मराठा आरक्षणासाठी आणखी एकानं जीवन संपवलं, 25 वर्षीय तरुणानं उचलंल टोकाचं पाऊल
Maratha Reservation : नांदेडमधील एका तरुणानं आपलं आयुष्य संपवलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे.
![मराठा आरक्षणासाठी आणखी एकानं जीवन संपवलं, 25 वर्षीय तरुणानं उचलंल टोकाचं पाऊल Nanded News 25 year old youth commits suicide to demand Maratha reservation Manoj Jarange Patil Maharashtra Marathi News मराठा आरक्षणासाठी आणखी एकानं जीवन संपवलं, 25 वर्षीय तरुणानं उचलंल टोकाचं पाऊल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/21d504fc9124709d35fbec744f776b111696351295532233_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maratha Reservation : एकीकडे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठ्यांनी एल्गार पुकारला आहे. परंतु, दुसरीकडे आरक्षणासाठी अनेक मराठा आंदोलक (Maratha Protestors) टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी होत असलेल्या आत्महत्यांचं सत्र काही थांबण्याच नाव घेत नाही. आरक्षणासाठी आणखी एका तरुणानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. नांदेडमधील (Nanded) एका 25 वर्षीय तरुणानं मराठा समाजाला (Maratha Samaj) आरक्षण मिळावं या मागणीसाठी विष प्रशान करून आत्महत्या केली आहे.
नांदेडपासून जवळच असलेल्या मरळक येथली घटना आहे. दाजीबा रामदास शिंदे असं मृत तरुणाचं नाव आहे. 11 नोव्हेंबरला विष प्रशान केल्यानंतर दाजीबा कदमला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. दाजीबा कदम यांच्याजवळ एक सुसाईड नोटही आढळून आली. सुसाईड नोटमध्ये समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे, असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आला होता. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून दाजीबाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
दाजीबा कदम हा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता, दाजीबा कदम यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. आरक्षण नसल्यामुळे दाजीबा काही करू शकला नाही, तसेच त्याच्या वडिलांनी त्यांची दीड एकर शेती विकली होती, असं मृत दाजीबाच्या भावानं सांगितलं, शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करू, असं तहसीलदार विजय आवधान यांनी सांगितलं. तसेच, मराठा आरक्षणावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी विठ्ठल पावडे यांनी केली आहे.
जरांगेंचा महाराष्ट्र दौरा, आत्महत्या रोखण्यासाठी करणार आवाहन...
मनोज जरांगे हे 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहे. एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे. विशेष म्हणजे आपल्या या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे हे आरक्षणासाठी आत्महत्या करू नका असे आवाहन करणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय'?; विजेच्या तारांना पकडून तरुणाची आत्महत्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)