एक्स्प्लोर

कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित होऊ शकतो का? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात..

कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित घोषित करा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण दोन राज्यांमधील असा वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश होऊ शकतो का आणि त्यासाठी काय करावं लागेल याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याकडून जाणून घेतलं.

पुणे : कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित घोषित करा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण दोन राज्यांमधील असा वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश होऊ शकतो का आणि त्यासाठी काय करावं लागेल याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याकडून जाणून घेतलं. त्यांच्या मते, "केंद्र सरकार स्वत:च्या अखत्यारित वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय घेऊ शकते."

सर्वोच्च न्यायालयात निर्णय होत नाही तोपर्यंत कर्नाटक व्याप्त भाग केंद्रशासित करावा असं मुख्यमंत्री म्हणाले. याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले की, "केंद्र सरकार असे करु शकते. घटनेतील तरतुदीनुसार राज्यपालांना त्यासाठी राष्ट्रपतींना शिफारस करावी लागते. राष्ट्रपतींना ती शिफारस त्या राज्याच्या विधीमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवावी लागते. मात्र विधिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. म्हणजेच कर्नाटकमधील काही भाग केंद्रशासित करायची शिफारस केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या मार्फत केली आणि कर्नाटकच्या विधिमंडळाने जरी त्याला विरोध केला तरी केंद्र सरकार स्वतःच्या अखत्यारीत असा निर्णय घेऊ शकते."

"याआधी केंद्र सरकारने नवीन राज्यांची आणि नवीन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करताना असे निर्णय घेतले आहेत. काश्मीर हे त्याचं अलिकडचं उदाहरण आहे. असा निर्णय केंद्र सरकार साध्या बहुमताच्या आधारे देखील घेऊ शकते. ही घटनादुरुस्ती नाही, त्यामुळे दोन तृतियांश बहुमताची त्यासाठी गरज नाही," असं उल्हास बापट यांनी पुढे सांगितले.

'मुंबई केंद्रशासित केली तर उद्धव ठाकरेही आक्षेप घेऊ शकणार नाहीत' उल्हास बापट म्हणाले की, "कलम 3 नुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा किंवा अस्तित्त्वात असलेल्या राज्याचे दोन भाग करण्याचा अधिकार दिलेला आहे. जसं महाराष्ट्र-गुजरात झालं, किंवा एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचं राज्य करु शकतात जसं गोवा झालं किंवा एखादं राज्य केंद्रशासित करु शकतात जसं काश्मीर झालं. हे विधेयक संसदेत मांडण्याआधी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक आहे. परंतु संबंधित राज्याला विचारल्याशिवाय राष्ट्रपती ती शिफारस करु शकत नाहीत. त्या राज्याच्या कायदेमंडळाला विचारावं लागतं. कायदेमंडळ त्यावर विचार करुन राष्ट्रपतींना शिफारस करते. परंतु राज्याकडून येणारी प्रतिक्रिया केंद्राला बंधनकारक नाही. हे पूर्ण केंद्र सरकारच्या आणि संसदेच्या हातात आहे. उद्धव ठाकरेंच्या राजकीय वक्तव्याचे पडसाद काय उमटतात हे मला माहित नाही. परंतु यामधून असाही पायंडा पडेल की, भविष्यात मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली तर त्याला उद्धव ठाकरेही आक्षेप घेऊ शकणार नाहीत."

मुख्यमंत्री काय म्हणाले होते? 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प' या शासकीय पुस्तकाचं बुधवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित झाला पाहिजे असं म्हणाले. "एक दिलाने लढलो तर प्रश्न सुटेल. पवारसाहेबांनी यावर काम केलं आहे. हा प्रश्न कोर्टात असेपर्यंत हा भाग केंद्रशासित का करत नाही? कर्नाटक बेलगाम वागत आहे. हा भाग केंद्रशासित झाला पाहिजे, यात कर्नाटक सरकारची मस्ती चालू देणार नाही, असं आपण कोर्टात सांगितलं पाहिजे," असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे. या भागातील लोकांसह, माझी देखील मागणी आहे की, मुंबई कर्नाटकात सामील करावी. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत, मी केंद्र सरकारला विनंती करतो की मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget