![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Majha Maharashtra Majha Vision 2020 | भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? नितीन गडकरी म्हणतात...
राज्यातील आणि देशातील कोरोनाच्या संकंटाबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, कोरोनाचं संकट आज जगावर आहे. या संकटाचा सामना हिमतीने करण्याची गरज आहे.
![Majha Maharashtra Majha Vision 2020 | भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? नितीन गडकरी म्हणतात... majha maharashtra majha vision 2020 Union minister nitin gadkari interview Majha Maharashtra Majha Vision 2020 | भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? नितीन गडकरी म्हणतात...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/01015310/Nitin-Gadkari.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, राजकारणात कोण कुणासोबत जातं त्यावरुन मी माझी निष्ठा बदलणार नाही. राजकारणात मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खुप काही शिकायला मिळायला.. त्यामुळे शिवसेनेने कुणाशी युती केली, कुणासोबत युती नाही केली, याच्याशी आमचा काही संबंध नाही. बाळासाहेबांचं स्थान कालही, आजही आणि उद्याही हृदयात राहील. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही मी काम केलं आहे. माझे राज्यातील विविध पक्षातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहे. मी राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे ठेवतो. उद्धव ठाकरेंसोबत माझं नेहमी बोलणं होतं. मात्र राज्यातील राजकारणात आणि पक्षात माझी सध्या काही भूमिका नाही. मी सध्या दिल्लीत काम करतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय होतं, याबाबत राज्यातील नेते निर्णय घेतात. राज्यातील राजकीय निर्णयांवर राज्यातील निर्णय देऊ शकतील, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.
लॉकडाऊन करणे उपाय नाही
राज्यातील आणि देशातील कोरोनाच्या संकंटाबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, कोरोनाचं संकट आज जगावर आहे. या संकटाचा सामना हिमतीने करण्याची गरज आहे. कोरोनासोबत जगण्यासाठी सकारात्मक आणि आत्मविश्वास सगळीकडे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मात्र लॉकडाऊन सुरु ठेवणे बंद केलं पाहिजे. आज लॉकडाऊनमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावाचे नियम पाळून आपण जनजीवन सुरळीत केलं पाहीजे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होत आहे.
इतर बातम्या
- Majha Maharashtra Majha Vision 2020 | शटडाऊन, लॉकडाऊन नको; आता सगळं सुरु करा : राज ठाकरे
- Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)