकडून मिळणारी वागणूक ही या मागील काही कारणे आहेत.
  • एकूण विकसकांपैकी 90% विकासकांना आपले प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी साहित्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे.
  • गेल्या काही दिवसांत 10% हून कमी व्यवसायिकांना हे साहित्य उपलब्ध होऊ शकले आहे.
  • निम्म्या बांधकाम व्यवसायिकांच्या (216 विकासकांपैकी 105 ) प्रकल्प साईट्सवर आज 100 हून कमी मजूर उपलब्ध आहेत.
  • तर 3% हून कमी बांधकाम व्यवसायिकांच्या चालू प्रकल्पांवर 1 हजार पेक्षा जास्त मजूर उपलब्ध आहेत.
  • बहुसंख्य विकासक हे स्थानिक प्रशासन व पोलीस यांकडून मिळालेल्या आदेशांमध्ये समन्वय व स्पष्टता नसल्याने गोंधळलेले आहेत.
  • पेट्रोलची उपलब्धता नसल्याने बांधकाम प्रकल्पावरील कर्मचारी, तपासणीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग आणि ठेकेदारांकडून काम करणारे कर्मचारी यांना प्रकल्पाच्या ठिकाणी येणे शक्य होत नाहीये.
  • जिल्हाबंदी असल्याने लॉकडाऊनच्या आधी आपापल्या गावी गेलेले वरिष्ठ अभियंते पुणे, पिंपरी चिंचवड शहरात परत येऊ शकत नाहीयेत.
  • मान्सूनपूर्व कामासाठी ठराविक मजुरांना आणण्यासाठी एक वेळेची परवानगी देण्यात आली नाहीये.
  • ग्रामपंचायती व पोलीस यांकडून बांधकाम मजुरांना आरोग्य तपासणीच्या नावाखाली भीती घालण्यात आहे.
  • आरएमसी प्रकल्प बंद असल्याने अनेक ठिकाणी कॉंक्रिटीकरण करता येणे शक्य नाहीये.
  • आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या वस्तू बांधकाम प्रकल्पावर पोहोचू शकत नसल्याने सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबाजावणी करण्यास अडचणी येत आहेत.
  • बँकांनी पतपुरवठा करणे थांबविले असून यामुळे एक आव्हान उभे राहिले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget