एक्स्प्लोर

मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट, घाईत निर्णय घेता येणार नाही : सुभाष देसाई

‘आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकला पाहिजे. राणे समितीच्या अहवालानंतर आघाडी सरकारने मराठा आरक्षण दिलं, पण ते कोर्टात टिकलं नाही,’ असंही सुभाष देसाई म्हणाले.

मुंबई : ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट आहे, त्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. आरक्षणाचा निर्णय घाईघाईने करता येणार नाही,’ असं म्हणत शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकला पाहिजे. राणे समितीच्या अहवालानंतर आघाडी सरकारने मराठा आरक्षण दिलं, पण ते कोर्टात टिकलं नाही,’ असंही सुभाष देसाई म्हणाले. मराठा आरक्षणाचे आंदोलन राजकीय हेतूने सुरु नाही, मराठा समाजामध्येही गरीब वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळायला हवं, असं स्पष्टीकरण  सुभाष देसाईंनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संताप काही जणांचा वारीत साप सोडण्याचा कट होता, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने आंदोलकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. सापाबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांची आहे, मला त्याची माहिती नाही, असं म्हणत सुभाष देसाईंनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला आपलं समर्थन नसल्याचं स्पष्ट केलं.

महाराष्ट्र बंद

मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज  24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. तर उद्या मुंबई बंद करण्यात येणार आहे.

आज सकाळी 11 च्या सुमारास काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार झाले. लहान भाऊ अविनाश शिंदेने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

सकल मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात खबरदारी म्हणून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत.  बीडमधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदमुळे शहरातून एकही बस शहराबाहेर पडू शकलेली नाही. दररोज बीडमधून ये-जा करणाऱ्या 431 बस फेऱ्या आज बंद आहेत.  काही ठिकाणी टायर जाळण्यात आल्यानं एसटी महामंडळानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. यामुळे काही काळ सचखंड , परळी पॅसेंजर आणि हैद्राबाद पॅसेंजर ट्रेन रोखण्यात आली होती. रुळावर बसून आंदोलकांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या. उस्मानाबादमध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाने एकमतानं मराठा मोर्चाला पाठिंबा दिला. यासोबत नांदेडसह अनेक तालुक्यांमध्ये बंद पाळला जातोय.

बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन

अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. वारकरी पंढरपूरहून परत येत आहेत, त्यामुळे बस अडवू नका, बसचं नुकसान करु नये, असे आवाहन सुद्धा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे. तसेच,प्रशासनासह सर्व पक्षीय नेते आणि मराठा मोर्चा समन्वयकांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आणि असं टोकाचं पाऊन न उचलण्याचं आवाहन केलं आहे.

सरकारकडून मदत जाहीर

दरम्यान, सरकारकडून काकासाहेब शिंदे यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये आणि भावाला आठवडाभरात सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे.

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करून उपयोग होणार नाही. मंत्र्याच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. आज पंढरपूरमध्ये 7 लाख वारकरी अडकून आहेत.10 लाख काय 10 कोटी देऊन काकासाहेब शिंदेच्या कुटुंबाची भरपाई करता येणार नाही. बसेस फोडून आरक्षण मिळणार आहे काय? काही पेड लोक या आंदोलानात घुसली आहेत, त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे. निवडणूक काळात हे प्रकार वाढणार आहेत. पण आंदोलकांनी या पेड लोकांना खड्यासारखे बाजूला करावे – चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

औरंगाबादमध्ये आंदोलकाचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात एका मराठा आंदोलकानं गोदावरी नदीत उडी मारली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. काकासाहेब शिंदे असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आहे. काकासाहेब शिंदे याला मच्छीमारांनी नदीपात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोवर मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका मृत काकासाहेब शिंदेच्या भावानं घेतली आहे.

काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

औरंगाबादमधील मराठा आंदोलनकर्त्याच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुख व्यक्त केलं आहे. शिवाय मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

मृत काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला सर्वोतपरी मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुठलीही हिंसा किंवा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करु नये : संभाजीराजे

औरंगाबादमधील मराठा आंदोलकाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या भावना किती तीव्र आहेत हे मी समजू शकतो, असे संभाजीराजे म्हणाले.

तसेच, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना आवाहनही केले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, कुठलाही वेळ न दवडता त्यांनी आंदोलकांशी तातडीने चर्चा करावी. केवळ टीव्हीमध्ये आपली बाजू न सांगता मराठा समाजाच्या सर्व घटकांना सर्व नेत्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी वन-टू-वन चर्चा करावी. यासंदर्भात सरकारी पातळीवर जे जे शक्य आहे ते करण्यासाठी तातडीने मिटिंग बोलवावी.”

 

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई हादरलं! IIT बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, हॉस्टेलच्या थरकाप उडवणारी घटना, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई हादरलं! IIT बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, हॉस्टेलच्या थरकाप उडवणारी घटना, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Mumbai-Goa Highway: 17 वर्षे जुन्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात 48 टक्क्यांनी वाढ; प्रकल्पाचा खर्च तब्बल सुमारे 5500 कोटी रुपयांनी वाढला, RTI मधून धक्कादायक माहिती समोर
17 वर्षे जुन्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात 48 टक्क्यांनी वाढ; प्रकल्पाचा खर्च तब्बल सुमारे 5500 कोटी रुपयांनी वाढला, RTI मधून धक्कादायक माहिती समोर
Mumbai Crime News: नाशिकमधील पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं, 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ केलं अन्...; मुंबईतील दोन ज्येष्ठ नागरिकांना 1.63 कोटींचा गंडा
नाशिकमधील पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं, 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ केलं अन्...; मुंबईतील दोन ज्येष्ठ नागरिकांना 1.63 कोटींचा गंडा

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Embed widget