एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट: मुंबईतील टॉयलेट, एक धक्कादायक कथा!

देशभर मोदींच्या स्वच्छता अभियानाचा गाजावाजा सुरु आहे. जाहिरातींचा भडीमार होत आहे. यात मुंबईला हागणदरीमुक्तीचं सर्टिफिकेट मिळालं. सर्टिफिकेटच्या पेपरावरची शाई वाळण्याआधीच मुंबईतल्या रामगडचं जळजळीत वास्तव समोर आलं आहे.

मुंबई: देशभर मोदींच्या स्वच्छता अभियानाचा गाजावाजा सुरु आहे. जाहिरातींचा भडीमार होत आहे. यात मुंबईला हागणदरीमुक्तीचं सर्टिफिकेट मिळालं. सर्टिफिकेटच्या पेपरावरची शाई वाळण्याआधीच मुंबईतल्या रामगडचं जळजळीत वास्तव समोर आलं आहे. टीव्हीवर दररोज 'दरवाजा बंद कर' ही अमिताभची जाहिरात लागली, की रामगडच्या लोकांचा संताप होतो. त्याचं कारणही तसंच आहे. हे रामगड काही मराठवाडा विदर्भातलं नाही. हे आहे मायानगरी, राजधानी मुंबईच्या पोटातल्या मुलुंडमधलं. डबे घेऊन महिला, पुरुष, म्हातारे कोतारे, पोरंसोरं बोळाबोळातून शौचालयाला जातात. शेवटी सगळे एका रांगेत उभे राहातात. रामगडच्या गल्याबोळात दिवसभर अशीच डब्यांची वर्दळ असते. असं म्हणतात मुंबईकरांचं अर्ध आयुष्य रांगेत जातं. रामगडच्या लोकांची सकाळ अशीच रांगेनं सुरु होते. याच रांगेतून कधीही न सुटणाऱ्या प्रश्नांची नवी रांग सुरु होते. शौचालयाअभावी निर्माण झालेले वेगवेगळे प्रश्न. तासंतास रांगेत उभं राहावं लागतं, ऑफिसला उशीर होतो. बॉस ओरडतो. म्हातारी आजारी माणसं रांगेत तासंतास उभं राहू शकत नाहीत. भांडणं होतात. सकाळ दुपार संध्याकाळ गर्दी गर्दीच असते, असे एक ना अनेक प्रतिक्रिया इथे उमटतात. हे सगळे प्रश्न शौचालयामुळे का निर्माण केले सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. - रामगडमध्ये साधारण 12 चाळीत 18 हजार लोक राहातात - शौचालयांची संख्या हे फक्त 59 आहे, त्यातलेही 3 बंद आहेत. - 357 माणसांमागे केवळ एक शौचालय आहे - पालिकेचं सूत्र आहे 50 माणसांमागे 1 शौचालय श्रीमंतांच्या टॉयलेटपेक्षाही लहान घरं. जिथून रस्ता जातो, तिथं उंबरा आहे. घरं सुरु होतं आणि सुरु झाल्याझाल्या संपतं. टॉयलेटपेक्षाही लहान घरात टॉयलेट कसं बांधायचं. म्हणून इथल्या लोकांना महापालिकेच्या शौचालयावरच अवलंबून राहावं लागतं. पण महापालिका म्हणते आमच्याकडेही जागा नाही म्हणून शौचालयं नाहीत. मग चिमुरड्या पोरांनी जीवघेणं कमोड शोधलं. लहान मुलं गटारीवर उभारलेल्या संरक्षक लोखंडी पाईपवर चढून, जीव धोक्यात घालून, अनोख्या कसरतीने शौच करतात.  इथलं वास्तव मांडण्यासाठी ही दृष्य पुरेशी आहेत. गर्दी आणि घाण असल्याने नाल्यावर जावं लागतं, असं ही मुलं सांगतात. रामगडचं वास्तव इतकं जळजळीत आहे की शौचालय नाही म्हणून इथल्या पोरांची लग्नही होत नाहीत. शौचालय नाही म्हणून मला मुलीने नकार दिला, असं इथल्या मुलाने सांगितलं, तर स्थळं येतात पण लग्न होत नाहीत. रामगडच्या सगळ्या पोरांचा हा प्रश्न आहे, असं मुला-मुलींच्या आई सांगतात. पण भाजप नगरसेविका सविता कांबळे यांना हे पटत नाही "हा विषय मांडणाऱ्यांनी मांडलाय. इतकी वर्षं राहिलीयत की, टॉयलेटच्या प्रश्नामुळे लग्न होत नाहीत असं नाही. त्यांचं बालपणही इथेच गेलंय", असं सविता कांबळे म्हणतात. विरोधक विचारताहेत जनतेनं तुम्हाला शतप्रतिशत दिलं. तुम्ही किती प्रतिशत दिलं हिशेब  द्या. इथले 6 नगरसेवक, आमदार, खासदार भाजपचे. किरीट सोमय्या या भागाचं नेतृत्त्व करतात, त्यांचा मुलगा नील हा नगरसेवक आहे, तर  राज्यात केंद्रात सत्ता भाजपची. मग सगळे मिळून मोदींचं स्वप्नं पूर्ण करू शकत नसतील तर हे दुर्दैव आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात हतबल जनतेचं आयुष्य मात्र डब्यात जातंय. "आमचे नेते सध्या सुट्टीवर गेलेत. पाच वर्षाच्या रजेवर गेलेत. ज्यावेळी निवडणूक येते, त्यावेळी ते येतात महिनाभर", असा तीव्र संताप इथल्या स्त्रिया व्यक्त करत आहेत. VIDEO:
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीवर पहिली कारवाई; प्रचंड लोकप्रियतेनंतर सोशल मीडियावर नेमकं काय घडलं?
कॉकरोच जनता पार्टीवर पहिली कारवाई; प्रचंड लोकप्रियतेनंतर सोशल मीडियावर नेमकं काय घडलं?
Raj Thackeray 2008 Railway Protest Case: 2008 च्या रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता; कोर्टाने निकाल देताच काय केलं?
2008 च्या रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता; कोर्टाने निकाल देताच काय केलं?
Bandra Railway Station Demolition: वांद्र्यात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडून दगडफेक; पोलिसांकडून 15 जणांना अटक
वांद्र्यात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडून दगडफेक; पोलिसांकडून 15 जणांना अटक

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, भारतात येऊन नोकरी करावी, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Embed widget