एक्स्प्लोर

महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण गरजेचं, लस पुरवठ्यासाठी राज्याला केंद्राची साथ हवी; राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

राज्यात 100 टक्के लोकांचं लसीकरण लवकरात लवकर करायला हवं, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केलं आहे. तसंच "राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करु द्याव्या. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचं असेल तर 100 टक्के लसीकरणाची गरज असल्याचं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. राज ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्री मोदी यांना पत्र लिहून केंद्राची मदत मागितली आहे. राज्यातील सर्व वयोगटातील 100 टक्के लोकांचं लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा असावा म्हणून राज्याला आवश्यक पावलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी," असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

स्थानिक परिस्थितीला अनुसरुन उपाययोजना आखण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन द्या
"महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती सर्वात बिकट आहे. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणं, लॉकडाऊन जाहीर करणं महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे या संसर्गाला तोंड द्यायचं असेल तर 100 टक्के लसीकरणाची गरज आहे. यासाठी कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी राज्याला केंद्राची साथ हवी आहे," असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच "आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही तर स्थानिक परिस्थितीला अनुसरुन योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहनच द्यावं," अशी विनंतीही केली.

राज ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केलेल्या प्रमुख मागण्या
"राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करु द्याव्या. हाफकिन आणि हिंदुस्तान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.


महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण गरजेचं, लस पुरवठ्यासाठी राज्याला केंद्राची साथ हवी; राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र


महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण गरजेचं, लस पुरवठ्यासाठी राज्याला केंद्राची साथ हवी; राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

राज ठाकरे यांचं पत्र

"गेल्या वर्षी कोविड-19 ची साथ सुरु झाल्यापासून महाराष्ट्र राज्याला या साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्रात निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यू देखील झाले आहेत. आज सारा देश कोविड-19च्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट आहे.

कोविड-19 ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभर पडलेले आपण अजूनही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?

या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर 100 टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आणि कळीची आहे.

महाराष्ट्राला 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून राज्यातील सर्व वयोगटातील 100 टक्के लोकांचं लसीकरण लवकरात लवकर करायला हवं.

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राची साथ तर हवीच 

म्हणून माझी केंद्राकडे मागणी आहे की

- राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करु द्याव्या

- राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात

- 'सीरम'ला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियमन करुन लस विक्रीची परवानगी द्यावी

- लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (हाफकिन आणि हिंदुस्तान अँटिबायोटिक लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी

- कोविड-19 रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी

कोविड-19 च्या साथीमुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहे. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही तर स्थानिक परिस्थितीला अनुसरुन योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहनच द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, ज्यातून एकमेकांना शिकण्याती संधीही मिळेल.

या सर्व सूचनांकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहाल आणि प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा नव्हे खात्रीच आहे.

जय हिंद, जय महाराष्ट्र

आपला नम्र
राज ठाकरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
Zodiac Personality: 'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती 
मार्च 2024 मध्ये निवडणूक आयोगात दाखल, वर्षभरात मुख्य निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार कोण आहेत?
Chhaava Box Office Collection Day 4: शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?
शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाहीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025Gyanesh Kumar New Election Commissioner Of India :  ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
Zodiac Personality: 'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती 
मार्च 2024 मध्ये निवडणूक आयोगात दाखल, वर्षभरात मुख्य निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार कोण आहेत?
Chhaava Box Office Collection Day 4: शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?
शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
Atul Kulkarni Poem:
"लोक चिरडले जातात... लोकांची प्रेतं बनतात..."; अतुल कुलकर्णींनी रचलेली नवी कविता 'लोक-मताची डुबकी'
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.