एक्स्प्लोर

Sadabhau Khot : आमची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले, सदाभाऊ खोतांची मंत्रिपद न मिळाल्यानं खंत

Sadabhau Khot : विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं खंत व्यक्त केली आहे. अडीच वर्षांनी संधी मिळते का ते पाहावं लागेल, असंही ते म्हणाले.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल नागपूरमध्ये पार पडला. यानंतर भाजप, शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये अन् त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय भाजपचे मित्र पक्षांमध्ये देखील नाराजीचं वातावरण आहे. प्रथम केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा देखील नाराज असल्याचं समोर आलं आहे. आता विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. नांगरणीसाठी जी बैल वापरली गेली ती बैल बाजूला करुन ठेवली असल्याची खंत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. 

मित्रपक्षांना तिन्ही पक्षांनी सामावून घेणं गरजेचं होतं. तीन पक्षांनी मित्रपक्षांसाठी काही मंत्रिपदं बाजूला काढून ठेवायला हवी होती. परंतु, दुर्दैवानं तसं झालं नाही.गावगाड्यामध्ये पैरा केला जातो, त्याप्रमाणं दुर्दैवानं काही झालं की आम्ही तीन पक्षांचं शेत नागंरुन दिलं. मात्र, आमचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले. आम्ही मात्र शेतात उभे आहोत. मात्र, प्रामाणिकपणे महायुतीसोबत उभे आहोत, असं सदाभाऊ खोत म्हणाले. 

240 लोक आपले निवडून आले आहेत, मंत्रिपदं देण्याला काही मर्यादा होत्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, कालांतरानं ही सगळी मंडळी कामात येतील. शेतकरी एखाद्या वर्षी शेत पिकलं नाही म्हणून पेरणी करायचं थांबत नाही.दुसऱ्या वर्षी पेरणी होतीय का हे बघत राहायचं, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना भाजपनं विधानपरिषदेवर संधी दिली होती. 

भाजपच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी

भाजपची काल मंत्रिमंडळ विस्तारासाठी आमदारांची नावं जाहीर झाल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आरपीआयला एक मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता. मात्र, त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचं आमंत्रण देखील देण्यात आलं नाही, असं रामदास आठवले म्हणाले. 

रवी राणांची देखील नाराजी

युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील नाराज असल्याचं समोर आलं आहे. ते अधिवेशन सोडून अमरावतीला परतल्याची माहिती आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील मंत्रिपद न मिळाल्यानं खदखद पाहायला मिळाली. नरेंद्र भोंडेकर यांनी वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असं म्हटलं. प्रकाश सुर्वे यांची नाराजी देखील लपून राहिली नाही. तानाजी सावंत देखील नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यांच्या कार्यालयानं तानाजी सावंत आरोग्याच्या कारणामुळं नागपूरहून निघाल्याचं म्हटलं. 

इतर बातम्या :

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांची आदळआपट; एकनाथ शिंदे नाराज, कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत!

नागपूरहून काल बॅग घेऊन निघाले, तानाजी सावंत कुठे गेले?, नाराजीच्या चर्चांवरही मोठी माहिती समोर

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Embed widget