एक्स्प्लोर

NMC News : लोकसहभागातून 'स्वच्छ मोहल्ला स्पर्धा' ; विजेत्या भागात 25, 10, आणि 5 लाखांची अतिरिक्त विकासकामे

Nagpur News : विजेत्यांना बक्षीसांमध्ये जाहिर रक्कमेचे मोहल्ल्यामध्ये विकासकामे करण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांसाठी 3 मोहल्ल्यांची निवड केली जाईल. त्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये असे 75 लाख रुपये बक्षीस मिळेल.

Nagpur News : शहराला स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेसाठी मनपाद्वारे (NMC) महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका (nagpur municipal corporation) आणि नागपूर@2025 यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित स्वच्छ मोहल्ला स्पर्धेत एखाद्या नगराचे किंवा भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नागरिकांचा कोणताही समूह सहभागी होऊ शकतो, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार दिली.

स्वच्छ मोहल्ला स्पर्धेसंदर्भात माहिती देण्यासाठी मनपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, नागपूर@2025 चे प्रमुख शिवकुमार राव, संयोजक निमिष सुतारिया, मल्हार देशपांडे, किरण मुंधडा, योगेश अनेजा, अजिंक्य टोपरे, अग्रवाल. आदी उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...

  • मोहल्ला या भागात 200 पेक्षा कमी आणि 500 पेक्षा जास्त घरे नसावीत. 
  • मोहल्ल्यातील प्रतिनिधी 8380002025 या व्हॉट्सॲप क्रमांकावरुन किंवा ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून स्पर्धेसाठी अर्ज दाखल करु शकतात किंवा ऑफलाईन माध्यमातून, नागपूर महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात छापील अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. झोन कार्यालयातून आवश्यकतेनुसार अधिक माहिती आणि मदत मिळू शकेल.
  • मोहल्ल्यातील एका परिसरातील किमान दहा कुटुंबांची संबंधित अर्जावर स्वाक्षरी असणे किंवा स्पर्धेतील सहभागाला त्यांचा पाठिंबा असणे, आवश्यक आहे. 

स्पर्धेचा कालावधी, गुणांकन आणि पुरस्कार

1. ही स्पर्धा 31 मार्च 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.
2. स्पर्धेसाठी अर्ज प्राप्त होताच, मोहल्ल्याचे मूल्यांकन करण्यात येईल. या माध्यमातून मोहल्ल्याचे निर्धारित मापदंडांनुसार मूल्यांकन होईल.
3. नागपूर शहरातील नामांकित वर्तमानपत्रांच्या संपादकांच्या मार्गदर्शनात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या चमूमार्फत मूल्यांकन करण्यात येईल.
4. स्पर्धेचा अंतिम निर्णय एप्रिल 2023 मध्ये जाहीर करण्यात येईल.

मूल्यांकन करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे आणि मापदंड

1. कचऱ्याचे वर्गीकरण, डोअर टू डोअर आणि फाटकापर्यंत हिरवा कचरा जमा करणे (ओला किंवा जैवविघटनशील कचरा)
2. कचरा दररोज मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून उचलला जायला हवा.
3. मोहल्ल्यातील प्रत्येक दुकान आणि विक्रेत्याने एकदा वापरुन फेकावयाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली असावी.
4. नागरिकांकडून स्वच्छता अॅपचा वापर
5. ओल्या कचऱ्यातून कंपोस्टची निर्मिती
6. सर्व नागरिकांना, दुकानांमध्ये जागरुकता अभियान, स्वच्छतेविषयक संदेश देण्यात यावा.
7. विविध कंपन्या किंवा मनपाच्या उपक्रमांमधील बांधकामाचा कचरा परिसरात टाकण्यास बंदी आणि यासाठी परिसराची नियमित साफसफाई केली जाणे आणि त्यावर देखरेख असणे.
8. स्वच्छ उद्याने, सार्वजनिक जागा, वाहनतळ (पार्किंग) आदींची स्वच्छता
9. कचरा व्यवस्थापन/किंवा स्वच्छतेविषयक अभिनव योजना/संकल्पनांची आखणी
10. प्राणी आणि कुत्र्यांच्या घाणीचे व्यवस्थापन
11. मनपाच्या चमूकडून सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन सांडपाण्यावर प्रक्रिया, सहज उपलब्धता आणि स्वच्छता
12. ब्लॅक स्पॉट अर्थात कचराकुंड्यांचा निचरा आणि पुन्हा साचू नये, यासाठी देखरेख
13. मोहल्ला किंवा परिसरात रस्त्यावरील विक्रेते, फिरती दुकाने आणि आस्थापनांमध्ये कचराकुंड्या
14. लाल डाग अर्थात थुंकलेली जागा स्वच्छ करणे आणि त्यात वाढ होऊ नये, यासाठीची काळजी
15. तीन आर म्हणजे पुनर्वापर (रियुझ), वापर कमी करणे (रिड्यूस), पुनः प्रक्रिया (रिसायकल) या त्रिसूत्रीची अंमलबजावणी आणि कोरड्या कचऱ्याचे वर्गीकरण
16. मनपाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सांडपाण्याचा निचरा
17. नागरिक आणि स्वच्छता कर्मचाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कृत किंवा सन्मानित केले जाणे

25 लाखांचे प्रथम पुरस्कार

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बक्षीसांमध्ये जाहीर रक्कमेचे मोहल्ल्यामध्ये विकासकामे करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी तीन मोहल्ल्यांची निवड केली जाईल. तिनही मोहल्ल्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये असे एकूण 75 लाख रुपये बक्षीस मिळेल. दुसऱ्या क्रमांसाठी 5 मोहल्ल्यांची निवड केली जाईल व त्यांना प्रत्येकी 10 लाख असे एकूण 50 लाख रुपये बक्षीस मिळेल. तृतीय पुरस्कार 7 मोहल्ल्यांना प्रदान केले जाईल यामध्ये प्रत्येकी 5 लाख असे एकूण 35 लाख रुपये पुरस्कार असेल. मोहल्ला किंवा आरडब्ल्यूएत सहभागी प्रत्येकाला विकासनिधीच्या स्वरूपात पुरस्काराची रक्कम प्रदान करण्यात येईल.

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@2025 यांच्याकडून सहकार्य

या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांनी लहान शहर किंवा निवासी एककाप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे. यामागची संकल्पना अशी आहे की, मोहल्ला किंवा आरडब्ल्यूए यांनी संबंधित परिसराची मालकी घ्यावी आणि त्या भागाचे सुशासन, मनपाच्या विविध आयुधांचा वापर करावा. त्यासोबतच आपला परिसर स्वच्छ, निर्जंतुक आणि मापदंडांनुसार व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@2025 यांची संयुक्त चमू सहभागी स्पर्धकांना आवश्यक ते सहकार्य तातडीने प्रदान करेल. यासाठी समर्पित मदतक्रमांक आणि सहायक केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. रस्त्यावरील कचऱ्याचे वर्गीकरण, कचरा उचलून नेणे, कचरा उचलून नेण्यासाठी कंत्राटदार, समाजविघातक व्यक्तींची ओळख पटवणे, शौचालयाचे संचालक याशिवाय इतर सर्व पाठिंबा देणाऱ्या सेवा यंत्रणा मोहल्ला/आरडब्ल्यूए यांना आपले अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समर्पित वृत्तीने सहकार्य आणि पाठिंबा देतील. या माध्यमातून अपेक्षित उद्दिष्ट्ये साध्य करता येतील.

ही बातमी देखील वाचा...

ट्विन टॉवर पाडण्यासाठी नागपुरातून स्फोटके ; 3 हजार 700 किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा उपयोग

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget