एक्स्प्लोर

Nashik News : उद्धव ठाकरेंची वक्तव्ये एकदम बालिश, त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, मंत्री गिरीश महाजन यांचे टीकास्त्र 

Nashik Girish Mahajan : जळगाव (Jalgaon) येथील सभेनंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे.

नाशिक : उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यावर सगळे लोक हसायला लागले असून त्यांच्या मागे कोणी नसल्याने ते अस्वस्थ आहेत. तसेच मनात येईल ते बोलत सुटलेत. का उद्धव ठाकरे यांच्याच मनात काही काळेभेर नाही ना? हे तपासून बघितलं पाहिजे. सतत बालिश वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करत आहेत. खरं तर उद्धव ठाकरे यांचीच चौकशी झाली पाहिजे, पोलिसांनी यांनाच ताब्यात घेऊन जाब विचारला पाहिजे, अशा शब्दांत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

नुकतीच उद्धव ठाकरे यांची जळगावमध्ये (Jalgaon) सभा पार पडली. या सभेत राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिरसाठी देशभरातून माणसे बोलवतील आणि परत जाताना गोध्रा घडवतील. जाळपोळ करतील, त्यावर आपली पोळी भाजतील. निवडणूक (Elections) आल्यावर घरांच्या होळ्या पेटतील आणि त्यांच्या ते पोळ्या भाजतील, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तरं दिले आहे. महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे अतिशय बालिश स्टेटमेंट करत आहे. त्यांच्या मनात काही काळभेर नाही ना? त्यांना तर असं काही करायचं नाही ना अशी शंका यायला लागली असून संजय राऊत हे लोकांना उकवायला लागले आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांनाच काही घडून तर आणायचं नाही ना? यांची चौकशी झाली पाहिजे, पोलिसांनी यांनाच ताब्यात घेतलं पाहिजे, असेही महाजन म्हणाले. 

गिरीश महाजन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांच्याबद्दल ते शेलक्या भाषेत आणि खालच्या भाषेत बोलायला लागले. त्यांच्याकडे फक्त दोन-चार लोक राहिले आहेत, तो विषय वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरे बोलत होते, तेव्हा त्यांची मला कीव येत होती. फस्ट्रेशन आल्यानं ते असं बोलत आहे, त्यांच्या मागे कोणी राहिलं नाही, म्हणून ते अस्वस्थ असून आम्हाला त्यांच शारीरिक व्यंग काढायचं नाही. पंतप्रधान यांच्यावर त्यांनी काय बोलावं? त्यांचेच पंतप्रधान होण्याबाबत बॅनर लागले. विरोधी पक्षात आहे, म्हणून त्यांना बोलावं लागतं, पण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? विश्वासार्हता असायला पाहिजे? शिवाय मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले? असे अनेक प्रश्न महाजन यांनी अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवर उपस्थित केले. 

सामना पेपर आता पुसायच्या कामाचा.... 

तसेच उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP) आणि शिवसेनेबाबत (Shivsena) वक्तव्य केले. यावर महाजन म्हणाले की, 25 वर्षे यांनी काय, बाळासाहेबांनी कमळाबाईची पालखी वाहिली का? तुमची स्वतःची पालखी वाहण्यासाठी तुम्हाला चार भोये सुद्धा मिळत नाही. 90 टक्के शिवसेना आमच्यासोबत आहे, त्यामुळे ते काय बोलत आहे, काही कळत नाही. कालच्या भाषेवरून मला वाटलं, त्यांची मनस्थिती चांगली नाही. आमच्याकडे बोलण्यासाठी दहा गोष्टी आम्ही बोलू शकतो. शारीरिक व्यंगावर, हा असा दिसतो, तो तसा दिसतो, आम्हीही बोलू शकतो. पण मर्यादा सोडत नसल्याचे महाजन म्हणाले. तसेच सामना पेपर हा फक्त आता पुसायच्या कामाचा राहिला आहे, त्याला महत्त्व देऊ नका. 48 पैकी एक खासदार निवडून आणून दाखवा. संजय राऊत यांनी सुरक्षित मतदार संघ शोधून निवडून येऊन दाखवावे, असे थेट आवाहन महाजन यांनी दिले. 

इतर महत्वाची बातमी : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 26 February 2025 : ABP Majha : 7 PmABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 February 2025JOB Majha News : केंद्रीय औद्योगित सुरक्ष दलमध्ये नोकरीची संधी,  शैक्षणिक पात्रता काय? 26 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
Embed widget