एक्स्प्लोर

भारतमाला... महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय काय?

भारतमाला प्रकल्पाअंतर्गत देशभरात 60 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. 5 लाख 35 हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे.

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काल ‘भारतमाला’ प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला अनेक रस्ते येणार आहेत. ‘भारतमाला’ प्रकल्प काय आहे? भारतमाला प्रकल्पाअंतर्गत देशभरात 60 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. 5 लाख 35 हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे. ‘भारतमाला’ प्रकल्पाचा ध्येय काय? संपूर्ण देशभरात रस्त्यांचं जाळं वाढवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पाअंतर्गत देशभरातील राष्ट्रीय महामार्ग, देशाच्या सीमा आणि सागरी किनारपट्टी क्षेत्र (कोस्टल एरिया) इत्यादींमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पातंर्गत अपूर्ण आंतराराष्ट्रीय प्रकल्पही पूर्ण करण्यात येणार आहेत. भारतमालाप्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?
  • भारतमाला राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत नव्या महामार्गांची बांधणी करण्यात येणार आहे.
  • यामध्ये देशाच्या सीमा, आतंरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीचे विकासप्रकल्पांचाही समावेश आहे
  • या प्रकल्पाअंतर्गत नवनवीन नॅशनल कॉरिडॉर्स उभारण्यात येतील.
  • दुर्गम भाग आणि पर्यटनस्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा नवे महामार्ग बांधले जातील.
  • चारधाम, केदारनाथ,बद्रीनाथ, यमुदनोत्री, आणि गंगोत्री आदी धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येईल.
महाराष्ट्राच्या वाट्याला काय? महाराष्ट्रात मुंबई-वडोदा 420 किमीचा महामार्ग तयार करण्यात येईल. किनारपट्टी क्षेत्रासाठी (कोस्टल एरिया) दिघी पोर्ट-दाभोळ-गुहागर-जयगड पोर्ट-मालवण-वेंगुर्ला-आरोंदा दरम्यान 445 किमीचा महामार्ग विकसित होणार आहे. मुंबई -कोलकाता दरम्यान 1854 किमीचा आणि मुंबई-कन्याकुमारी दरम्यान 1619 किमीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधला जाईल. शिवाय सोलापूर-नागपूर, सोलापूर-गुटी, औरंगाबाद-हैदराबाद आदी इकॉनॉमिक कॉरिडॉर उभारले जातील. शिवाय पुणे, धुळे, सोलापूर, नागपूर आदी शहरामध्येही रिंग रोडसाठीचा प्रस्तावाला या प्रकल्पाअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. इकॉनॉमिक कॉरिडॉर, रिंग रोड, किनारपट्टी क्षेत्रातील मार्ग विकसित करणे इत्यादींमध्ये महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं आहे, ते सविस्तर पाहूया : रिंग रोड :
  • पुणे
  • नागपूर
  • धुळे
लॉजिस्टिक्स पार्क :
  • मुंबई (मुंबई, मुंबई उपनगर, जेएनपीटी, मुंबई पोर्ट, रायगड जिल्हा)
  • पुणे
  • नागपूर
  • नाशिक
फिडर रोड :
  • सोलापूर-अहमदनगर
  • नागपूर-चंद्रपूर
इकॉनॉमिक कॉरिडॉर :.
  • मुंबई-कोलकाता (1854 किमी) : मुंबई-ठाणे-नाशिक-औरंगाबाद-जालना-कारंजा-अमरावती-नागपूर-रायपूर-संभलपूर-देवगढ-खरगपूर-कोलकाता
  • मुंबई-कन्याकुमारी (1619 किमी) : मुंबई-पनवेल-महाड-चिपळूण-पणजी-कारवार- भटकळ-उडिपी-मंगलोर-कन्नूर-कोझीकोड-कोचिन-अलापुझ्झा-कोल्लम-थिरुवनंतपुरम-नागरकॉईल-कन्याकुमारी
  • अमृतसर-जमनानगर (1316 किमी) : अमृतसर-फरीदकोट-भटिंडा-अबोहर-श्री गंगानगर-बिकानेर-नागपूर-जोधपूर-राधनपूर-सम्खियाली-जमनानगर
  • आग्रा-मुंबई (964 किमी) : आग्रा-ग्वाल्हेर-शिवपुरी-गुना-बियाओरा-देवास-इंदूर-सेंधवा-धुळे-मालेगाव-नाशिक-ठाणे-मुंबई
  • पुणे-विजयवाडा (906 किमी) : पुणे-सोलापूर-हैद्राबाद-विजयवाडा
  • सुरत-नागपूर (593 किमी) : सूरत-बारडोली-धुळे-जळगाव-खामगाव-अकोला-अमरावती-नागपूर
  • सोलापूर-नागपूर (563 किमी) : सोलापूर-लातूर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-नागपूर
  • इंदूर-नागपूर (464 किमी) : इंदूर-हरदा-बैतुल-नागपूर
  • सोलापूर-बेल्लारी-गुटी (434 किमी) : सोलापूर-बिजापूर-कुश्तगी-होस्पेट-बेल्लारी-गुटी
  • हैदराबाद-औरंगाबाद (427 किमी) : औरंगाबाद-जालना-नांदेड-देगलूर-संगरेड्डी-हैदराबाद
  • सोलापूर-मेहबूबनगर (290 किमी) : पुणे-शिरुर-अहमदनगर-शनी शिंगणापूर-औरंगाबाद
पोर्ट कनेक्टिव्हिटी :
  • कराड-चिपळूण-जयगड पोर्ट मार्गात वाढ (150 किमी)
  • दिघी पोर्टच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडण्यासाठी 92, 96 आणि 97 राज्य महामार्गांमध्ये सुधारणा (96 किमी)
  • जेएनपीटीमधील राष्ट्रीय महामार्ग-4B, राज्य महामार्ग 54 आणि अमरा मार्गाच्या सहा पदरी रस्त्याचे 8 चं पदरीकरण (44 किमी)
  • निवली ते जयगड मार्गाचं अपग्रेडेशन (42 किमी)
  • सोनुर्ली ते रेडी पोर्ट (29 किमी)
  • वधावन ते राष्ट्रीय महामार्ग 8 जोडणी (25 किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग 4 आणि 8 यांची जोडणी (20 किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग 4 चं कळंबोली ते मुंब्रा दरम्यान सहा पदरीकरण (20 किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग 4 चं चिंचवड ते जेएनपीटी दरम्यान विस्तारीकरण (10 किमी)
  • जेएनपीटीमधील डीपीडब्ल्यू टर्मिनलमध्ये वाढ (5 किमी)
  • जेएनपीटीमध्ये रेल्वे ट्रॅकवरुन फ्लायओव्हर (5 किमी)
  • जेएनपीटीतील वाय जंक्शनवरुन फ्लायओव्हर (2 किमी)
इंटर-कॉरिडॉर :
  • सोलापूर-औरंगाबाद
  • नागपूर-नरसिंगपूर
  • जळगाव (मुख्त्यारपूर)-इंदूर
  • नाशिक-पुणे
  • दौंड-अहमदनगर-शिरडी
  • धुळे-औरंगाबाद
  • नाशिक-वलसाड
  • वर्धा-कारंजा
  • नांदेड-निर्मल (राष्ट्रीय महामार्ग 44)
  • हिंगोली-मेहकर
  • आग्रा-मुंबई ते सूरत-नागपूर
  • कडेगाव सातारा
  • मालेगाव-शिर्डी
'भारतमाला प्रकल्पा'बाबत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी काय म्हणाले? https://twitter.com/nitin_gadkari/status/923189050814722048
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

व्हिडीओ

Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report
Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget