एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर

भाजपच्या कडाडून विरोधाला न जुमानता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई मनपाची जबाबदारी नवाब मलिक यांच्याच खांद्यावर कायम ठेवली आहे.

Ajit Pawar on Nawab Malik: महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच मुंबईत विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. या बैठकींमध्ये संभाव्य आघाड्या आणि उमेदवारांविषयी चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती या दोन्ही आघाड्या मनपा निवडणुकीत एकसंध राहणार का? अशीही चर्चा आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र आली असली, तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदांमुळे चर्चा रंगली आहे. 

मुंबई मनपाची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडेच 

भाजपच्या कडाडून विरोधाला न जुमानता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई मनपाची जबाबदारी नवाब मलिक यांच्याच खांद्यावर कायम ठेवली आहे. भाजप आणि शिवसेनेचा विरोध सुरु असतानाच त्यांनी जबाबदारी कायम ठेवली आहे. त्यामुळे महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी एका समवन्वय समितीची स्थापना करण्यात येण्याची शक्यता आहे. मंत्री अदिती तटकरे, मुंबईचे दोन कार्याध्यक्ष, आमदार सना मलिक यांची एकत्रित समिती स्थापन होण्याची शक्यता आहे. अदिती तटकरे मुंबईच्या संपर्कमंत्री असून महायुतीत चर्चेसाठी त्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही

दरम्यान, नवाब मलिक यांना विरोध करत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले होते की, “जर नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे नेते असतील, तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. त्यांच्या विरोधात गंभीर आरोप आहेत.” भाजपने स्पष्ट केले आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील गटाशी ते मुंबईत आघाडी करणार नाहीत. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कारवायांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाचा आरोप आहे. त्यांना 2022 मध्ये अटक करण्यात आली होती, आणि ते सध्या जामिनावर आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.

या आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण म्हणाले, “प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुंबईतील भाजप नेत्यांनी महायुतीतील एकतेला धक्का लागू न देणे महत्त्वाचे आहे.” दुसरीकडे, मुंबईत राष्ट्रवादीसाठी नवाब मलिक महत्त्वाचे नेते आहेत. मुंबईत पक्षाची संघटनात्मक ताकद कमी असली तरी, नवाब मलिक यांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेमुळे मुस्लिम आणि दलित मतदारांवर प्रभाव आहे. दरम्यान, राज्यस्तर आघाड्यांबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यातील 29 शहरी भागांपैकी बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र लढतील, पण मुंबईत राष्ट्रवादीबाबत निर्णय वेगळा असू शकतो.”

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Single Window Clearance : राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
INFOCOM Mumbai : 'इन्फोकॉम' परिषदेत आयटी मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती; एआय आणि डिजिटल परिवर्तनावर मंथन
'इन्फोकॉम' परिषदेत आयटी मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती; एआय आणि डिजिटल परिवर्तनावर मंथन
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
Monsoon Rain El NINO: महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget