एक्स्प्लोर

मुख्यमंत्री महोदय येणार म्हणून भर पावसात रस्ता केला अन् मुख्यमंत्र्यांचा दौराच रद्द झाला!

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी बोईसर पालघर मार्गाच्या दुरुस्तीचे काम भर पावसात काल सुरू करण्यात आले. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी पालघर दौराच रद्द केला आहे.  

पालघर : जिल्ह्यात सध्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था असून आज जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते हजेरी लावणार होते. हे सर्व बोईसर पालघर मार्गावरून प्रवास करणार आहेत. यामुळं दौऱ्याआधी या मार्गाच्या दुरुस्तीचे काम भर पावसात काल सुरू करण्यात आले. त्यामुळे कधी नव्हे त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अचानक जाग आल्याचं पाहायला मिळालं. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी पालघर दौराच रद्द केला आहे.  

ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचे दौरे रद्द झाला असल्याची माहिती आहे.  दूर दृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे ,राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत. 

पालघरमध्ये मुख्यमंत्री येणार म्हणून भर पावसात रस्त्याची डागडुजी

जिल्ह्यात डहाणू जव्हार नाशिक,मनोर वाडा भिवंडी तसेच ग्रामीण भागात महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते. बोईसर पालघर रस्त्यावरून ही मोठी रहदारी असून या मार्गाची मागील अनेक महिन्यांपासून दयनीय अवस्था होती. या रस्त्यांवर दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र या रस्त्यांची दुरावस्था काही सुधारलेली येथील स्थानिकांना पाहायला मिळत नाही. मात्र आज पालघर जिल्हा मुख्यालयाचा उद्घाटन समारंभ असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बडे मंत्री उपस्थित राहणार असल्याचं कळल्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाला अचानक जाग आली आणि भर पावसात त्यांनी रस्त्यांच्या डागडुजीचं काम हाती घेतलं. 

नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आल्यानं जिल्ह्यात रोज मंत्री यावे आणि रोज आमचे रस्ते तयार व्हावे अशी अपेक्षा पालघर मधील जनता सध्या करत आहे.  जिल्ह्यात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वर्षाकाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च केला जातो. मात्र असे असताना देखील या रस्त्यांची दुरावस्था फारशी सुधारलेली पाहायला मिळत नाही. जिल्ह्यात पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग असे दोन विभाग या भागाच्या मुख्य अभियंता यांचे ठाणे येथे कार्यालय आहे. मात्र या अभियंत्यांना पालघर करांची रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणारी हेळसांड दिसत नाही.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Sambhajiraje Chhatrapati :स्मारकासाठी कोर्टातून स्थगिती मिळवणाऱ्या वकिलांना शोधावंABP Majha Headlines :  5 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीABP Majha Headlines :  4 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
Embed widget