एक्स्प्लोर

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचा निर्णय, कोरोनाच्या स्थितीत अधिक सुलभ प्रवेश प्रक्रिया राबवणार

प्रवेश प्रक्रियेचे माहिती पुस्तक उपलब्ध करून देणे, अर्ज भरणे यापासून ते प्रवेश शुल्क भरणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असून त्या अनुषंगाने प्रणालीत बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाइन अर्जात अपलोड करता येणार आहेत.

मुंबई : एकीकडे कोरोनाच्या सद्यस्थितीचा विचार करत तर मागील वर्षात अकरावी ऑनलाईन प्रवेश परीक्षेदरम्यान आलेले अनुभव आणि विद्यार्थी पालकांच्या तक्रारीनंतर या 2020-21 वर्षासाठीच्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेतला असून त्यात काही बदल करण्यात आले आहेत. आता या प्रवेशप्रक्रियेदरम्यान काम अधिकाधिक ऑनलाईन कसा करता येईल, यावर भर देण्यात आला असून कमी कालावधीत ही प्रक्रिया राबवण्यावर विचार केला आहे.

यंदा जुलै अखेरीस दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील दीड महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव, लांबलेले शैक्षणिक वर्ष यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर संपवणे आवश्यक आहे. त्यानुसार अकरावी प्रवेशाससाठी दरवर्षी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या कॉलेजना प्राधान्यक्रमांनुसार नियमित प्रवेश फेऱ्यांनुसार फेऱ्या होणार आहेत. मात्र नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'या फेरीचे नियोजन केले जाते. मात्र यंदा ही फेरी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी गरज भासल्यास विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल, असं प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर कमीत कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल असे नियोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.

प्रवेश प्रक्रियेचे माहिती पुस्तक उपलब्ध करून देणे, अर्ज भरणे यापासून ते प्रवेश शुल्क भरणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असून त्या अनुषंगाने प्रणालीत बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाइन अर्जात अपलोड करता येणार आहेत. मुंबई महानगर परिक्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

दरवर्षी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या कॉलेजच्या प्राधान्यक्रमांनुसार नियमित प्रवेश फेऱ्या, त्यानंतर रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावरील फेऱ्या आणि यानंतरही राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेऱ्या, असे प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप असते. जूनमध्ये सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया वाढणाऱ्या प्रवेश फेऱ्या, विद्यार्थ्यांच्या तक्रारी यामुळे अगदी ऑक्टोबरपर्यंत लांबते. त्यामुळे यंदाच्या वर्षी ही प्रक्रिया राबवण्यास वेळ कमी असल्याने हे निर्णय घेण्यात आले आहेत.

आरक्षणातील बदल व इतर महत्वाचे मुद्दे - मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता (एसईबीसी) 16 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. - यंदा शासन निर्णयानुसार हे प्रमाण 12 टक्के करण्यात आले. - अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. हे प्रमाण आता चार टक्के करण्यात आले आहे.

प्रवेश फेऱ्यांचे स्वरुप - द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील - नियमित फेऱ्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या होतील. - विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील - नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील - मुंबई आणि पुणे महापालिकेच्या ज्युनिअर कॉलेजांतील 50 टक्के जागा या पालिकेच्या शाळेतून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव राहणार आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण
LPG Gas Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार, नेमकं कारण काय?
घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार, नेमकं कारण काय?
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
Ahilyanagar Crime Adinath Maharaj: तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Shambhuraj Desai Satara ZP Election: साध्या वेषातील 10 -10 पोलीस मला ओढत होते, मला जखम झाली; शंभुराज देसाईंनी सगळं सांगितलं, व्हीप तोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
साध्या वेषातील 10 -10 पोलीस मला ओढत होते, मला जखम झाली; शंभुराज देसाईंनी सगळं सांगितलं, व्हीप तोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Embed widget