एक्स्प्लोर

Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ

Amol Kirtikar Vs Ravindra Waikar: वायव्य मुंबईतून निवडणूक लढवणारे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बोलणाऱ्या मंगेश पंडलीकर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मोबाईलबाबत धक्कादायक खुलासा

मुंबई: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर (Ravindra Waikar) यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर (Mangesh Pandilkar) आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव (Dinesh Gurav) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता तपासात पंडीलकर ईव्हीएम यंत्राशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून, लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे.

मिड-डे दैनिकाच्या माहितीनुसार, मंगेश पंडीलकर ज्या फोनवर बोलत होता, तो फोन ईव्हीएम यंत्राला जोडलेला होता. ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी एक ओटीपी जनरेट होतो. हा ओटीपी ज्या मोबाईल फोनवर आला होता, तोच फोन मंगेश पंडीलकर याच्या हातात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोरेगावमधील नेस्को मतमोजणी केंद्रावर याच मोबाईल फोनचा वापर करुन 4 जून रोजी सकाळी ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आल्या होत्या. 

वनराई पोलिसांनी याप्रकरणी मंगेश पडीलकर आणि दिनेश गुरव यांना नोटीस पाठवली असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच पोलिसांनी मंगेश पडीलकर याने वापरलेला फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. या फोनमधील डेटा आणि फिंगरप्रिंटची तपासणी केली जाणार आहे. 

नेमकं काय घडलं?

नेस्को मतमोजणी केंद्रावर 4 जूनला रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर हे दोघेही उपस्थित होते. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी झाल्यानंतर  इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेल्या पोस्टल बॅलेटची  मोजणी करण्यात आली. ही पोस्टल बॅलेट सिस्टीम अनलॉक करण्यासाठी दिनेश गुरव याने ज्या मोबाईलवर ओटीपी पाठवला होता, तोच फोन मंगेश पंडीलकरच्या हातात होता. ईव्हीएम यंत्रांतील मतांची मोजणी सुरु असताना अमोल कीर्तिकर आघाडीवर होते, त्यांच्याकडे जवळपास 2000  इतके मताधिक्य होते.  मात्र, इलेक्ट्रॉनिक बॅलेट सिस्टीममधील मतांची मोजणी सुरु झाल्यावर रवींद्र वायकर आघाडीवर गेले आणि कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला.

पोलिसांचं म्हणणं काय?

या सगळ्या प्रकरणावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही मंगेश पंडीलकर ज्या फोनवर बोलत होता, तो फोन तपासणीसाठी पाठवला आहे. या फोनमधील कॉल रेकॉर्डसची तपासणी केली जाईल. या मोबाईल फोनचा वापर अन्य कोणत्या कारणासाठी झाला का, हेदेखील पाहिले जाईल. आम्ही इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून मंगेश पंडीलकर आणि दिनेश गुरव यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल. ते दोघेजणही आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यांनी सहकार्य करण्याचे थांबवल्यास दोघांविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

आणखी वाचा

रवींद्र वायकर 48 मतांनी जिंकले, आधी विजयी घोषित केलेले अमोल किर्तीकर हरले, सुपर ओव्हरला लाजवणारा थरार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!Tanaji Sawant PC on Son Kidnapping| घरात वाद, चार्टर प्लेन, मुलगा कुठं गेला? तानाजी सावंत म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
Embed widget