एक्स्प्लोर

Nashik News : "सांगा शेतकऱ्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा"; कांदा प्रश्नावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये असमन्वय, कोण काय म्हणाले? 

Nashik Onion Issue : कांदा प्रश्नावरून (Onion Issue) राज्य आणि केंद्र सरकारमध्ये असमन्वय आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.

नाशिक : कांदा प्रश्नावरून (Onion Issue) राज्य आणि केंद्र सरकारमध्ये असमन्वय आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. कारण निर्यात शुल्कामुळे कांद्याचे दर पडायला सुरुवात झालेली आहे, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेला आहे. तर हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा, असून स्पर्धेचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने निर्यात शुल्क (Export Duty) वाढवून तब्बल 40 टक्क्यांवर नेल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले. सरकारच्या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीमध्ये घट होणार आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आणि निषेधार्थ आजपासून नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील 15 बाजार समितीच्या बेमुदत काळासाठी बंद राहणार आहे. अशातच या निर्णयाबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या असमन्वय असल्याचे दिसून आले आहे.

एकीकडे मंत्री छगन भुजबळ म्हणतात की, निर्णयाने शेतकऱ्यांचे नुकसान आहे तर केंद्रीय मंत्री भारती पवार म्हणतात की, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असून स्पर्धा निर्माण झाली तरच शेतकऱ्यांचा फायदा असल्याचे वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

डॉ. भारती पवार नेमकं काय म्हणाल्या? 

कांद्याची इतर राज्यात मागणी वाढली आहे. निर्यात खुली आहे. पण काही प्रमाणात कर लावला आहे. आयात करण्याची वेळ न येता, आपल्याच देशात कांदा दिला तर, गैर काय? असा प्रश्न उपस्थित करत नाफेडला 2 लाख मेट्रिक टन कांदा आणखी खरेदी करण्याचे आदेश दिले. कारण ग्राहकाला देखील कांदा उपलब्ध झाला पाहिजे. निर्यात शुल्क वाढविल्यामुळे कांद्याचे दर पडणार नाही, किंवा यामागे निवडणुका हा हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मागणी आणि पुरवठा बघायला हवा, अशातच कांदा महाग झाला, असं राजकारण केलं जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची देखील चिंता वाढते. पण कांदा दर कमी होणार नाही. या संदर्भात पियूष गोयल यांना मागणी करणार आहे, पत्र लिहिणार आहे. या सर्व तारखा निश्चित झालेल्या असतात, सर्व प्रक्रिया होईल. विरोधक चुकीच्या पद्धतीने भडकवत आहे. बाजार समिती लिलाव बंद मागे घेण्याचे आवाहन भारती पवार यांनी केले आहे. 

मंत्री छगन भुजबळ म्हणाले? 

केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढविल्यामुळे अनेक भागातून शेतकरी आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मोठा कर लावल्याने निर्यातीवर परिणाम होणार असून कधी कांद्याचे भाव वाढतात, कधी एकदम शून्य होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान साहजिक आहे. मी लासलगावच्या लोकांना मुख्यमंत्री यांच्याशी भेट घालून देणार आहे. पवार साहेब आणि इतर पक्षाचे नेते यांनाही भेटणार असून या प्रश्नावर काही तोडगा निघतो का, याचा प्रयत्न करू असे सांगत कृषी उत्पादनावर पवार यांची अधिकार असून त्यांचे सहकार्य घ्यायला आम्ही तयार आहोत. सर्वांनी जाऊन काही होत असेल, तर आम्ही निश्चित प्रयत्न करू असेही भुजबळ म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhagan Bhujbal VS Bharati Pawar: कांदा प्रश्नावर केंद्र - राज्यात असमन्वय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget