एक्स्प्लोर

T20 World cup: विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 11 खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी BCCIचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांचा सभात्याग

Team India World cup Final: विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात विरोधकांना बोलून देत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. टीम इंडियाच्या खेळाडुंच्या अभिनंदनाच्या मुद्द्यावरुन वाद.

मुंबई: भारतीय संघाने शनिवारी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्वेन्टी-20 क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता. यानंतर देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, सोमवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी विधानपरिषदेत विश्वचषक (T 20 World Cup) जिंकल्याबद्दल भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, यावेळी टीम इंडियातील (Team India) 11 खेळाडुंचे अभिनंदन करण्याऐवजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) कोषाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या मुद्द्यावरुन उपसभापती निलम गोऱ्हे सभागृहात बोलून देत नसल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभात्याग केला.

सभागृहातून बाहेर पडल्यानंतर विरोधकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अंबादास दानवे यांनी सांगितले की, विधानपरिषदेच्या उपसभापती विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलून देत नाहीत. सत्ताधारी लोक काहीही बोलतात आणि त्यांना परवानगी दिली जाते. भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला. त्यासाठी सभागृहात भारतीय संघातील 11 खेळाडुंचे अभिनंदन करायला पाहिजे होते. पण भाजपचे नेते म्हणतात बीसीसीआयचे कोषाध्यक्ष शेलार यांचे अभिनंदन करा. खरंतर विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडुंचं अभिनंदन केले पाहिजे, संघाचे अभिनंदन केले पाहिजे. कारण, ते मेहनत करतात, परिश्रम घेतात. रक्ताचं पाणी करुन देशाचं नाव उंचावतात. ते सोडून बीसीसीआयमध्ये असणाऱ्या भाजपच्या लोकांचं अभिनंदन केलं जातं. हा भारतीय खेळाडुंचा अपमान आहे, देशाचा अपमान आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. 

भाजपला देशाशी काही देणंघेणं नाही. त्यांना स्वत:चे नेते, स्वत:चा पक्ष आणि स्वत:ला ओवाळून घेण्यातच रस आहे. हा तूप लावून चमचेगिरी करण्याचा प्रकार आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. यावर आता विरोधक काय बोलतात, हे पाहावे लागेल.

भारतीय संघाने विश्वचषक जिंकून 17 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा अंतिम सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. भारताचे आफ्रिकेसमोर विजयसाठी 177 धावांचे लक्ष्य  ठेवले होते. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांमध्ये कमाल केल्याने टीम इंडियाने 7 धावांनी थरारक विजय मिळवला होता. भारतीय संघाच्या या विजयामुळे देशभरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. बीसीसीआयनेही भारतीय खेळाडुंवर बक्षिसांची खैरात केली आहे. 

आणखी वाचा

विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियावर प्रेमाचा वर्षाव; तुळजाभवानी मंदिर परिसरात 201 किलो पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget