एक्स्प्लोर

Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?

रासायनिक शेतीला फाटा देत नैसर्गिक शेतीतून तोट्यात जाणाऱ्या शेतीतूनही प्रगती साधता येते. चांगली कमाई करता येते हा नवा मापदंड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे

Success Story: दुष्काळ, पाण्याची टंचाईतही मातीची सुपीकता जपत नैसर्गिक शेतीशी नाळ जपणाऱ्या यवतमाळच्या सुभाष खेतूलाल शर्मा या शेतकऱ्याला यंदाचा पद्म पुरस्कार (Padma Awards 2025) दिला जाणार आहे. माती, पाणी, जातीवंत बियाणे, पीक नियोजन आणि मेहनत हीच नैसर्गिक शेतीची पंचसूत्रं असल्याचं सांगणाऱ्या 73 वर्षीय सुभाष शर्मा यांनी रासायनिक शेतीला फाटा देत नैसर्गिक शेतीतून तोट्यात जाणाऱ्या शेतीतूनही प्रगती साधता येते. चांगली कमाई करता येते हा नवा मापदंड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. नैसर्गिक शेतीमुळे या शेतकऱ्याचं उत्पादन 50 टनांवरून 400 टनांपर्यंत वाढले आहे. (Agriculture Success)

केंद्र सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या आधी पद्म पुरस्कार 2025 जाहीर केले आहेत. 2025 र्षात वेगवेगळ्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या देशातील मान्यवरांसाठी 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह 139 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याच पद्म पुरस्कारांमध्ये 75 वर्षांच्या सुभाष शर्मांच्या शेतीचा आदर्श निर्माण केल्याबद्दल पद्मश्री जाहीर झाला आहे.

73 वर्षांच्या या शेतकऱ्यानं कशी केली शेती?

शर्मा यांच्या प्रवासाला 1994 मध्ये एक निर्णायक वळण मिळाले जेव्हा त्यांनी रासायनिक शेती सोडण्याचा निर्णय घेतला. रासायनिक फवारण्यांमुळे, खतांमुळे त्यांच्या शेतातील पीक उत्पादन घटू लागले. त्यामुळेच पुढील काही  वर्षांमध्ये ते नैसर्गिक शेतीच्या पद्धतींकडे वळले आणि 2000 पर्यंत, त्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले. त्याच्या शेतीचे उत्पादन 50 टनांवरून 400 टनांपर्यंत वाढले, आणि सर्व खर्चात कमालीची घट झाली. रासायनिक शेती विनाशकारी आहे, तर नैसर्गिक शेती सर्जनशील आहे, हा त्यांचा विश्वास त्यांच्या परिणामांवरून दिसून येतो. "नैसर्गिक शेती हा समतोल राखण्याचा एक मार्ग असल्याचं ते सांगतात. 20 एकर शेतीत रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघोस उत्पादन घेतलं आहे..

आत्महत्यागस्त शेतकऱ्यांची अधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये (Yavatmal) रासायनिक शेतीतून तोट्यात जाणारी शेती छोट्या छोट्या नैसर्गिक उपायांमधून सुधारता येते. हे गुजरीत राहणाऱ्या सुभाष शर्मांनी दाखवून दिले. नाविन्यपूर्ण प्रयोगातून शाश्वत शेतीची कास धरत शेतकऱ्यांनी  मातीची सुपीकता कशी सुधारावी हेही त्यांनी सांगितलं. (Natural Farming)

" आत्महत्यागस्त शेतकऱ्यांची अधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये (Yavatmal) रासायनिक शेतीतून तोट्यात जाणारी शेती छोट्या छोट्या नैसर्गिक उपायांमधून सुधारता येते. हे गुजरीत राहणाऱ्या सुभाष शर्मांनी दाखवून दिले. नाविन्यपूर्ण प्रयोगातून शाश्वत शेतीची कास धरत शेतकऱ्यांनी  मातीची सुपीकता कशी सुधारावी हेही त्यांनी सांगितलं. (Natural Farming) "
-
असंही ते सांगतात.

नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं?

  • शेतकऱ्याने एक एकर शेतीमागे एक जनावर पाळावे. या जनावराचे शेण, गोमुत्र याचा वापर शेतीत वारंवार करावा.
  • शेताच्या बांधावर वृक्षाची लागवड केल्याने पक्षी कीड नियंत्रण प्रभावीपणे करतात.
  • रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेती पद्धतीत मातीची सुपीकता जपण्यासोबतच पाणी टिकवून धरण्याची क्षमता जास्त आहे.
  • कृत्रिम पक्षी थांबे उभारण्याऐवजी शेताच्या बांधावर स्थानिक वृक्षांची लागवड उत्पन्नासाठी करावी, असा त्यांचा नेहमी आग्रह असतो.
  • मातीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीच्या खतांची लागवड करा.
  • याकरिता सहा किलो बोरू किंवा ढँचा, चार किलो बाजरी, सहा किलो बरबटी याप्रमाणे 16 किलो धान्याची लागवड करतात.
  • हे वाढल्यानंतर रोटावेटरने ते जमिनीत गाढली जातात. या प्रयत्नातून मातीचा सेंद्रिय कर्ब 0.4 वरून 2.1 वर आणणे शक्य झाल्याचेही ते सांगतात.

हेही वाचा:

Success Story:ड्रॅगनफ्रूटमधून हा शेतकरी वर्षाकाठी 1 कोटी कमावतोय, एका झाडाला 14-15 किलाेंची फळं, वाचा यशोगाथा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget