एक्स्प्लोर

Mumbai News : महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर हलवण्याचा प्रस्ताव विचाराधीन

Mahalaxmi Race Course : महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क तयार करण्याचे प्रयत्न सुरु झाले असतील तर महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर हलवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Mahalaxmi Race Course : मुंबईतील (Mumbai) महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalaxmi Race Course) मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर (Mulund Dumping Ground) हलवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं समोर येत आहे. मात्र खाजगी जागा संपादित करुन जर रेसकोर्स मुलुंडला हलवला जात असेल तर त्याला शिवसेना ठाकरे गट (Thackeray Group) त्याला विरोध करणार आहे. रेसकोर्स हा सरकारी जागेवरच व्हावा, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क (Theme Park) तयार करण्याचे प्रयत्न सुरु झाले असतील तर महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर हलवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मुलुंड डम्पिंग ग्राऊंडचा परिसर साधारणपणे 24 हेक्टर इतका आहे. इथे रेसकोर्स हलवण्यासाठी मुलुंडचं डम्पिंग ग्राऊंड आणि त्याच्या शेजारील खासगी मालकीची जागा रेसकोर्स आणि इतर सुविधांना सामावून घेण्यासाठी पुरेशी आहे. 

बीएमसीला बाजारभावानुसार जमीन विकत घ्यावी लागणार

तसंच, खासगी जमीन संपादित करण्यासाठी बीएमसीला मोठी किंमत मोजावी लागेल कारण ती जागा सध्याच्या बाजारभावानुसार विकत घ्यावी लागेल. महालक्ष्मी रेसकोर्स मुलुंड इथे स्थलांतरित करण्यासाठी बीएमसीला खासगी जमीन संपादित करावी लागेल. नंतर ती मुलुंड डम्पिंग ग्राऊंडशी जोडावी लागेल. खाजगी जमीन खरेदी करुन ती रेसकोर्ससाठी सुपूर्द करणे शक्य होणार नाही. रेसकोर्स चालवणे हा सार्वजनिक उद्देश नसल्यामुळे, खाजगी जमीन खरेदी करण्यासाठी सार्वजनिक पैसा खर्च करण्यास विरोध होऊ शकतो

ठाकरे गटाचा विरोध 

शिवसेना ठाकरे गटाने हा रेसकोर्स मुलुंडला हलवला जात असेल आणि त्यासाठी जर खाजगी जागा संपादित केली जात असेल आणि त्यासाठी जर पैसे मोजले असतील तर त्याला विरोध दर्शवला आहे. रेसकोर्स हा सरकारी जागेवरच व्हावा, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे.

थीम पार्कसाठी महालक्ष्मी रेसकोर्सचा संपूर्ण भूखंड मिळावा, बीएमसी सरकारला पत्र पाठवणार

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्समधील जागेवर थीम पार्क साकारण्यासाठी संपूर्ण भूखंडा मिळावा, यासाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) पुन्हा एकदा राज्य सरकारला (Maharashtra Government) पत्र पाठवणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत काल (6 जानेवारी) झालेल्या मुंबई सुशोभीकरण आढावा बैठकीत पुन्हा एकदा या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. महालक्ष्मी रेसकोर्समधील जागेवर थीम पार्क साकारण्यासाठी रेसकोर्समधील जमिनीची मालकी मुंबई महापालिकेला मिळावी, अशी मागणी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात करण्यात येणार आहे.

संबंधित बातमी

Mumbai News : थीम पार्कसाठी महालक्ष्मी रेसकोर्सचा संपूर्ण भूखंड मिळावा यासाठी बीएमसी सरकारला पत्र लिहिणार

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget