एक्स्प्लोर

'सामना'च्या अग्रलेखातील भाषेबाबत रश्मी वहिनींना पत्र लिहिणार : चंद्रकांत पाटील

वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर 'सामना'च्या अग्रलेखातून भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. 'सामना'च्या अग्रलेखातील भाषेबाबत संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे

पुणे : औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर 'सामना'तून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली त्याबाबत मी 'सामना'च्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. राजकीय भडास काढण्यासाठी भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहे, असं राऊत म्हणाले होते. शिवाय सामनातूनही भाजप नेत्यांवर टीकेचे बाण सोडण्यात आले होते. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "सामनातून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली त्याबाबत मी रश्मी वहिनींना पत्र लिहिणार आहे. तुम्ही 'सामना'च्या संपादिका आहात, म्हणजे हा अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. ही तुमची भाषा असू शकत नाही. मग अग्रलेखात ही भाषा कशी? असा प्रश्न त्यांना विचारणार आहे."

औरंगाबादचं नामांतर हा आमच्यासाठी भावनिक मुद्दा : चंद्रकांत पाटील औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करणं हा आमचा राजकीय मुद्दा नाही, निवडणुकीचा नाही तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला? ते आधी हटवा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नामांतराची सर्वप्रथम मागणी बाळासाहेब ठाकरेंनी केली. तुम्ही गोधड्या वाळवत आहात असं आम्हाला म्हणता तर आता करा नामांतर, असं आव्हानही त्यांनी दिलं. सोबतच नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे, शिवसेनेला नामांतर करायचं आहे, पण या विषयात आम्हाला पडायचं नाही. पण औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर झालं पाहिजे ही आमची 100 टक्के भूमिका आहे," असंही पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचे नवीन वर्षातील संकल्प सरत्या वर्षाचा निरोप देऊन नववर्षाचं उत्साहात स्वागत झालं. नवीन वर्षाचा संकल्प काय असं विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी यादीच सांगितली. ते म्हणाले की, नवीन वर्षी जास्तीत जास्त प्रवास करणे जो कोरोना काळात झाला नाही आणि संघटना मजबूत करणे. 2021 साली ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुका ताकदीने लढणे आणि जिंकणे. 2022 साली मुंबई महापालिका निवडणुका लढवणे जिंकणे हे लक्ष्य आहे."

2022 ची बीएमसी, 2024 च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीची तयारी "मुंबईवर दिल्लीचेही लक्ष राहिल. मुंबई ही काही जणांची जहागिरी राहिली आहे. मात्र पायाभूत सुविधा, मुंबईच्या समस्यांकडे दुर्लक्ष आणि मनीजनरेट करणे एवढंच लक्ष्य राहिलं काहींचं. त्यामुळे मुंबई महापालिका जिंकणे हे तर लक्ष्य आहेच आणि 2022 नंतर 2024 ला किती दिवस राहतात, लोकसभा ,विधानसभेला," असं म्हणत भाजप पुढच्या तीन चार वर्षांची तयारी करत असल्याचं सांगितलं.

संबंधित बातम्या

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind Vs Pak Asia Cup Final: भारताने फायनलमध्ये 'ती' मोठी चूक केली होती, तरीही पाकिस्तानने सामना हातातून घालवला; माजी खेळाडूला अश्रू अनावर
भारताने फायनलमध्ये 'ती' मोठी चूक केली होती, तरीही पाकिस्तानने सामना हातातून घालवला; माजी खेळाडूला अश्रू अनावर
Pandharpur: पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला 12 महिने चंद्रभागेच्याच पाण्याने स्नान, गंगाजल मिसळण्याच्या आरोपावर मंदिर समितीचा खुलासा
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला 12 महिने चंद्रभागेच्याच पाण्याने स्नान, गंगाजल मिसळण्याच्या आरोपावर मंदिर समितीचा खुलासा
Bharat Ratna for RSS Dr. Hedgewar : डॉ. हेगडेवार भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक, त्यांना 'भारतरत्न' देण्यात यावे; भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी
डॉ. हेगडेवार भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक, त्यांना 'भारतरत्न' देण्यात यावे; भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी
Sugarcane farmers deduction: ही सरकारची दिवाळखोरी, शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा; ऊसाच्या प्रतिटन 15 रुपये कपातीवर सतेज पाटलांचा हल्लाबोल
ही सरकारची दिवाळखोरी, शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा; ऊसाच्या प्रतिटन 15 रुपये कपातीवर सतेज पाटलांचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Udaypur Leopard : घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेनं चक्क दोरीने बांधले
Nashikkar Help Nanded | नांदेड पूरग्रस्तांसाठी नाशिककर मदतीला धावले, 900 किटची मदत
Anil Deshmukh Fake Attack | पोलिसांच्या तपासात 'हल्ला' खोटा, B Final Report कोर्टात सादर
Dr. Hedgewar Bharatratn | डॉ. हेडगेवार यांना 'भारतरत्न' देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
Navratri Rain Impact | भाविकांची संख्या घटली, तुळजापुरात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind Vs Pak Asia Cup Final: भारताने फायनलमध्ये 'ती' मोठी चूक केली होती, तरीही पाकिस्तानने सामना हातातून घालवला; माजी खेळाडूला अश्रू अनावर
भारताने फायनलमध्ये 'ती' मोठी चूक केली होती, तरीही पाकिस्तानने सामना हातातून घालवला; माजी खेळाडूला अश्रू अनावर
Pandharpur: पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला 12 महिने चंद्रभागेच्याच पाण्याने स्नान, गंगाजल मिसळण्याच्या आरोपावर मंदिर समितीचा खुलासा
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला 12 महिने चंद्रभागेच्याच पाण्याने स्नान, गंगाजल मिसळण्याच्या आरोपावर मंदिर समितीचा खुलासा
Bharat Ratna for RSS Dr. Hedgewar : डॉ. हेगडेवार भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक, त्यांना 'भारतरत्न' देण्यात यावे; भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी
डॉ. हेगडेवार भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक, त्यांना 'भारतरत्न' देण्यात यावे; भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी
Sugarcane farmers deduction: ही सरकारची दिवाळखोरी, शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा; ऊसाच्या प्रतिटन 15 रुपये कपातीवर सतेज पाटलांचा हल्लाबोल
ही सरकारची दिवाळखोरी, शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा; ऊसाच्या प्रतिटन 15 रुपये कपातीवर सतेज पाटलांचा हल्लाबोल
मनोरमा खेडकरने परस्पर अटकपूर्व जमीन मिळवला, नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही; क्लिनर अपहरण प्रकरणात मोठी अपडेट
मनोरमा खेडकरने परस्पर अटकपूर्व जमीन मिळवला, नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही; क्लिनर अपहरण प्रकरणात मोठी अपडेट
RBI repo rate October 2025: आरबीआयकडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरात बदल नाहीच; कर्जे महागणार नाहीत, EMI ही वाढणार नाही
आरबीआयकडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरात बदल नाहीच; कर्जे महागणार नाहीत, EMI ही वाढणार नाही
Uttarakhand landslide risk 2025: उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
Embed widget