एक्स्प्लोर

Sanjay Raut : चंद्रकांत पाटलांकडून बाळासाहेबांचा अपमान, शिंदे राजीनामा देणार का? संजय राऊत यांचा सवाल

चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी विद्ध्वंसावरुन केलेल्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. पाटलांच्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देणार का, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

Sanjay Raut on Chandrakant Patil : राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी मशिदी विद्ध्वंसावरुन केलेल्या वक्तव्याचा संजय राऊतांनी (Sanjay Raut) चांगला समाचार घेतला आहे. पाटलांच्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री राजीनामा देणार का, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, अशा आशयाचं वक्तव्य पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन एकप्रकारे बाळासाहेब ठाकरे यांच्याच भूमिकेवर सवाल उपस्थित केल्याचं म्हटलं जात आहे. त्यावरुन आता राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना टार्गेट केलं आहे.

"एवढे दिवस पळपुटे चंद्रकांत पाटील कुठे होते?" असा थेट सवालही राऊतांनी केला आहे. "चंद्रकांत पाटलांनी थेट बाळासाहेबांचा अपमान केलाय त्यामुळे आता भाजपसोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या त्या 40 लोकांचे काय म्हणणं आहे असा प्रश्न विचारत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिंमत आत्तापर्यंत कधी कुणी दाखवली नव्हती, तुम्ही गुलाम झाल्यामुळे किंवा भाजपने शिवसेना फोडल्यामुळे भाजपचे लोक सातत्याने बाळासाहेबांचा अपमान करत आहेत. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी," असं राऊत म्हणाले. 

बाबरी पाडणारे आमचे शिवसैनिक होते : संजय राऊत

बाबरी तोडल्यानंतर भाजपने पलायन केलं, हा इतिहास आहे. बाबरी तोडणारे भाजपचे किंवा अन्य संघटनांचे कुणी नव्हते ते आमचे शिवसैनिक होते. खरं तर हिंदुत्वावर शिवसेना सोडली असे म्हणतं जे तीर मारतात त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. भाजपने ज्या पळपुट्यांना घेऊन सरकार बनवलंय त्यांच्या दैवतांचा अपमान होतोय. भाजपची हिंमत एवढी वाढलीय की ते आमच्या दैवताचा अपमान करत चिखलफेक करु लागले आहेत. याच चिखलात बसून डॉ मिंधे आणि 40 आमदार सत्ता भोगतायत. पण सत्तेतले मिंधे यावर तोंड उघडणार नसल्याचंही राऊत म्हणाले. 

खरंतर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर राजीनामा देण्याची हिंमत नसेल तर त्यांना शिवसेनेचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचं राऊत म्हणाले. हातात नकली धनुष्यबाण आणि भाजपच्या चड्डीचे नाडे पकडून शिंदे गट अयोध्येत गेले होते. आता यावर त्यांची भूमिका काय असणार असा सवाल राऊतांनी विचारला आहे. चंद्रकांत पाटील यांना इतक्या वर्षांची बोलण्याची गरजच काय होती? असंही राऊत म्हणाले. 

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

बाबरी मशिदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. एका टीव्ही मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. पाटील यांनी एका प्रादेशिक वृत्तवाहिनीमध्ये बोलताना सांगितलं की, “मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विहिंप (विश्व हिंदू परिषद) किंवा दुर्गा वाहिनीचे होते." 

संबंधित बातमी

Chandrakant Patil on Babri Masjid Demolition : बाबरी कुणी पाडली? एकही शिवसैनिकाचा हात नव्हता : चंद्रकांत पाटील

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
Vidhan Parishad Election 2026: पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Embed widget