एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांना कारणे दाखवा नोटीस

हुशार विद्यार्थ्यांना इतके कमी गुण कसे असा प्रश्न पडल्याने, निकाल त्यांना देण्याऐवजी महाविद्यालयांनीच विद्यापीठात धाव घेतली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ सुरुच आहे. ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आलं आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरी निकाल न लागल्याने विद्यार्थी हैराण असताना, आता टीवायबीएससीच्या निकालाचा गोंधळ समोर आला आहे. निकाल लावण्यासाठी पेपर तपासणीचं काम जलद गतीने सुरु असल्याचं विद्यापीठाकडून सांगितलं जात आहे. मात्र विद्यापीठाने फक्त उत्तरपत्रिकांच्या पुरवणी तपासूनच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका वगळून केवळ पुरवणी तपासून तेच गुण त्यांना दिल्याची तक्रार अनेक महाविद्यालयांनीच विद्यापीठाकडे केली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना केवळ 15 ते 20 गुण मिळाल्याने त्यांच्या नावापुढे नापास शेरा पडला आहे. हुशार विद्यार्थ्यांना इतके कमी गुण कसे असा प्रश्न पडल्याने, निकाल त्यांना देण्याऐवजी महाविद्यालयांनीच विद्यापीठात धाव घेतली आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकाच तपासल्याचं समोर आलं. निकाल लावण्यासाठी घाईघाईने केलेल्या कामाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. याबाबत लक्ष घालण्याची मागणी कॉलेज प्राचार्यांनी विद्यापीठाकडे केली आहे. कुलगुरुंना कारणे दाखवा नोटीस दरम्यान, निकालाच्या 15 ऑगस्टच्या तिसऱ्या डेडलाईनला तीन दिवस शिल्लक असताना, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. विद्यापीठाचे सगळ्या विषयांचे निकाल मुदतीत जाहीर न केल्याने राज्यपालंनी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. एखाद्या कुलगुरुला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची घटना मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. संजय देशमुख हे 150 वर्ष जुन्या मुंबई विद्यापीठाचे 54 वे कुलगुरु आहेत. अजूनही 154 निकाल बाकी मुंबई विद्यापीठाचे अजूनही 154 निकाल जाहीर होणं शिल्लक आहे. शुक्रवारी दिवसभरात फक्त 16 निकालच जाहीर झाले होते. 477 पैकी 323 निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाले आहेत. अद्यापही 1 लाख 74 हजार 682 उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. संबंधित बातम्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख सक्तीच्या रजेवर मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या डेडलाईनलाही निकाल नाही : कुलगुरु मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ, कुलगुरू संजय देशमुखांच्या गच्छंतीची शक्यता असा भोंगळ कारभार कधीही पाहिला नव्हता: आदित्य ठाकरे रखडलेले निकाल 5 ऑगस्टला, मुंबई विद्यापीठाची डेडलाईन मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेली सिनेटची बैठक रद्द मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल जाहीर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 पैकी 3 बैठका रद्द मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ, कुलगुरू संजय देशमुखांच्या गच्छंतीची शक्यता मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणं अशक्य, तावडे तोंडघशी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
Embed widget