एक्स्प्लोर

मुंबईतील 5 नाक्यांवर माफी, हा राज ठाकरेंचा इम्पॅक्ट,अविनाश जाधवांची प्रतिक्रिया, टोलनाक्यांवर पेढे वाटले

Toll Free For Light Vehicles: मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर (Five Toll Plaza) हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी केलीय.

Toll Free For Light Vehicles: राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Governent Cabinet Meeting) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना पाचही टोलनाक्यांवर सरकारने टोलमाफीचा (Toll waiver in mumbai) निर्णय जाहीर केला आहे. आज (14 ऑक्टोबर)  रात्री 12 वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हलक्या वाहनांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर ABP माझाला आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, "गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा,  नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल..." असा शब्दात राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे ठाण्याचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी टोलनाक्यांवर पेढे वाटत या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान,   'एबीपी माझा'शी बोलताना हा विजय मनसेच्या बारा वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याचे यश असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

बारा वर्षानंतर अखेर आमच्या लढ्याला यश- अविनाश जाधव

राज्य सरकारने घेतलेला हा अतिशय मोठा निर्णय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते गेल्या बारा वर्षांपासून हा लढा देत होते. गेल्या बारा वर्षात आम्ही कित्येकदा लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तडीपारीची शिक्षा भोगली. अनेक मनसे सैनिक, महिला पदाधिकारी जेलमध्ये गेल्या. अजही आम्ही या टोल प्रकरणात कोर्टामध्ये हजेरी लावत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आज खऱ्या अर्थाने विजय झाला आहे. अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.

पुढे ते म्हणाले राज साहेब ठाकरे कित्येकदा या टोल नाक्यावर स्वतः उभे राहिले आहेत. त्यांनी स्वत: वाहनांना वाट करून दिली आहे. आम्ही कायम हा लढा आजपर्यंत देत आलो. बारा वर्षानंतर अखेर या लढ्याला यश आले आहे. राज साहेब ठाकरे यांनी या लढ्याला पाठबळ दिल्याने हे यश मिळू शकले आहे. किंबहुना या आधी देखील 68 टोल नाके बंद झाले आहेत.  ते केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळेच बंद झाले आहे. आज अजून पाच टोल नाके बंद झाले आहेत, ते देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळेच झाले आहे, असेही मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले.  

याआधी सरकारने कोणकोणते निर्णय घेतले?

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकतो. त्याआधी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. याआधी महायुती सरकारने समाजातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. सरकारने राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळपास दुप्पटे केले आहे. या निर्णयाचा जवळपास 50 हजार होमगार्ड्सना फायदा होणार आहे. यासह सरकारने राज्यातील अनेक आयटीआय संस्थांची नावे बदलली आहेत. या संस्थांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. राज्य सरकारने राज्यातील मदरशांत शिकविणाऱ्या शिकक्षांचे मानधनही दुप्पट केले आहे. 

हे ही वाचा 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल, एकाच वेबसाईटवर पासबूकची माहिती उपलब्ध होणार , Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल,Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल, एकाच वेबसाईटवर पासबूकची माहिती उपलब्ध होणार , Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल,Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
Jan Dhan account KYC : जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  
जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  
Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक,  ई केवायसी कशी पूर्ण करायची? जाणून घ्या प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक, ई केवायसी कशी पूर्ण करायची?
वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं; खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे
वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं; खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे
Ajit Pawar: पक्षाला वेळ द्यावा लागेल, मी कोण काम करतं याची नोंद घेतलीय; अजितदादांचा आपल्याच मंत्र्यांना सूचक इशारा
पक्षाला वेळ द्यावा लागेल, मी कोण काम करतं याची नोंद घेतलीय; अजितदादांचा आपल्याच मंत्र्यांना सूचक इशारा
Embed widget