एक्स्प्लोर

सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांची वाताहत, सिंचन क्षेत्रातही घट, शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त 

पालघर येथे उभारण्यात आलेले धामणी धरणातून पालघर,  डहाणू आणि विक्रमगड या तीन तालुक्यांमधील 14 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली गेली. या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यास देखील मदत झाली. 

पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यात आदिवासी उपाय योजनेतून कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी धरणाची उभारणी केली. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी हा उपयायोजना करण्यात आली होती. पण दिवसागणिक सूर्या प्रकल्पांच्या कालव्यांची वाताहत होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे सिंचन क्षेत्रात घट होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शासनाने डोळ्यासमोर ठेवलेला हा उद्देश सध्या धुसर होत चालल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे शेतकरी वर्गातून देखील तीव्र नाराजीचे सूर उमटत चालले आहेत. 

पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर शेती झाल्यानंतर पालघर मधील ग्रामीण भागातील अनेक कुटुंब ही रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित होतात. हेच स्थलांतरण रोखण्यासाठी शासनाने आदिवासी उपाय योजनेतून कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत धामणी येथे धरण उभारण्याचा निर्णय घेतला.  या धरणातून पालघर,  डहाणू आणि विक्रमगड या तीन तालुक्यांमधील 14 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली गेली. या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यास देखील मदत झाली. 

कालव्यांची अवस्था दयनीय

पण सध्या या कालव्यांची स्थिती मात्र गंभीर झाल्याचं सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणारे कालवे आणि मुख्य कालव्यांचीच दयनीय अवस्था झालीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आहे.  अनेक ठिकाणी कालव्यांना भगदाड पडलीयेत. यामुळे सिंचनाखाली येणारे क्षेत्र कमी होत असल्याने येथील अनेक कुटुंबांवर पुन्हा एकदा स्थलांतरणाची वेळ ओढवली. म्हणून येथील कालव्यांची सुधारणा करुन नंतरच पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. 

सिंचन क्षेत्रात घट

सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून उजवा तीर कालवा आणि गावातील कालवा या कालव्यांमार्फत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवलं जातं.  धरण उभारलं त्यावर्षी जिल्ह्यातील 14 हजार क्षेत्र ओलिताखाली आणण्यात आलं  होतं. आता मात्र कालव्यांची झालेली दुरावस्था आणि सिंचनाला देण्यात आलेलं महत्त्व यामुळे सिंचन क्षेत्र दिवसेंदिवस घटताना  दिसून येतेय.  यामुळे जोपर्यंत कालव्यांची सुधारणा केली जात नाही तोपर्यंत कॅनलमार्फत पाणी न सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. 

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने सध्या या कालव्यांच्या दुरुस्तीकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केल्याचं देखील म्हणणं आहे. त्यामुळेच हे कालवे अनेक ठिकाणी जीर्ण झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे पाण्याचा अपव्यय देखील होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान होऊ शकते. म्हणूनच शेतकऱ्यांनी केलेली कालव्यांची दुरुस्तीची मागणी पाटबंधारे विभाग आता तरी गांभीर्याने घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा :

 Kalyan Water Supply : कल्याण डोंबिवलीसाठी स्वतंत्र धरण मिळणार? प्रशासनाच्या हालचाली पुन्हा सुरू असल्याची माहिती

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो

व्हिडीओ

Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Embed widget