एक्स्प्लोर

मुंबईतील 5 नाक्यांवर माफी, हा राज ठाकरेंचा इम्पॅक्ट,अविनाश जाधवांची प्रतिक्रिया, टोलनाक्यांवर पेढे वाटले

Toll Free For Light Vehicles: मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर (Five Toll Plaza) हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी केलीय.

Toll Free For Light Vehicles: राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Governent Cabinet Meeting) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना पाचही टोलनाक्यांवर सरकारने टोलमाफीचा (Toll waiver in mumbai) निर्णय जाहीर केला आहे. आज (14 ऑक्टोबर)  रात्री 12 वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हलक्या वाहनांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर ABP माझाला आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, "गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा,  नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल..." असा शब्दात राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे ठाण्याचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी टोलनाक्यांवर पेढे वाटत या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान,   'एबीपी माझा'शी बोलताना हा विजय मनसेच्या बारा वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याचे यश असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

बारा वर्षानंतर अखेर आमच्या लढ्याला यश- अविनाश जाधव

राज्य सरकारने घेतलेला हा अतिशय मोठा निर्णय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते गेल्या बारा वर्षांपासून हा लढा देत होते. गेल्या बारा वर्षात आम्ही कित्येकदा लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तडीपारीची शिक्षा भोगली. अनेक मनसे सैनिक, महिला पदाधिकारी जेलमध्ये गेल्या. अजही आम्ही या टोल प्रकरणात कोर्टामध्ये हजेरी लावत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आज खऱ्या अर्थाने विजय झाला आहे. अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.

पुढे ते म्हणाले राज साहेब ठाकरे कित्येकदा या टोल नाक्यावर स्वतः उभे राहिले आहेत. त्यांनी स्वत: वाहनांना वाट करून दिली आहे. आम्ही कायम हा लढा आजपर्यंत देत आलो. बारा वर्षानंतर अखेर या लढ्याला यश आले आहे. राज साहेब ठाकरे यांनी या लढ्याला पाठबळ दिल्याने हे यश मिळू शकले आहे. किंबहुना या आधी देखील 68 टोल नाके बंद झाले आहेत.  ते केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळेच बंद झाले आहे. आज अजून पाच टोल नाके बंद झाले आहेत, ते देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळेच झाले आहे, असेही मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले.  

याआधी सरकारने कोणकोणते निर्णय घेतले?

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकतो. त्याआधी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. याआधी महायुती सरकारने समाजातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. सरकारने राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळपास दुप्पटे केले आहे. या निर्णयाचा जवळपास 50 हजार होमगार्ड्सना फायदा होणार आहे. यासह सरकारने राज्यातील अनेक आयटीआय संस्थांची नावे बदलली आहेत. या संस्थांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. राज्य सरकारने राज्यातील मदरशांत शिकविणाऱ्या शिकक्षांचे मानधनही दुप्पट केले आहे. 

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीसZero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शनZero Hour Bhai Jagtap :  आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
Embed widget