एक्स्प्लोर

तिसरी आघाडी नाही, आता मुख्य आघाडी स्थापन होईल, नितीश कुमार यांचं सूचक वक्तव्य

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. नितीश कुमार हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती.

Nitish Kumar : बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. नितीश कुमार हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी  (Lok Sabha Elections 2024) तिसरी आघाडी (Third Front) निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यांनी  तिसर्‍या आघाडीची शक्यता फेटाळून लावली असून, त्याच्या जागी मुख्य आघाडी स्थापन केली जाईल, असं म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, "तिसरी आघाडी नाही. तर आता मुख्य आघाडी बनेल." पत्रकार परिषदेत नितीश कुमार म्हणाले, "आम्ही निर्णय घेतला आणि बिहारचे पक्ष एकत्र आले. ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्ष आहेत, तिथे त्यांची बैठक झाल्यास देशात वातावरण निर्माण होण्यास सुरु होईल आणि हे 2024 साठी चांगले ठरेल.''  

नितीश कुमार म्हणाले की, "अनेक पक्षाच्या नेत्यांकडून चर्चेसाठी मला फोन येत होते. म्हणून मी या संदर्भात दिल्लीत आलो. सोनिया गांधी यांनाही एकदा भेटेन. सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या बाजूने 2024 ची निवडणूक खूप चांगली ठरणार आहे. मात्र त्यांच्या ही बाजूने एकतर्फी असेल. तिसरी आघाडी नाही, तर मुख्य आघाडी बनणार आहे.” हरियाणातील निवडणूक प्रचाराला जाण्याबाबत नितीश कुमार यांना पत्रकारांनी विचारले असताते म्हणाले, “हरयाणातील रॅलीत मी सहभागी होणार आहे. आधीही जात आलो आहे.

नितीश कुमार यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव घेत पुन्हा भाजला लक्ष केलं आहे. नितीश कुमार म्हणाले आहेत की, अटल बिहारी वाजपेयींच्या सहा वर्षात अनेक कामे झाली आणि भाजप सरकारच्या सध्याच्या कार्यकाळात एकही नवीन काम झाले नाही. प्रत्येक गोष्टीला नावं ठेवणं आणि काम न करता प्रचार करणं, काम न करता फक्त प्रसिद्धी करायची, ही काही लोकांची सवय झाली आहे.

विरोधी पक्षांच्या एकजुटीबाबत नितीश कुमरे म्हणाले, "काँग्रेस असो, डावे असोत किंवा इतर पक्ष, सगळे महत्त्वाचे आहेत. सगळ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वांनी सहमती दर्शवली तर खूप चांगले वातावरण निर्माण होऊ शकते. यानंतर अनेक पक्षांचे लोक एकत्र बसतील. आम्ही हे सुरू ठेवू.” ते म्हणाले की, त्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोन आला होता. भाजपवर हल्लाबोल करताना नितीश म्हणाले, "या लोकांची इच्छा होती की प्रत्येक घरातील नळाचे श्रेय केंद्राकडे जावे. आम्ही 2016 पासून प्रत्येक घरातील नळावर काम करत आहोत, जे या लोकांनी नंतर आणले. आमच्यामुळे त्यांचा पाठिंबा वाढला आणि हे लोक आमचा पराभव करत होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget