एक्स्प्लोर

Nagpur Flood : नागपुरात हजारो कार बिघडल्या! 'पावसाच्या पाण्यात बुडालेली कार स्टार्ट करु नका, टो करुन आणा'

Nagpur Flood : नागपूरच्या प्रत्येक कार सर्विसिंग वर्कशॉप समोर पुरात बुडालेल्या कारची रीघ लागली आहे. 500 ते 1000 कार पाण्यामुळे बिघडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नागपूर (Nagpur) : नागपूरच्या प्रत्येक कार सर्विसिंग वर्कशॉप समोर पुरात (Nagpur Flood) बुडालेल्या कारची (Car) रीघ लागली आहे. 500 ते 1000 कार पाण्यामुळे बिघडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तज्ञांच्या मते पाण्यात बुडालेली कार सुकली म्हणून ती सुरु करण्याचा प्रयत्न न करता वर्कशॉपमध्ये टो करुन आणली तर ती पूर्णपणे दुरुस्त होण्याची शक्यता जास्त असते. मात्र कारमालकांनी कार स्वतःहून चालू करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये पाण्यामुळे आणखी नुकसान होऊ शकतं असा तज्ञांचं म्हणणं आहे.

विमा कंपन्यांकडून कारची ए, बी, सी अशी वर्गवारी

कारचा विमा असल्यास पाण्यात बुडालेली कार पूर्णपणे दुरुस्त होऊन विमा कंपनीकडून त्याचा परतावा मिळू शकतो. पाण्यात बुडालेल्या कार संदर्भात विमा कंपन्या ए, बी, सी अशा तीन वर्गवारी करतात. ए वर्गवारीमध्ये कार्पेट एरियापर्यंत पाण्यात बुडालेली कार, बी वर्गवारीमध्ये सीट पर्यंत पाण्यात बुडालेली कार आणि सी वर्गवारीमध्ये डॅशबोर्ड आणि त्याच्या वरपर्यंत पाण्यात बुडालेली कार अशी वर्गवारी असते. कार्पेट एरियापर्यंत पाण्यात बुडालेली कार दोन ते तीन दिवसात दुरुस्त होऊन मिळू शकते. मात्र बी आणि सी वर्गवारीची कार दुरुस्त होऊन मिळण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी जाऊ शकतो असंही तज्ञांचं म्हणणं आहे.

इलेक्ट्रिक व्हेईकल्सना जास्तीत जास्त परतावा

इलेक्ट्रिक व्हेईकलचं पाण्यामध्ये जास्त नुकसान होऊ शकतं. मात्र त्याचाही इन्शुरन्स कंपनीकडून जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो. त्याच्या कुठल्या पार्ट्सचं नुकसान झालं आहे त्यावर नुकसान भरपाई अवलंबून असते.

नागपुरात चार तासात  100 मिमीपेक्षा अधिक पाऊस

उपराजधानीत शुक्रवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. तब्बल चार तास शहरात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु होता. अवघ्या चार तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे अनभिज्ञ असलेले नागरिक आणि प्रशासनाची धावपळ उडाली. या पावसामुळे नागपूर जलमय झाले व शहरात हाहाकार माजला. काही परिसरात तब्बल सहा फुटापर्यंत पाणी साचलं होतं. शहरातील 10 हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी घुसले. अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नागपूरकरांवर आस्मानी संकट कोसळलं होतं.

नागपुरातील पुरात पाच जणांचा मृत्यू

दरम्यान, नागपूरमधील पुरामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विविध घटनांमध्ये पाच जण दगावले आहे. यात दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. एक पुरुष वगळता इतर चौघांची ओळख पटलेली आहे.

हेही वाचा

Devendra Fadanvis: फडणवीसांनी पूरग्रस्तांना केली धक्काबुक्की? भाजपकडून 'त्या' व्हिडीओवर स्पष्टीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रियाDevendra Fadnavis  : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
VC Janardan Rao : 500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
Embed widget