![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबई कर्नाटकात सामील व्हावी ही मराठी भाषिकांची इच्छा; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचं उद्धव ठाकरे यांना उत्तर
'कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा', असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधावारी एका कार्यक्रमात केलं. यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
![मुंबई कर्नाटकात सामील व्हावी ही मराठी भाषिकांची इच्छा; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचं उद्धव ठाकरे यांना उत्तर Mumbai should be included in Karnataka, says Karnataka Deputy CM Lakshman Savadi to Maharashtra CM Uddhav Thackeray मुंबई कर्नाटकात सामील व्हावी ही मराठी भाषिकांची इच्छा; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्याचं उद्धव ठाकरे यांना उत्तर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/28135534/CM-Uddhav.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ' सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा', कानडी सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प' या शासकीय पुस्तकाचं बुधवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी असे म्हणाले, की कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे.
लक्ष्मण सावडी म्हणतात, या भागातील लोकांसह, माझी देखील मागणी आहे की, मुंबई कर्नाटकात सामील करावी. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत, मी केंद्र सरकारला विनंती करतो की मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मुख्यमंत्री म्हणाले की, "हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकार उर्मटपणे वागत आहे." "हे प्रकरण कोर्टात असताना ज्या पद्धतीने आधी बेळगावला उपराजधानी बनवली, मग नामांतर केलं हा कोर्टाचा अपमान नाही का?" असा प्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, "एकतर हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांच्यासोबत बैठक आहे. कर्नाटक सरकार कायद्याचा विचार करत नाही. हा विषय तेवढ्यापुरते बोलायचं असतो. मुख्यमंत्री कोणीही असो मराठींवर अन्याय करतात. हा भाग महाराष्ट्रात आणायचा आहे."
वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की "एक दिलाने लढलो तर प्रश्न सुटेल. पवारसाहेबांनी यावर काम केलं आहे. हा प्रश्न कोर्टात असेपर्यंत हा भाग केंद्रशासित का करत नाही? कोर्टात बेलगाम वागत आहे. हा भाग केंद्रशासित झाला पाहिजे, यात कर्नाटक सरकारची मस्ती चालू देणार नाही, असं आपण कोर्टात सांगितलं पाहिजे.
"मराठी एकीकरण समिती तुटली कशी? मराठीदुहीचा शाप आहे. अनुभवाचे फटके पडले आता मराठी अस्मिता एकत्र आणत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. संघराज्याचं स्वप्न आहे. भाषावार प्रांतरचना झाली पण महाराष्ट्रातील मराठी माणसं आपल्यापासून दूर केली. अत्याचार झाला तर आम्ही तोडून मोडून टाकणार. मराठी आमदार निवडून आले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.मराठी महापौर निवडून आले, पण त्यांनी काही केलं तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतात. मातृभाषेसाठी लढला तर राजद्रोह? आजपासून नवीन सुरुवात करुया. मतभेद झाले तर गाडून टाका. जोपर्यंत हा भाग महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, ही प्रतिज्ञा घेऊया," असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी ठाम भूमिका मांडावी : शरद पवार
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणतात, “सर्वोच्च न्यायालयातील लढा हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत. हे प्रकरण जिंकण्यासाठी महाराष्ट्राने सर्व कायद्यांचा पर्याय वापरला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: लक्ष घालत आहेत. याशिवाय राजकीय मतभेद बाजूला ठेवून या बाबतीत महाराष्ट्राने एकता दर्शविण्याची गरज” असल्याचं पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)