एक्स्प्लोर

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचा निर्णय, कोरोनाच्या स्थितीत अधिक सुलभ प्रवेश प्रक्रिया राबवणार

प्रवेश प्रक्रियेचे माहिती पुस्तक उपलब्ध करून देणे, अर्ज भरणे यापासून ते प्रवेश शुल्क भरणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असून त्या अनुषंगाने प्रणालीत बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाइन अर्जात अपलोड करता येणार आहेत.

मुंबई : एकीकडे कोरोनाच्या सद्यस्थितीचा विचार करत तर मागील वर्षात अकरावी ऑनलाईन प्रवेश परीक्षेदरम्यान आलेले अनुभव आणि विद्यार्थी पालकांच्या तक्रारीनंतर या 2020-21 वर्षासाठीच्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेतला असून त्यात काही बदल करण्यात आले आहेत. आता या प्रवेशप्रक्रियेदरम्यान काम अधिकाधिक ऑनलाईन कसा करता येईल, यावर भर देण्यात आला असून कमी कालावधीत ही प्रक्रिया राबवण्यावर विचार केला आहे.

यंदा जुलै अखेरीस दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील दीड महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव, लांबलेले शैक्षणिक वर्ष यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर संपवणे आवश्यक आहे. त्यानुसार अकरावी प्रवेशाससाठी दरवर्षी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या कॉलेजना प्राधान्यक्रमांनुसार नियमित प्रवेश फेऱ्यांनुसार फेऱ्या होणार आहेत. मात्र नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'या फेरीचे नियोजन केले जाते. मात्र यंदा ही फेरी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी गरज भासल्यास विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल, असं प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर कमीत कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल असे नियोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.

प्रवेश प्रक्रियेचे माहिती पुस्तक उपलब्ध करून देणे, अर्ज भरणे यापासून ते प्रवेश शुल्क भरणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असून त्या अनुषंगाने प्रणालीत बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाइन अर्जात अपलोड करता येणार आहेत. मुंबई महानगर परिक्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

दरवर्षी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या कॉलेजच्या प्राधान्यक्रमांनुसार नियमित प्रवेश फेऱ्या, त्यानंतर रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावरील फेऱ्या आणि यानंतरही राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेऱ्या, असे प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप असते. जूनमध्ये सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया वाढणाऱ्या प्रवेश फेऱ्या, विद्यार्थ्यांच्या तक्रारी यामुळे अगदी ऑक्टोबरपर्यंत लांबते. त्यामुळे यंदाच्या वर्षी ही प्रक्रिया राबवण्यास वेळ कमी असल्याने हे निर्णय घेण्यात आले आहेत.

आरक्षणातील बदल व इतर महत्वाचे मुद्दे - मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता (एसईबीसी) 16 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. - यंदा शासन निर्णयानुसार हे प्रमाण 12 टक्के करण्यात आले. - अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. हे प्रमाण आता चार टक्के करण्यात आले आहे.

प्रवेश फेऱ्यांचे स्वरुप - द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील - नियमित फेऱ्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या होतील. - विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील - नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील - मुंबई आणि पुणे महापालिकेच्या ज्युनिअर कॉलेजांतील 50 टक्के जागा या पालिकेच्या शाळेतून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव राहणार आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

किशोरी पेडणेकर माफी मागत नाहीत तोपर्यंत मुंबई पालिकेचं सभागृह तहकूब, सत्ताधारी नगसेवक आक्रमक, नेमकं प्रकरण काय?
किशोरी पेडणेकर माफी मागत नाहीत तोपर्यंत मुंबई पालिकेचं सभागृह तहकूब, सत्ताधारी नगसेवक आक्रमक, नेमकं प्रकरण काय?
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!
विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, आयपीएलमध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
चेन्नईला मोठा धक्का, IPL मध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Heat Wave: राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
Rajat Patidar: या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
Embed widget