एक्स्प्लोर

राणीबागेतील कामांच्या  कंत्राटाबाबत मंत्री अस्लम शेख यांचा दुसऱ्यांदा आक्षेप, पत्र लिहित म्हणाले...

राणी बागेतील कामाचे कंत्राट दोन ठराविक कंपन्यांनाच काम मिळावे म्हणून पायघड्या घालण्यात आल्याचा आरोप मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

मुंबई : राणीबागेतील कामांच्या कंत्राटाबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख  (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh) यांनी दुसऱ्यांदा पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे. राणीबागेतील प्राण्यांच्या अधिवास आणि पिंजरे बनवण्याच्या कामावरुन यापूर्वीही अस्लम शेख यांनी डिसेंबर 2021 मध्ये पत्र दिले होते. पहिल्या पत्रानंतर दीड महिना उलटल्यानंतरही मुंबई महापालिकेकडून उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी हे दुसरे पत्र लिहिले आहे.  

राणी बागेतील कामाचे कंत्राट दोन ठराविक कंपन्यांनाच काम मिळावे म्हणून पायघड्या घालण्यात आल्याचा आरोप अस्लम शेख यांनी केला आहे. याबरोबरच प्राण्यांचे पिंजरे आणि अधिवास तयार करणे या कामासाठी पालिका प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत. या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अस्लम शेख यांनी केला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल ( BMC Commissioner ) यांना पत्र लिहून या प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि स्कायवे इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपन्यांनी आधीच जिजामाता उद्यानातील कंत्राटे मिळवलेली असताना आता पुन्हा याच दोन कंपन्या पुढे आलेल्या असल्यामुळे संशय व्यक्त होत आहे. या निविदा प्रक्रियेत जाणून बुजून आंतरराष्ट्रीय पातळीवरून निविदा मागवण्यात आल्या नाहीत. पालिकेतील अधिकारी स्थानिक कंत्राटदारांसोबत असून प्राणीसंग्रहालयाचा जास्तीत जास्त अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना ठरवून दूर ठेवले जात असल्याचा आरोप अस्लम शेख यांनी केला आहे.

राणी बागेतील कामाची अंदाजित रक्कम काढण्यातही जाणूनबुजून घोळ केल्याचा आरोप अस्लम शेख यांनी आपल्या पत्रातून केला आहे.  याबरोबरच ही निविदा रद्द करून आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनर्निविदा मागवाव्यात अशीही मागणी शेख यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

OBC Empirical Data : ओबीसींच्या इम्पिरिकल डेटासाठी प्रश्नावली; महसूल विभागामार्फत माहिती गोळा करणार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget