एक्स्प्लोर

'सुरक्षारक्षक नसेल तर खातं दुसऱ्या बँकेत वळवा', एटीएम चोरीच्या घटनांवर पोलिसांकडून बँकांची गोची

बँकांच्या हलगर्जीपणाचा चोरटे फायदा घेतायेत. पण बँकांनी इन्शुरन्स उतरवल्याने ते चोरीला गांभीर्याने घेत नव्हते. मात्र आता पोलिसांनी खातेदारांना असं आवाहन केल्याने शिवाय आरबीआयकडे ही बँकांची तक्रार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्याने बँकांची मात्र गोची झाली आहे. त्यामुळं खातेदार कमी करायचे नसतील तर एटीएम मशिन्सना सुरक्षा देण्यापलीकडे आता बँकांपुढे पर्याय उरलेला नाही.

पिंपरी : एटीएम फोडीचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. बँका सुरक्षारक्षक नेमत नसल्याने या चोऱ्या घडत असल्याचं उघड होतं. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यात बँकांना पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मात्र बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानली. दुसरीकडे एटीएम चोरीच्या घटना थांबायचं नाव घेत नव्हत्या. बँका आणि भरणा करणाऱ्या कंपन्या हलगर्जीपणाचा फायदा चोरट्यांकडून घेणं सुरूच होतं. खापर मात्र पोलिसांवर फुटू लागलं. म्हणूनच पोलिसांनी बँकांची गोची करायचा निर्णय घेतला. एटीएम चोरीचा पर्दाफाश केल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद बँकांवर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न पोलीस आयुक्तांना विचारण्यात आला. यावर त्यांनी बैठकीत घडलेला प्रकार सांगितला. पण त्याचवेळी बँकांना अद्दल घडवण्यासाठी एक शक्कल लढवली आणि खातेदारांना आवाहन केलं. 'ज्या बँकेच्या एटीएम मशिनला सुरक्षारक्षक आणि सुरक्षेच्या उपाययोजना नसतील त्या बँकेतील खातं खातेदारांनी दुसऱ्या बँकेत वळवावे', असा सल्ला पोलिसांनी ग्राहकांना दिला. यामुळं त्या बँकांची खाती कमी होतील आणि त्यांना फटका बसेल. असं झाल्याशिवाय बँका चोरीच्या घटनांना गांभीर्याने घेणार नाहीत, असं पोलिस आयुक्तांनी सांगितलं. सुरक्षारक्षक नसेल तर खातं दुसऱ्या बँकेत वळवा', एटीएम चोरीच्या घटनांवर पोलिसांकडून बँकांची गोची बँकांकडून चोरीच्या घटनांना गांभीर्याने न घेण्याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे बँका एटीएम मशीनमध्ये रोकडचा भरणा करण्यासाठी खाजगी कंपनीला ठेका देते, त्यामुळे बँकेतून एटीएममध्ये रोकड घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांची असते. दुसरं म्हणजे बँकांनी विमा उतरवलेला असतो त्यामुळं रोकड चोरीस गेली तरी त्यांचं नुकसान होत नाही. सुरक्षारक्षक नसेल तर खातं दुसऱ्या बँकेत वळवा', एटीएम चोरीच्या घटनांवर पोलिसांकडून बँकांची गोची चोरीसाठी विमानाने यायचा म्होरक्या दरम्यान आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत पिंपरी चिंचवड पोलिसांनी एटीएम फोडीचे सत्र मोडीस काढलं आहे. टोळीचा म्होरक्या विमानाने चोरीसाठी यायचा अन् जायचा. बँका आणि भरणा करणाऱ्या कंपन्यांची छोटीशी चूक या चोरीला कारणीभूत ठरायची. शहरात गेल्या सहा महिन्यात तब्बल पंधरा एटीएम मशीनवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. या घटनांना आळा बसावा म्हणून पोलिसांनी बँकांना सुरक्षेच्या उपाययोजना करायच्या सूचना केल्या. मात्र बँकांनी झोपेचं सोंग घेतलं. म्हणूनच पोलिसांनी खातेदारांना असं आवाहन करण्याची शक्कल लढवली आणि बँकांची झोप उडवली. सुरक्षारक्षक नसेल तर खातं दुसऱ्या बँकेत वळवा', एटीएम चोरीच्या घटनांवर पोलिसांकडून बँकांची गोची बँका आणि संबंधित कंपनीचा निष्काळजीपणा एटीएम मशीनमध्ये भरणा करताना बँका आणि संबंधित कंपनीचा निष्काळजीपणा ही याला कारणीभूत ठरायचा. पैश्यांच्या बंडलला असणारे प्लास्टिकची दोरी डस्टबिनमध्ये टाकली जायची, यावरूनच मशीनमध्ये आजच रक्कम भरल्याचं स्पष्ट व्हायचं. टोळीचा म्होरक्या अझरुद्दीन हुसेन हा हरियाणाहून विमानाने यायचा. तर इतर साथीदार चारचाकीने. कटर आणि गॅस स्थानिक चोरटे द्यायचे. एटीएम मशीनची रोकड हातात पडली की इतर चोरटे चारचाकीने तर अझरुद्दीन मुंबईमधून विमानाने हरियाणाला जायचा.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2026: मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या?
मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या?
Maharashtra Budget 2026: अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं!
अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं!
Nitin Gadkari: 'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी
'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी
Rohit Pawar and Eknath Shinde: होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा
होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा

व्हिडीओ

Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Maharashtra Budget 2026 : मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊल, मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
Embed widget