एक्स्प्लोर

दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात अन् बायकोला घालतात, पाकीटमार कधीतरी पकडला जातो; आव्हाडांची अजितदादांवर टीका

Maharashtra Politics: जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. अजित पवार यांना सुरुवातीपासूनच भाजपसोबत जायचे होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. भाजपसोबत जाण्यासाठीच्या पत्रावर सह्या करण्याच्या प्रस्तावाला मी विरोध करु शकलो नाही

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेले आहे.  दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन ते बायकोला घालू शकतात. पण येणारा काळच ठरवेल की, कोणतं मंगळसूत्र खरं आहे. पाकीटमार हे कधीतरी पकडला जातोच, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. ते गुरुवारी 'एबीपी माझा'च्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात बोलत होते.  2019 ला शरद पवार यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले, ही सर्वात मोठी चूक होती. कारण एकदा गद्दारी केल्यानंतर ती व्यक्ती कायमच गद्दार असते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

तेव्हा अजित पवारांविरोधात बोलण्याचं धाडस माझ्यात नव्हतं: जितेंद्र आव्हाड

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पक्षाच्या सर्व आमदारांनी भाजपसोबत जाण्याच्या पत्रावर सह्या केल्या होत्या. मात्र, हे पत्र शरद पवार यांच्याकडे जाणार होते. मला ही गोष्ट मान्य नव्हती. पण तेव्हा अजित पवार यांच्यासमोर बोलण्याचे धाडस माझ्यात नव्हते. त्यामुळे मी या पत्रावर सही केली होती. बैठक संपल्यानंतर मी जयंत पाटील यांना गाठून त्या पत्रावरील माझे नाव आणि सही खोडा, असे सांगितले होते. अजित पवार हे तेव्हा शरद पवार यांच्या सावलीत होते. त्यामुळे काय होईल,याची कल्पना नव्हती. त्यामुळे भाजपसोबत जाण्यासाठीच्या पत्रावर सह्या करण्याच्या प्रस्तावाला मी विरोध करु शकलो नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदे ज्यादिवशी शिवसेनेतून फुटून बाहेर पडले तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. तेव्हा अजित पवार सतत फोनवर कोणाशी तरी बोलत होते. तो फोन कोणाचा होता, माहिती नाही. तेव्हा बहुसंख्य आमदार म्हणाले, चला अजितदादा भाजपमध्ये जाऊ. निफाडचा आमदार म्हणाला शरद पवार यांना एकटं काढा, आपण सगळेच जाऊ. या पातळीपर्यंत तयारी झाली होती, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

शरद पवारही माणूस आहे, त्यांनाही वेदना होत असतील: जितेंद्र आव्हाड

शरद पवारही एक माणूस आहे. त्यालाही हृदय आहे. एकांतात असताना त्यांनाही वाटत असेल, माझं काय चुकलं? पाण्यात पोहणाऱ्या माशाला अश्रू येत नाही म्हणजे तो रडत नाही, त्याला वेदना होत नाही, असं वाटतं का? शरद पवार हे विचार करत असतील, मी हसन मुश्रीफांना कुठून कुठे आणलं? कागलमध्ये 98 टक्के मराठा आणि बहुजन समाज आहे. मात्र, या मतदारसंघात उमेदवारी देऊन हसन मुश्रीफांना निवडून आणलं, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. सुनील तटकरे यांना शेकापचा विरोध असताना 1999 साली मंत्री करणं शक्य होतं का? भुजबळांचे सगळे स्कॅम असूनही 2020 मध्ये मंत्रिमंडळात पहिल्या तिघांमध्ये त्यांना शपथ दिली, याकडे जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा

सुनील तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची, त्यांना विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावीच लागेल, नाहीतर..., भरत गोगावलेंचा थेट इशारा

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget