एक्स्प्लोर

Saptshrungi Devi : अनवाणी पाय, पाचशे किलोमीटरचा प्रवास, नवरात्रीसाठी ज्योत नेण्याची परंपरा कायम, काय आहे ही परंपरा?

Navratri 2023 : नवरात्रीत ज्योत नेण्याची परंपरा कायम असून या प्रवासात रस्त्यात कुठेही थांबले जात नाही, ज्योत कुठेही विझू दिली जात नाही.

नाशिक : नवरात्रीचा उत्सव (Navratri) उद्यापासून सुरु होत आहे. यासाठी महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रसिद्ध देवी मंदिराच्या ठिकाणाहून अखंड ज्योत आणण्याची परंपरा आजही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देवी भक्त नाशिकच्या वणी गडावरून अखंड ज्योत नेण्यांसाठी दाखल होत असून त्यामुळे सप्तशृंगी देवी मंदिर (saptshrungi Devi Mandir) भाविकांनी गजबजलं आहे. अनवाणी पायाने त्या मंदिरापर्यंत गावापर्यंत ज्योत नेऊन घटस्थापना केली जाते. 

साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नाशिकच्या (Nashik) वणी येथील सप्तशृंगी देवी मंदिर (Saptshrungi Gad) नवरात्रीसाठी सज्ज झाले आहे. वर्षभर या गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र नवरात्रीचा हा उत्साह अधिक दिसून येतो. दर्शनासाठी भाविक येतच असतात. मात्र दुसरीकडे नवरात्रीच्या पाच सहा दिवस आधीपासून महाराष्ट्रातील घटस्थापना (Navratri) करणारे मित्रमंडळ वणी गडावर येत अखंड ज्योत घेऊन जात असतात. याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून गडावर ज्योत नेणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असून गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकते प्रचंड संख्येने वाजत गाजत सप्तशृंगीचा उदोउदोचा गजर करत सप्तशृंगी गडावर दाखल होत आहेत.

शारदीय नवरात्रोत्सवास (Navratri 2023) उद्या रविवार पासून प्रारंभ होत असल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह खान्देशमधील भाविक गडावर दाखल होत आहेत. सप्तशृंगगडावरून मशालीद्वारे ज्योत आपापल्या गावी कोणतीही पादत्राणे न घालता घेऊन जाण्याची परंपरा आहे. यात मालेगाव, धुळे, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, जामनेर या भागातील भाविकांचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीही त्यांचा पायी प्रवास सुरू असतो. नवरात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ होत असल्याने घटस्थापनेच्या अखंड दिव्यासाठी सप्तशृंगीदेवीच्या गडावरील ज्योतीला विशेष महत्त्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी दोन-तीन दिवस अगोदरपासून भाविक गडावरील अखंड ज्योत मशालीच्या सहाय्याने आपल्या गावी घेऊन जातात. सप्तशृंगी देवीच्या मंदिरातून ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी सध्या वणी गड गजबजला आहे.

काय आहे ही परंपरा?

नवरात्रोत्सव मंडळे घटस्थापनेपूर्वी मंदिरात येऊन भोगीपूजा करुन आणि भवानी ज्योत प्रज्वलित करुन गावी नेत असतात. अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे. सुरवातीला ज्या गावातील मंडळ असेल अशा ठिकाणाहून वाहनाद्वारे देवीच्या मंदिरात पोहचले जाते. या ठिकाणी ज्योत घेण्यासाठी मंदिरात पूजा करून ही ज्योत पेटवली जाते. यानंतर जो ज्योत घेणारा असतो, तो अनवाणी पायाने गड उतरून गावी मार्गक्रमण करत असतो. अशावेळी मंडळातील अनेक कार्यकर्ते त्याच्यासोबत असतात. त्यानंतर पहिल्या भाविकाने ज्योत घेतल्यानंतर तो काही किलोमीटर चालल्यानंतर दुसरा भाविक ज्योत घेऊन चालत असतो. रस्त्यात कुठेही थांबले जात नाही. त्याचबरोबर या प्रवासात ज्योत कुठेही विझू दिली जात नाही. ज्योत हळूहळू एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशी जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालूच असते. शेवटी ज्योत गावात आणल्यानंतर विधिवत घटस्थापना करून ज्योत उभी केली जाते. ती नऊ दिवस विझू दिली जात नाही. दिवसरात्र ज्योतीत तेल टाकून निरंतर पेटवली जाते. 

इतर महत्वाची बातमी : 

Navratri 2023: नवरात्रीत देवीची अखंड ज्योत कोठे आणि कोणत्या दिशेला लावावी? वास्तुशास्त्रात म्हटंलय...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget