एक्स्प्लोर

Trimbakeshwer : 'यान चंद्रावर जातं, पण...', ओली बाळंतीण डोलीत तर नवजात मुल कापडात गुंडाळून दवाखान्यात आणलं!

Nashik Trimbakeshwer : सकाळी आईला डोली करून तीन ते चार किलोमीटर पायपीट करून अन् बाळाला पदरात गुंडाळून दवाखाना गाठला. 

नाशिक : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी बांधवांचा संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. कालच देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर 14 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा एका गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला. यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी सकाळी आईला डोली करून अन् बाळाला पदरात गुंडाळून तीन ते चार किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

काल मोठ्या उत्साहात देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन (Indepedence Day) साजरा करण्यात आला. अवघा देश देशभक्तीचे गोडवे गात असताना दुसरीकडे आरोग्य सुविधेअभावी एका माऊलीला स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या रात्री घरातच प्रसूती करण्याची वेळ आली. काही दिवसांपूर्वीच इगतपुरी (Igatpuri) येथील महिलेला डोली करून दवाखान्यात नेल्याचं समोर आलं. यानंतर यंत्रणा फक्त हलल्या, त्यावर उपाययोजना झाल्याचं नाहीत. पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातीलच त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील खैरायपाली ग्रामपंचायत अंतर्गत येणारा माचीपाडा (Machipada) येथील स्वातंत्र्यदिनीच विदारक परिस्थिती समोर आली आहे. माचीपाडा ते प्राथमिक आरोग्य केंद्र तीन ते चार किलोमीटरचा रस्ता, 14 ऑगस्ट रोजी उशिरा येथील एका महिलेला प्रसूतिवेदना सुरु झाल्या, मात्र गावात रस्ता नसल्याने जाण्यायेण्याचे साधनही नव्हते, म्हणून घरीच प्रसूती झाली. तर काल सकाळी डोली करून बाळासह महिलेला दवाखान्यात आणण्यात आले. 

खैरायपाली ग्रामपंचायत अंतर्गत येणारा माचीपाडा येथील सरला ज्ञानेश्वर बाम्हणे (Sarala Bramhane) या गर्भवती महिलेस 14 ऑगस्ट रोजी सायंकाळपासून प्रसूती वेदना सुरु झाल्या. गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र अवघ्या चार ते पाच किलोमीटर ठाणापाडा या गावाजवळ आहे. मात्र गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत येण्यास रस्ता नसल्याने त्या महिलेची रात्री 2 वाजेच्या सुमारास घरीच प्रसूती करावी लागली. अशातच दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेणं गरजेचे असल्याने सकाळी डोली करावी लागली, आईला डोली करून तर पदरात गुंडाळून दवाखान्यापर्यंत न्यावं लागले. ठाणापाडा येथील आश्रमशाळेपर्यंत गावातील तरुणांनी डोली करून आणली. या ठिकाणी रस्त्यावर आणल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राची गाडी आली, या गाडीने काही अंतरावर दवाखान्यापर्यंत नेलं. 

रस्त्याअभावी रुग्णांचे हाल... 

माचीपाडा ते ठाणापाडा आश्रम शाळापर्यंत 2 ते 3 कि. मी. पक्का रस्ता अद्याप नसून गावची लोकसंख्या 195 च्या आसपास आहे. माचीपाडा घरांची संख्या 27 ते 30 असुन शाळा पाचवीपर्यंत आहे. शाळेसाठी ग्रामस्थ यांनी श्रमदानातून एक खोली बांधकाम केले असुन पाचवीपर्यंत एकच शिक्षक आहे. मुली 9 मुले 9 असे एकूण 18 विद्यार्थी संख्या असुन अंगणवाडी बांधली आहे. गावात जुनी विहीर असुन जलजीवन विहीर अद्याप झालेली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे, मालकीच्या जमिनीत 4 घरे असुन बाकी महामंडळ जमीनीत आहेत, असे ग्रामस्थ सांगतात. यापूर्वी रस्त्याविना सर्प दंश झालेले पेशंट देविदास तुकाराम सापटे यांचे निधन झाले. झाडावरून पडलेला संदीप नावजी टोकरे याचे देखील वेळेवर उपचार न झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. रस्ता नसल्याने डोली शिवाय माचीपाडा ग्रामस्थ यांना पर्याय नसतो म्हणून उपचारासाठी उशीर झाल्याने पेशंट दगावण्याची शक्यता अधिक असते.

आजही आदिवासी भागातील परिस्थिती जैसे थे... 

एकीकडे यान चंद्रावर जात पण रस्ते होत नाहीत, ही महाराष्ट्रातील अनेक भागातील शोकांतिका असल्याचे वेळोवेळो अधोरेखित होते. काही दिवसांपूर्वीच इगतपुरीची घटना घडली, त्या आधी जिल्ह्यातील पेठ, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अशा घटना समोर आल्या. मात्र नेहमीच झालं आहे. त्या घटनेपुरता राजकीय नेते आश्वासनांचा भडीमार करतात, मात्र नंतर परिस्थिती जैसे थे. आपण स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतरही साध्या पायाभूत सुविधा सुद्धा नागरिकांना बहाल करू शकत नाही, हे वास्तव आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nashik News : मरणसुद्धा परवडत नाही! गर्भवती महिलेला डोली करून दवाखान्यात नेलं, वाटेतच मृत्यू, मृतदेह डोली करूनच आणला! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget