Raj Thackeray Thane Court: न्यायाधीशांनी विचारलं, गुन्हा कबूल आहे का?; राज ठाकरे म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही, ठाणे कोर्टात काय काय घडलं?
Raj Thackeray Thane Court: 2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं.

Raj Thackeray Thane Court ठाणे: 2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आज ठाणे न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीसाठी राज ठाकरे ठाणे न्यायालयात दाखल झाले होते. यावेळी ठाणे न्यायालयात नेमकं काय घडलं?, जाणून घ्या... (Raj Thackeray Thane Court)
ठाणे न्यायालयातील सुनावणीला काय काय घडलं? (Raj Thackeray Thane Court)
- राज ठाकरेंची इतर आरोपींसह ठाणे न्यायालयात उपस्थिती
- न्यायाधीश- गुन्हा कबूल आहे का?
- राज ठाकरे- मला गुन्हा कबूल नाही.
- न्यायाधीश- एक महिन्यात प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा.
- राज ठाकरे- पूर्ण सहकार्य करणार.
- सुनावणी संपली.
राज ठाकरे यांचे वकील ओंकार राजूरकर काय म्हणाले? (Raj Thackeray Thane Court)
पुढील तारीख अजून पडली नाही, थोड्या वेळाने ती येईल. राज ठाकरे आज हजर झाले. मात्र पुन्हा त्यांना हजर राहण्याची गरज नाही. आज गुन्हा कबूल आहे की नाही? विचारण्यात आले. मात्र राज ठाकरे यांनाही गुन्हा कबूल नाही असे सांगितले. येत्या एका महिन्यात केस पूर्ण होईल, त्यामुळे कोर्टाला सहकार्य करा, असे न्यायाधीशांनी सांगितले. राज ठाकरे पूर्ण सहकार्य करणार आहेत, अशी माहिती राज ठाकरे यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी सुनावणी झाल्यानंतर दिली.
नेमकं प्रकरण काय? (Raj Thackeray Thane Court)
2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ज्यात "मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या" असा आरोप करत, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोप त्यात करण्यात आले होते.
सदर प्रकरणी राज ठाकरे सह सात इतर मनसैनिकांवर विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती, पण नंतर राज ठाकरेंना दिलासा मिळाला होता. या प्रकरणी कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू होती मात्र यानंतर हा गुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला. सुनावणी दरम्यान आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने राज ठाकरे सह सर्व आरोपींना न्यायालयाने समज बजावत अटक वॉरंट देखील बजावले होते. यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलाने न्यायालयात अर्ज देऊन ते अटक वॉरंट देखील रद्द केला होता.
























