एक्स्प्लोर

मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट, घाईत निर्णय घेता येणार नाही : सुभाष देसाई

‘आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकला पाहिजे. राणे समितीच्या अहवालानंतर आघाडी सरकारने मराठा आरक्षण दिलं, पण ते कोर्टात टिकलं नाही,’ असंही सुभाष देसाई म्हणाले.

मुंबई : ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट आहे, त्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. आरक्षणाचा निर्णय घाईघाईने करता येणार नाही,’ असं म्हणत शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकला पाहिजे. राणे समितीच्या अहवालानंतर आघाडी सरकारने मराठा आरक्षण दिलं, पण ते कोर्टात टिकलं नाही,’ असंही सुभाष देसाई म्हणाले. मराठा आरक्षणाचे आंदोलन राजकीय हेतूने सुरु नाही, मराठा समाजामध्येही गरीब वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळायला हवं, असं स्पष्टीकरण  सुभाष देसाईंनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संताप काही जणांचा वारीत साप सोडण्याचा कट होता, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने आंदोलकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. सापाबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांची आहे, मला त्याची माहिती नाही, असं म्हणत सुभाष देसाईंनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला आपलं समर्थन नसल्याचं स्पष्ट केलं.

महाराष्ट्र बंद

मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज  24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. तर उद्या मुंबई बंद करण्यात येणार आहे.

आज सकाळी 11 च्या सुमारास काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार झाले. लहान भाऊ अविनाश शिंदेने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

सकल मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात खबरदारी म्हणून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत.  बीडमधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदमुळे शहरातून एकही बस शहराबाहेर पडू शकलेली नाही. दररोज बीडमधून ये-जा करणाऱ्या 431 बस फेऱ्या आज बंद आहेत.  काही ठिकाणी टायर जाळण्यात आल्यानं एसटी महामंडळानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. यामुळे काही काळ सचखंड , परळी पॅसेंजर आणि हैद्राबाद पॅसेंजर ट्रेन रोखण्यात आली होती. रुळावर बसून आंदोलकांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या. उस्मानाबादमध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाने एकमतानं मराठा मोर्चाला पाठिंबा दिला. यासोबत नांदेडसह अनेक तालुक्यांमध्ये बंद पाळला जातोय.

बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन

अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. वारकरी पंढरपूरहून परत येत आहेत, त्यामुळे बस अडवू नका, बसचं नुकसान करु नये, असे आवाहन सुद्धा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे. तसेच,प्रशासनासह सर्व पक्षीय नेते आणि मराठा मोर्चा समन्वयकांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आणि असं टोकाचं पाऊन न उचलण्याचं आवाहन केलं आहे.

सरकारकडून मदत जाहीर

दरम्यान, सरकारकडून काकासाहेब शिंदे यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये आणि भावाला आठवडाभरात सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे.

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करून उपयोग होणार नाही. मंत्र्याच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. आज पंढरपूरमध्ये 7 लाख वारकरी अडकून आहेत.10 लाख काय 10 कोटी देऊन काकासाहेब शिंदेच्या कुटुंबाची भरपाई करता येणार नाही. बसेस फोडून आरक्षण मिळणार आहे काय? काही पेड लोक या आंदोलानात घुसली आहेत, त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे. निवडणूक काळात हे प्रकार वाढणार आहेत. पण आंदोलकांनी या पेड लोकांना खड्यासारखे बाजूला करावे – चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

औरंगाबादमध्ये आंदोलकाचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात एका मराठा आंदोलकानं गोदावरी नदीत उडी मारली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. काकासाहेब शिंदे असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आहे. काकासाहेब शिंदे याला मच्छीमारांनी नदीपात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोवर मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका मृत काकासाहेब शिंदेच्या भावानं घेतली आहे.

काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

औरंगाबादमधील मराठा आंदोलनकर्त्याच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुख व्यक्त केलं आहे. शिवाय मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

मृत काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला सर्वोतपरी मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुठलीही हिंसा किंवा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करु नये : संभाजीराजे

औरंगाबादमधील मराठा आंदोलकाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या भावना किती तीव्र आहेत हे मी समजू शकतो, असे संभाजीराजे म्हणाले.

तसेच, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना आवाहनही केले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, कुठलाही वेळ न दवडता त्यांनी आंदोलकांशी तातडीने चर्चा करावी. केवळ टीव्हीमध्ये आपली बाजू न सांगता मराठा समाजाच्या सर्व घटकांना सर्व नेत्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी वन-टू-वन चर्चा करावी. यासंदर्भात सरकारी पातळीवर जे जे शक्य आहे ते करण्यासाठी तातडीने मिटिंग बोलवावी.”

 

महत्त्वाच्या बातम्या

ओमराजे इकडे एकनाथ शिंदेंच्या घरी; तिकडे धाराशिवमधील कार्यालयावरुन मशाल अन् ठाकरें नाव काढलं
ओमराजे इकडे एकनाथ शिंदेंच्या घरी; तिकडे धाराशिवमधील कार्यालयावरुन मशाल अन् ठाकरें नाव काढलं
आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या
आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या
Omraje Nimbalkar and Eknath Shinde: ठाकरेंचे आमदार ओमराजेंच्या घरी पोहोचताच एकनाथ शिंदेंची गुप्तचर यंत्रणा अलर्ट, बिल्डिंगबाहेरुन लगेच नंदनवन बंगल्यावर फोन फिरवला, बाणेरमध्ये मध्यरात्री काय घडलंय?
ठाकरेंचे आमदार ओमराजेंच्या घरी पोहोचताच एकनाथ शिंदेंची गुप्तचर यंत्रणा अलर्ट, बिल्डिंगबाहेरुन लगेच नंदनवन बंगल्यावर फोन फिरवला, बाणेरमध्ये मध्यरात्री काय घडलंय?
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं

व्हिडीओ

Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
Rahul Patil : ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीला चार आमदार गैरहजर, परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी अनुपस्थितीबाबत कारण सांगितलं, म्हणाले...
परभणीत मतमोजणी होती त्यामुळं आमदारांच्या बैठकीला गैरहजर, आमदार राहुल पाटील यांनी थेट कारण सांगून टाकलं...
Shivsena : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं
नाशिकमध्ये निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट; गोकुळ गितेंना एकनाथ शिंदेंचा फोन, आमदार मुंबईकडे रवाना
नाशिकमध्ये निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट; गोकुळ गितेंना एकनाथ शिंदेंचा फोन, आमदार मुंबईकडे रवाना
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला
सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला
Keir Starmer: अखेर राजकीय भूकंप झालाच, इंग्लंडच्या पंतप्रधानांचा थेट राजीनामा; 10 वर्षात सहाव्या पंतप्रधानांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण नाहीच
अखेर राजकीय भूकंप झालाच, इंग्लंडच्या पंतप्रधानांचा थेट राजीनामा; 10 वर्षात सहाव्या पंतप्रधानांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण नाहीच
Embed widget