एक्स्प्लोर

Nagpur Flood : नागपुरात हजारो कार बिघडल्या! 'पावसाच्या पाण्यात बुडालेली कार स्टार्ट करु नका, टो करुन आणा'

Nagpur Flood : नागपूरच्या प्रत्येक कार सर्विसिंग वर्कशॉप समोर पुरात बुडालेल्या कारची रीघ लागली आहे. 500 ते 1000 कार पाण्यामुळे बिघडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नागपूर (Nagpur) : नागपूरच्या प्रत्येक कार सर्विसिंग वर्कशॉप समोर पुरात (Nagpur Flood) बुडालेल्या कारची (Car) रीघ लागली आहे. 500 ते 1000 कार पाण्यामुळे बिघडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तज्ञांच्या मते पाण्यात बुडालेली कार सुकली म्हणून ती सुरु करण्याचा प्रयत्न न करता वर्कशॉपमध्ये टो करुन आणली तर ती पूर्णपणे दुरुस्त होण्याची शक्यता जास्त असते. मात्र कारमालकांनी कार स्वतःहून चालू करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये पाण्यामुळे आणखी नुकसान होऊ शकतं असा तज्ञांचं म्हणणं आहे.

विमा कंपन्यांकडून कारची ए, बी, सी अशी वर्गवारी

कारचा विमा असल्यास पाण्यात बुडालेली कार पूर्णपणे दुरुस्त होऊन विमा कंपनीकडून त्याचा परतावा मिळू शकतो. पाण्यात बुडालेल्या कार संदर्भात विमा कंपन्या ए, बी, सी अशा तीन वर्गवारी करतात. ए वर्गवारीमध्ये कार्पेट एरियापर्यंत पाण्यात बुडालेली कार, बी वर्गवारीमध्ये सीट पर्यंत पाण्यात बुडालेली कार आणि सी वर्गवारीमध्ये डॅशबोर्ड आणि त्याच्या वरपर्यंत पाण्यात बुडालेली कार अशी वर्गवारी असते. कार्पेट एरियापर्यंत पाण्यात बुडालेली कार दोन ते तीन दिवसात दुरुस्त होऊन मिळू शकते. मात्र बी आणि सी वर्गवारीची कार दुरुस्त होऊन मिळण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी जाऊ शकतो असंही तज्ञांचं म्हणणं आहे.

इलेक्ट्रिक व्हेईकल्सना जास्तीत जास्त परतावा

इलेक्ट्रिक व्हेईकलचं पाण्यामध्ये जास्त नुकसान होऊ शकतं. मात्र त्याचाही इन्शुरन्स कंपनीकडून जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो. त्याच्या कुठल्या पार्ट्सचं नुकसान झालं आहे त्यावर नुकसान भरपाई अवलंबून असते.

नागपुरात चार तासात  100 मिमीपेक्षा अधिक पाऊस

उपराजधानीत शुक्रवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. तब्बल चार तास शहरात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु होता. अवघ्या चार तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे अनभिज्ञ असलेले नागरिक आणि प्रशासनाची धावपळ उडाली. या पावसामुळे नागपूर जलमय झाले व शहरात हाहाकार माजला. काही परिसरात तब्बल सहा फुटापर्यंत पाणी साचलं होतं. शहरातील 10 हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी घुसले. अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नागपूरकरांवर आस्मानी संकट कोसळलं होतं.

नागपुरातील पुरात पाच जणांचा मृत्यू

दरम्यान, नागपूरमधील पुरामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विविध घटनांमध्ये पाच जण दगावले आहे. यात दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. एक पुरुष वगळता इतर चौघांची ओळख पटलेली आहे.

हेही वाचा

Devendra Fadanvis: फडणवीसांनी पूरग्रस्तांना केली धक्काबुक्की? भाजपकडून 'त्या' व्हिडीओवर स्पष्टीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget