![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: Poll of Polls)
Uddhav Thackeray : हात लावेल तिकडे सत्यानाश झालाच पाहिजे, ये मोदी की गॅरंटी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray, मुंबई : "काल आपण मालवणला गेलो होतो, मी नाही पण तुम्ही सगळे आणि आदित्य गेला होता. आपण काय तिकडे राडा करायला गेलो नव्हतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यांत पडतो.
![Uddhav Thackeray : हात लावेल तिकडे सत्यानाश झालाच पाहिजे, ये मोदी की गॅरंटी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल Uddhav Thackeray There must be annihilation wherever the hand is laid come Narendra Modi that guarantee Maharashtra Politics Marathi News Uddhav Thackeray : हात लावेल तिकडे सत्यानाश झालाच पाहिजे, ये मोदी की गॅरंटी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/7fb58ed0e456404321e9db560b2c06e61724944176646924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uddhav Thackeray, मुंबई : "काल आपण मालवणला गेलो होतो, मी नाही पण तुम्ही सगळे आणि आदित्य गेला होता. आपण काय तिकडे राडा करायला गेलो नव्हतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यांत पडतो. पूर्वी दादा कोंडकेंचा सिनेमा होतो, बोट लावेल तिथे गुदगुल्या. आता मोदी नवा काढतायत हात लावेल तिकडे सत्यानाश...जिकडे हात हात लावेल तिकडे सत्यनाथ झालाच पाहिजे, ये मोदी की गॅरंटी आहे. अशा सडक्या गॅरंट्या आपल्याला नको आहेत", असे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई उपनगरमधील गणेशोत्सव समन्वय समिती मार्गदर्शन सभेत ते बोलत होते.
आपण वॉर्ड अधिकाऱ्याकडे जायचो आणि प्रश्न सुटायचे
उद्धव ठाकरे म्हणाले, मधल्या काही वर्षात आपली भेट झाली नव्हती. 5 वर्ष किमान भेट न होऊन झाली. बाप्पाच्या आधी तुमची भेट व्हायची. मात्र तुम्ही नातं तुटू दिलं नाही. मी तुम्हाला हक्काने बोलवलंय, काही सांगण्यासाठी बोलवलंय. आपण गणपती उत्सव म्हणून साजरा करतो. पालिका बरखास्त केलीय, राज्याला कोणी वालीच राहिलेला नाही. आपण वॉर्ड अधिकाऱ्याकडे जायचो आणि प्रश्न सुटायचे. विसर्जनाच्या बॅनर्सवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचे फोटो असतात. ते सांकेतिक सांगतायत कोणाचं विसर्जन केलं पाहिजे.
मात्र इथे तो टाईप रायटर म्हणायचा साहेब हा आपलाच कार्यकर्ता मग काय करायचं
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी जरा अडचणींचा पाठा वाचला, मात्र सोडवणार कोण? सण उत्सवावर आपण कोरोनात बंदी केली होती. मात्र काहींच्या अंगात शिरतं. गणपती बुद्धीदाता देखील होता, थोडी बुद्धी तर घ्यायची. जर कोणी बंधने आणली तर झुगारुन द्या. आपण खड्डे बुजवले होते, यांच्या कारभारालाच खड्डे पडलेत ते कोण बुजवणार? नायक सिनेमामध्ये तो एक टाईप रायटर होता. त्या सिनेमात लोकांना आणायचं आणि सांगायचे याला आत टाक त्याला टाक. मात्र इथे तो टाईप रायटर म्हणायचा साहेब हा आपलाच कार्यकर्ता मग काय करायचं. अरे तू फक्त टाइप कर रे. कारवाईचे नंतर बघू. पाहाणी वगैरे सर्व थोतांड आहे, असंही ठाकरे म्हणाले.
लोकमान्यांनी स्वातंत्र्याची चळवळ केली आणि आपण त्याचा उत्सव केला. ही शक्ती जागी केली पाहिजे यासाठी टिळकांनी प्रयत्न केलेत. लोकमान्यांनी स्वातंत्र्याची चळवळ केली आणि आपण त्याचा उत्सव केला. ही शक्ती जागी केली पाहिजे यासाठी टिळकांनी प्रयत्न केलेत. स्वातंत्र्य मिळालं पण सरकार आता आहे की नाही हेच कळत नाही. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा वेगळी ओळख आहे. शाडूची मूर्ती पण करतो, माती द्या. जशी ही जबाबदारी घेतो तशी तुम्ही छत्रपतींच्या पुतळ्याची जबाबदारी का नाही घेतली? एकमेकांकडे तुम्ही बोट दाखवता, नौदल म्हणतं पीडब्ल्यूडीनं केला ते म्हणतात त्याने केला हेच सुरु आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीशी आपलं पटत नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात: तानाजी सावंत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)