एक्स्प्लोर

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपती होतील, त्यांना हिंदू राष्ट्रामध्ये काही इंटरेस्ट नाही : कुमार केतकर

Kumar Ketkar On Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा वाराणसीमधून पराभव होणार होता, पण त्यांना वाचवण्यात आलं कारण त्यांचा पराभव परवडणारा नव्हता असं ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले. 

पुणे : नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि राष्ट्रपती होतील, त्यांना हिंदू राष्ट्रामध्ये काहीही इंटरेस्ट नाही, फक्त तशी इमेज हवी आहे असं वक्तव्य जेष्ठ पत्रकार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी केलं. आधी मोदी हे गांधी कुटुंबावर टीका करायचे, पण निकाल लागल्यानंतर सगळं बदललं असंही केतकर म्हणाले.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या संसदेतील निवडक भाषणांचे संकलन असलेले "संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा" या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असिम सरोदे यांच्या उपस्थित करण्यात आलं. यावेळी कुमार केतकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

नरेंद्र मोदी 2027 साली राष्ट्रपती होतील

कुमार केतकर म्हणाले की, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांना आता कशी वागणूक मिळतेय ते आपण पाहतोय. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि 2027 साली राष्ट्रपती होतील. मोदी 2032 पर्यंत त्या पदावर राहतील. त्यांना हिंदू राष्ट्रामध्ये जास्त इंटरेस्ट नाही पण त्यांना त्या प्रकारची इमेज हवी आहे.   

काय म्हणाले कुमार केतकर? 

मोदींचा पराभव होणार होता, पण त्यांना वाचवण्यात आलं

मोदी याचा बनारसमधला पराभव होता होता वाचला. पण मला नंतर कळलं की त्यांना निवडून आणण्यात आलं, त्यांचा पराभव परवडणार नव्हता. भाजपला लोकसभेमध्ये फक्त 180 जागा मिळणं शक्य होतं, मात्र त्यांना हे कळल्यानंतर त्यांनी जागा मॅनेज केल्या, पक्ष फोडले. त्यांनी गेम प्लॅन केला होता.

भाजपने निवडणूक आयोगाकडून लगेच मतदान झालेली माहिती मागवली. कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदान झाले आणि निकाल कसा असेल हे सगळं मागवले होते. भाजपने काही संस्था ताब्यात घेण्याचं काम केलं.

पुलवामामध्ये नेमकं काय झालं याची माहिती दिली नाही 

पुलवामामध्ये काय झालं याबद्दल सरकारने काहीच जाहीर केलं नाही, काहीच चेकिंग झाल नाही. मोदींनी याबाबत कुठलाच खुलासा केलेला नाही. तिकडे एवढे आरडीएक्स कुठून आलं? बालाकोट हल्ल्यानंतर अनभुव कळला नाही. मोदी-शाह यांनीपण सागितले नाही. कशाचीच श्वेतपत्रिका काढली नाही. 

निवडणूक निकालाअगोदर केदारनाथला तपस्या करत होते, गेल्या वेळी अशी तपस्या केली आणि जागा वाढल्या. पण यावेळी तसे काही घडलं नाही.

निवडणूक आयोग प्रमुखांनी राजीनामा दिला. अशी लोकशाही कधी देशात नव्हती. याआधी वाजपेयी, इंदिरा गांधी आणि प्रत्येक खासदार प्रश्नांची उत्तरं देत होता.  पण आता असं होताना दिसत नाही.

मोदींनी चहा विकलेलं स्टेशनच अस्तित्वात नाही

आपल्यात पेट्रोल दर वाढले तरी चालतील पण पंतप्रधान मोदी हवेत असं म्हणणारे लोक आहेत. माझीही राज्यसभा खासदार निवड अनपेक्षित होती, माझी निवड राज्यसभेवर झाली. माझी इच्छा नव्हती पण मला माहिती नव्हतं ते झालं.

नरेंद्र मोदी कायम माझ्या शत्रूस्थानी राहिलेले आहेत. मी गुजरातमध्ये पत्रकारिता केली आहे. मला त्यांचे कोणी मित्र, शिक्षक किंवा इतर कोणीही भेटल नाही. चहा विकणारे स्टेशन पण नव्हतं. मोदींनी त्यांच्या अनेक कथा या विज्ञानाच्या पुढे नेल्या. 

राज्यसभेत मोदी खूप कमी यायचे. ते आले की भाजप सदस्य त्यांचे बाके वाजवत स्वागत करायचे. जय श्रीराम घोषणेने त्यांचं स्वागत व्हायचं. पण अशा घोषणा दिलेलं चालत नाही.

राहुल गांधींच्या भाषणानंतर मोदी पाणी प्यायले

मोदींना कधीही खोकला, शिंक असं काहीही आलेलं आपण पाहिलं नाही. ते बायोरोबो आहेत ते. मात्र राहुल गांधी यांच्या भाषणानंतर त्यांना तहान लागली. तब्बल 12 वेळा ते पाणी प्यायले. आता त्यांना लक्षात आलं असेल की आपण बायोरोबो नाही.

निकालानंतर अनेक गोष्टी बदलल्या

मोदी हे गांधी कुटुंबावर टीका करत होते. पण निकाल आल्यावर सगळं बदलले. जागा कमी आल्याने मोदींनी राजीनामा द्यायला हवा होता, त्यांना हव्या तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत. देशातील मध्यमवर्ग मोदींसोबत आहेत. मध्यम वर्गाला अनेक गोष्टी पटलेल्या आहेत. 

मोदींनी भाजपमधील अनेक वरिष्ठांना मार्गदर्शक यादीतच टाकून दिलं आहे. मोदींच्या काळात चर्चा न होता अनेक कायदे संसदेत पास झाले, मोदींनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादीही म्हटलं. 

राज ठाकरे यांचा नामोनिशाण उरला नाही, अजित पवार संपले असं म्हटलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पण वेगवेगळे बोललं जात होते.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
Embed widget