एक्स्प्लोर

Rahul Gandhi in Kolhapur: शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा, नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला: राहुल गांधी

Rahul Gandhi: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये अनावरण. राहुल गांधी यांची भाजपवर घणाघाती टीका

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर एक विचारधारा मनात बाळगून संघर्ष केला. हा देश सर्वांचा आहे, आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे, हा संदेश शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला दिला. भारताचं संविधान हे शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) विचारांचं प्रतीक आहे. मात्र, आज देशातील एक विचारधारा हे संविधान संपवण्याच्या योजना आखत आहे. याच विचारधारेच्या लोकांनी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. पण त्यांची नियत खोटी असल्याने हा पुतळा पडला. एकीकडे शिवाजी महाराजांच्या पायावर डोके टेकवायचे आणि त्यानंतर 24 तास त्यांच्या विचारधारेविरोधात काम करायचे, ही त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे राजकोट किल्ल्यावरील पडलेल्या पुतळ्याने एक संदेश दिला आहे की, शिवरायांचा पुतळा उभारला जात असेल तर संबंधितांकडून त्यांच्या विचारांचं संरक्षण झालं पाहिजे, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले. ते शनिवारी कोल्हापुरात कसबा बावडा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बोलत होते.

त्यांनी म्हटले की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की,  हा फक्त पुतळा नाही. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पुतळा उभारतो तेव्हा त्यांच्या कर्माचं आणि विचारधारेचं मनापासून समर्थन करतो. त्यामुळे आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आपण शिवराय आयुष्यभर ज्यासाठी लढले, त्याच्यासाठी आता आपण लढा दिला नाही, तर नुसता पुतळा उभारुन काही अर्थ नाही. शिवाजी महाराज ज्यांच्याविरोधात लढले, ज्याप्रकारे लढले तेवढं नाही पण काही अंशी तरी आपण काम केले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

शिवाजी महाराज आणि शाहू महाराज नसते तर या देशात संविधान आकाराला आले नसते. संविधान आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचा थेट संबंध आहे. भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरु आहे. एक विचारधारा शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रतिक असणाऱ्या संविधानाचं रक्षण करते, समानता आणि एकता मानते. ही शिवरायांची विचारधारा आहे. तर दुसरी विचारधारा संविधान संपवण्यासाठी 24 तास काम करत आहे. शिवाजी महाराजांचं संविधान कसं संपवायचं, याचा विचार ते 24 तास करतात. देशातील संस्थांवर आक्रमण करतात, लोकांना धमकावतात आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन डोकं टेकतात. तुम्ही शिवरायांच्या पुतळ्यासमोर डोकं ठेवत असाल तर तुम्हाला संविधानाचे रक्षण करावे लागेल. ही लढाई शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरु आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच विचारधारेच्या लोकांनी रोखून धरला. त्यामुळे ही लढाई नवी नाही, तर हजारो वर्षांपासूनची आहे,  असे राहुल गांधी यांनी म्हटले.

आणखी वाचा

मुंबई मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, आरे ते बीकेसी भूमिगत मेट्रो सुरु होणार, तिकीट दर ते फेऱ्या, जाणून घ्या वैशिष्ट्ये

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Embed widget