एक्स्प्लोर

“मुलाची फी मी भरतो, पण त्याचं शिक्षण थांबवू नका”

मुंबई : आपल्या न्याय्य हक्कांची मागणी करत कोर्टाची पायरी चढणाऱ्यांच्या मनात न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढवणारी घटना आहे. अठराविश्व दरिद्र्य मात्र तरीही शिक्षणाची महती जाणून आपल्या मुलांना शिकवण्याचा निश्चय एका मातेनं केला. मात्र फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळेत अॅडमिशन न मिळालेल्या एका मुलाची फी भरण्याची तयारी खुद्द हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दाखवली आहे.   आपल्या बहिणींसोबत शाळेत जायला मिळणार या आनंदात 4 वर्षांचा गोलू उर्फ कार्तिक कनोजिया फार उत्साहित आहे. पण अनंत अडचणीसमोर असतानाही, त्याच्या आईच्या डोळ्यातील समाधान आपल्याला खूप काही शिकवून जातं.   शाळेत दाखला घेताना भरण्यासाठी फी चे पैसे नाहीत म्हणून अॅडमिशन नाकारणाऱ्या शाळेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची हिम्मत या माऊलनी दाखवली आणि हे प्रकरण समोर येताच मुंबई हायकोर्टातील सध्याचे सर्वात जेष्ठ न्यायाधीश विद्यासागर कानडे यांनी स्वत:हून पुढाकार घेत या मुलाच्या अॅडमिशनसाठी लागणारे साडे दहा हजार रुपये भरण्याची तयारी दाखवली.   6 महिन्यांची गरोदर असताना पतीचा मृत्यू   चेंबूरच्या टिळक नगर परिसरात 6 बाय 4 च्या दुकानवजा घरात रिटा कनोजिया आपल्या 3 मुलांसह राहते. इस्त्रीचा व्यवसाय करणाऱ्या रिटाच्या पतीच 2 वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे निधन झालं आणि कुटुंबाची सारी जबाबदारी एकट्या रिटावर येऊन पडली. पतीच्या निधनाच्यावेळी रिटा 6 महिन्यांची गरोदर होती. तशा अवस्थेतही तिने बाळाला जन्म दिला. मात्र सततच्या आजारपणामुळे काही महिन्यांतच ते बाळ दगावलं. मात्र, खचून न जाता रिटानं आपल्या 2 मुलींसह छोट्या कार्तिकलाही शिकवण्याच शिवधनुष्य पेलण्याच ठरवलं.   घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळेन मुलाच्या अॅडमिशनसाठी 30 हजार रुपयांचा खर्च सांगितला. ज्यात 19 हजार 500 हा शाळेच्या इमारतीसाठीचा खर्च तर 10 हजार 500 शाळेची फी असल्याचं स्पष्ट केलं. एवढे पैसे भरू शकत नसल्याने यामध्ये सवलत द्यावी, अथवा थोडे थोडे करून पैसे भरण्याची मुभा द्यावी अशी विनंतीही त्यांनी केली मात्र शाळेन त्यास नकार दिला.   अॅडमिशन फी मी भरेन, पण त्याचं शिक्षण थांबवू नका: न्या. कानडे   अखेरीस रिटा यांनी अॅड. प्रकाश वाघ यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली व इमारत बांधकाम निधीतून वगळावे, अशी मागणी केली. जस्टिस व्ही एम कानडे व जस्टिस एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांची मागणी हायकोर्टाने मान्य केली मात्र तरीही फीचा प्रश्न होताच, तेव्हा कार्तिकचे प्रवेश शुल्क 10 हजार 500 रूपये आहे, ते शुल्क मी भरेन, पण मुलाचे शिक्षण थांबवू नका, असे जस्टिस विद्यासागर कानडे यांनी स्पष्ट केले.   इस्त्रीचा व्यवसाय, लोकांच्या घरांची धुणी-भांडी करून ती आपलं घर चालवते आहे. त्यामुळे तिला हा खर्च परवडण्यासारखा नाही. कार्तिकच्या दोन्ही बहिणी चेंबूर येथील टिळक नगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिकतात. कार्तिकलाही तिथे प्रवेश देण्यासाठी त्याच्या आईने अर्ज केला होता.   जस्टिस विद्यासागर कानडे यांचे हे निर्देश येताच पुढील सुनावणीच्यावेळी त्या शाळेने कार्तिक कनोजियाची पूर्ण फी माफ करत त्याला विनामुल्य शाळेत दाखला दिला आहे. हायकोर्टातील ज्येष्ठ न्यायाधीशांच्या या भूमिकेमुळे आपल्या होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांच्या मनात न्याय व्यवस्थेवरील विश्वास आणि आदर नक्कीच वाढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget