एक्स्प्लोर

Rahul Gandhi in Kolhapur: शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा, नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला: राहुल गांधी

Rahul Gandhi: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये अनावरण. राहुल गांधी यांची भाजपवर घणाघाती टीका

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर एक विचारधारा मनात बाळगून संघर्ष केला. हा देश सर्वांचा आहे, आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे, हा संदेश शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला दिला. भारताचं संविधान हे शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) विचारांचं प्रतीक आहे. मात्र, आज देशातील एक विचारधारा हे संविधान संपवण्याच्या योजना आखत आहे. याच विचारधारेच्या लोकांनी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. पण त्यांची नियत खोटी असल्याने हा पुतळा पडला. एकीकडे शिवाजी महाराजांच्या पायावर डोके टेकवायचे आणि त्यानंतर 24 तास त्यांच्या विचारधारेविरोधात काम करायचे, ही त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे राजकोट किल्ल्यावरील पडलेल्या पुतळ्याने एक संदेश दिला आहे की, शिवरायांचा पुतळा उभारला जात असेल तर संबंधितांकडून त्यांच्या विचारांचं संरक्षण झालं पाहिजे, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले. ते शनिवारी कोल्हापुरात कसबा बावडा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बोलत होते.

त्यांनी म्हटले की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की,  हा फक्त पुतळा नाही. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पुतळा उभारतो तेव्हा त्यांच्या कर्माचं आणि विचारधारेचं मनापासून समर्थन करतो. त्यामुळे आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आपण शिवराय आयुष्यभर ज्यासाठी लढले, त्याच्यासाठी आता आपण लढा दिला नाही, तर नुसता पुतळा उभारुन काही अर्थ नाही. शिवाजी महाराज ज्यांच्याविरोधात लढले, ज्याप्रकारे लढले तेवढं नाही पण काही अंशी तरी आपण काम केले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

शिवाजी महाराज आणि शाहू महाराज नसते तर या देशात संविधान आकाराला आले नसते. संविधान आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचा थेट संबंध आहे. भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरु आहे. एक विचारधारा शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रतिक असणाऱ्या संविधानाचं रक्षण करते, समानता आणि एकता मानते. ही शिवरायांची विचारधारा आहे. तर दुसरी विचारधारा संविधान संपवण्यासाठी 24 तास काम करत आहे. शिवाजी महाराजांचं संविधान कसं संपवायचं, याचा विचार ते 24 तास करतात. देशातील संस्थांवर आक्रमण करतात, लोकांना धमकावतात आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन डोकं टेकतात. तुम्ही शिवरायांच्या पुतळ्यासमोर डोकं ठेवत असाल तर तुम्हाला संविधानाचे रक्षण करावे लागेल. ही लढाई शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरु आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच विचारधारेच्या लोकांनी रोखून धरला. त्यामुळे ही लढाई नवी नाही, तर हजारो वर्षांपासूनची आहे,  असे राहुल गांधी यांनी म्हटले.

आणखी वाचा

मुंबई मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, आरे ते बीकेसी भूमिगत मेट्रो सुरु होणार, तिकीट दर ते फेऱ्या, जाणून घ्या वैशिष्ट्ये

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget