एक्स्प्लोर

Rashid Sheikh Passed Away : हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपलं! 40 वर्षे राजकारणात सक्रिय, कोण होते रशीद शेख?

Malegaon News : मालेगावचे आमदार रशीद शेख यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

Former MLA Rashid Sheikh Passed Away : मालेगावचे (Malegaon) माजी आमदार रशीद शेख (Rashid Sheikh) यांचं निधन झालं आहे. रशीद शेख यांचं निधन झाल्याने दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आयेशा नगर कब्रस्तान येथे आज सकाळी 11 वाजता त्यांचा दफन विधी होणार आहे. हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून माजी आमदार शेख रशीद यांची ओळख होती. रशीद शेख मालेगाव मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले होते. 25 वर्ष तत्कालीन आमदार राहिलेले स्व. निहाल अहमद यांचा त्यांनी पराभव केला होता. मालेगाव महानगर पालिकेचे महापौर पदाची धुरा देखील त्यांनी सांभाळलेली होती. 

रशीद शेख यांचं वयाच्या 65 व्या वर्षी निधन

सोमवारी 4 डिसेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अलिकडेच त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना मालेगावच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण, त्यांची तब्येत बिघडली. त्रास वाढल्यामुळे त्यांना नंतर नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलवलण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

40 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय

रशीद शेख मागील 40 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय होते. त्यांनी जनतेचे अनेक प्रश्न सोडवत शहरात विविध पायाभूत सुविधा उभारल्या. शहरातच अनेक विकासकामे राबबली. त्यांनी पाणी आणि गटारे यांचा प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा दिला. यासोबत त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि विकासासंबंधित कामांना प्राधान्य देत जनतेसाठी निस्वार्थ मनानं काम केलं. त्यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, महापौर आणि राज्यमंत्री अशा विविध पदांची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पडली. जनतेच्या मनात त्यांची 'आपला नेता' अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.

रशीद शेख यांची कारकिर्द

हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मालेगाव मतदार संघाचे दोन वेळा ते आमदार राहिले होते. 1999 मध्ये रशीद शेख यांनी मालेगावमधून 25 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या निहाल अहमद यांचा पराभव केला होता. त्यांनी अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी ते काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष होते. रशीद शेख 2017 मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. त्याआधी 1994 मध्ये नगराध्यक्ष होते. ते तीन वेळा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री पद दर्जाचे महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?
Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी
Vidhan Parishad Election 2026: ...तर नाशिक विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, शिवसेनेला जागा सुटली पण भाजप नेत्याच्या उमेदवारी अर्जाने डोकेदुखी वाढली, गणेश गीते माघार घेणार की लढणार?
...तर नाशिक विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, शिवसेनेला जागा सुटली पण भाजप नेत्याच्या उमेदवारी अर्जाने डोकेदुखी वाढली, गणेश गीते माघार घेणार की लढणार?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Embed widget