Girish Mahajan on Nashik Tree Cutting: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचीही भेट घेईन...; गिरीश महाजनांचं विधान, तपोवन वृक्षतोडीविरोधात स्पष्ट केली भूमिका
Girish Mahajan on Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. आता यावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे.

Girish Mahajan on Nashik Tree Cutting: नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला मोठ्या प्रमाणावर वेग आला असून, साधू-महंतांच्या निवासासाठी तपोवन (Tapovan) परिसरातील 1150 एकरांवर साधूग्राम (Sadhugram) उभारण्याची योजना आहे. या कामासाठी 1800 झाडांची तोड (Nashik Tree Cutting) प्रस्तावित असल्याने स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींच्या तीव्र नाराजीचा उद्रेक झाला आहे. तसेच अभिनेते सयाजी शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील तपोवन वृक्षतोडीचा कडाडून विरोध केलाय. मनसे आणि ठाकरे गटाकडून वृक्षतोडीविरोधात तपोवनात आंदोलन देखील छेडले आहे. तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे. आता यावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे.
Girish Mahajan on Nashik Tree Cutting: नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
गिरीश महाजन म्हणाले की, आम्ही पंधरा हजार झाडे नाशिकमध्ये लावू, रिप्लांट करू. साधू ग्राम येथे एकही झाड आम्ही तोडणार नाहीत. काही जी छोटी मोठी झाडे आहेत, ती कापावी लागतील. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा चर्चा मी करेल. त्यांचे जे काही ऑब्जेक्शन आहे, त्यावर आमची चर्चा करू. वृक्षप्रेमी आणि राजकीय नेत्यांची जी भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे. आधी आम्ही या वृक्षप्रेमींना 15000 झाडे दाखवू. त्यानंतरच आम्ही पुढे जे काही करायचं तो निर्णय घेऊ. सयाजी शिंदे यांच्यासोबत सुद्धा माझी चर्चा झाली. मी जेव्हा हैदराबादला होतो, तेव्हा त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यांची भूमिका मी समजून घेतली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Girish Mahajan: नाशिकमध्ये 15 हजार देशी झाडांची करणार लागवड
दरम्यान, नाशिकच्या तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधातील पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडूनही महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिक शहरातील विविध ठिकाणी तब्बल 15 हजार झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दक्षिण भारतातील राजमुद्री येथून ही झाडे आणण्यात येणार आहेत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः राजमुद्री येथे भेट देत अंदाजे 15 फूट उंचीची सुमारे 15 हजार देशी झाडे लिंब, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड आदींची निवड केली आहे. ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर करून या झाडांची देखभाल मनपा उद्यान विभागामार्फत केली जाणार आहे. यातील पहिली एक ते दोन हजार झाडांची खेप येत्या आठवड्यात नाशिकमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
























