एक्स्प्लोर

Sangamner Balasaheb Thorat : सरकार स्मार्ट सिटी, मेट्रोत व्यस्त, शेतकरी झाला दुय्यम; बाळासाहेब थोरातांचे टीकास्त्र 

Sangamner : शहर मोठी झाली ती शेतकऱ्याच्या कष्टामुळे, हे विसरून चालणार नाही, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर निशाणा साधला.  

Sangamner Balasaheb Thorat : आमचं सरकार ज्या ज्या वेळी सत्तेत होतं त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहताना खर्चाचा विचार न करता मदत करण्याचं काम केलं. आजच्या सरकारमध्ये मात्र शेतकरी दुय्यम झाला आहे. ते आज स्मार्ट सिटी आणि मेट्रोत व्यस्त झाले. मात्र ही शहर मोठी झाली ती शेतकऱ्याच्या कष्टामुळे हे विसरुन चालणार नाही, अशा शब्दात बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सरकारवर निशाणा साधला.  

आज संगमनेर (Sangamner) शहरात राज्यातील कांदाआणि वीजप्रश्नी केलेल्या ठिय्या आंदोलनात बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक भाषण करत सरकरच्या धोरणाचा निषेध केला आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अनेक संकटाना तोंड देत असून विधानसभेत आवाज उठवल्यानंतर आज बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर बसस्थानका समोर ठिय्या आंदोलन (Protest) करत सरकारला धारेवर धरले. कांदा आणि वीजप्रश्नी संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जयश्री थोरात यांच्यासह डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) देखील आंदोलनात सहभागी झाले होते. एका युवा शेतकऱ्याने बळीराजाची व्यथा यावेळी कवितेतून व्यक्त केली.  

तब्बल 2 तास चाललेल्या या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते. तर शिवसेना ठाकरे गटाने मात्र आंदोलनाकडे पाठ फिरवली असल्याचं दिसून आले. बाळासाहेब थोरात यांनी भाषणातून राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली. ते यावेळी म्हणाले की, "यापूर्वी आमचं सरकार ज्या ज्या वेळी सत्तेत होतं त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहताना खर्चाचा विचार न करता मदत करण्याचं काम केलं. आजच्या सरकारमध्ये मात्र शेतकरी दुय्यम झाला आहे. ते आज स्मार्ट सिटी आणि मेट्रोत व्यस्त झाले. मात्र ही शहर मोठी झाली ती शेतकऱ्याच्या कष्टामुळे हे विसरुन चालणार नाही. व्यापारी कवडीमोल भावाने कांदा खरेदी करतो आणि नाफेडला विकतो अशी परिस्थिती आहे."

महाराष्ट्रात जिरवाजिरवीचं राजकरण

राज्याचे प्रश्न सोडवण्याऐवजी काही नेते जिरवाजिरवीचं राजकरण करत आहेत. मात्र एक दिवस तुमची जिरेल हे लक्षात ठेवा, असा टोला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात महसूलमंत्री विखे यांचे नाव न घेता लगावला आहे. तर अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा सरकार आज असतं, उद्या नसतं, तुम्ही नियमाप्रमाणे काम करा.. कोणाचे फोन आले म्हणून जिरवाजिरवीचे उद्योग तुम्ही करु नका, असा दमच बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. मध्यप्रदेशमधील वीज बिल माफीबाबत खूप मोठी भाषण केली. आज अनेक जुनी भाषण व्हायरल होत आहेत. त्यांनी केलं तर आता तुम्हाला का करता येत येत नाही. आज कांदाच नव्हे तर भाजीपाल सुद्धा फुकट देण्याची वेळ आली आहे. 2014 ला गॅस सिलेंडर 350 आज 1100 च्या वर गेली. त्यावेळी 5 रुपये वाढल्यावर टाकीवर बसून घोषणा देणारी बाई कुठे गायब झाली? लबाडी कशी करायची याचं उदाहरण आज दिसत असल्याचं थोरात म्हणाले. 

आमचा विजय नक्की होता..... 

कसबा पोटनिवडणुक निकालावर थोरात म्हणाले की, यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर सर्व्हे सुद्धा झाला होता. त्यांनी सांगितलं होतं महाविकास आघाडी एकत्र लढली तर 34 खासदार निवडून येतील. त्याचा परिणाम कसबा पोटनिवडणुकीत दिसून आला. आम्ही दगड उभा केला तरी निवडून आणू अस म्हणणाऱ्या भाजपला तिथे धूळ खावी लागली. चिंचवडमध्ये सुद्धा बंडखोरी झाली नसती तर आमचा विजय नक्की होता. याचाच अर्थ जनमत आता भाजपच्या विरोधात चाललं आहे. 2024 निवडणुकीवर ते म्हणाले की, 2024 मध्ये संपूर्ण बदल देशाच्या राजकारणात होईल. आता जे दहशत आणि सुडाचे वातावरण आहे, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली आहे, याचा एकत्रित परिणाम 2024 च्या निवडणुकीत दिसेल, असेही ते म्हणाले.

काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण नाही.. 

शिंदे फडणवीस सरकारने एसटी संदर्भात केलेली जाहिरात व्हायरल झाली. याचे पडसाद विधानसभेतही दिसून आले. यावर थोरात म्हणाले की, गतिमान सरकार जाहिरातीत खर्च करण्याऐवजी लोकांच्या मदतीसाठी खर्च केले तर त्याचा उपयोग होईल. जाहिरात देऊन कोणी गतिमान होत नसतं ही वस्तुस्थिती आहे. तर संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ते म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीवर झालेला हल्ला हा राज्यातील कायदा सुव्यवस्था नष्ट झाली आहे, हे स्पष्टपणे दाखवते. तसेच काँग्रेसच्या अतंर्गत वादावर ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण नाही. तुम्ही प्रसिद्ध केलं तेच मला माहित असल्याचे म्हणाले. दरम्यान आज झालेल्या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाने मात्र पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. आजच्या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना

व्हिडीओ

Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Embed widget