एक्स्प्लोर

Exclusive | भारताविरुद्ध अतिरेकी हल्ल्याचा सर्वात मोठा कट कसा रचला गेला?

दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. या आरोपींकडून आता महत्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबई : दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. या आरोपींकडून आता धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. भारतात हल्ला करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू होती. यासाठी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले ओसामा आणि जीशान बॉम्ब स्फोट घडवण्यासाठी लोकांना तयार करत होते. ज्यासाठी 2 ते अडीच किलो आरडीएक्स (RDX) त्यांनी मिळवलं होतं. तसच मुंबईतील अनीस इब्राहिमचा जवळचा हस्तगत जाम मोहम्मद शेख हा या अतिरेकींना लागणाऱ्या पैशापासून ते इतर सर्व साहित्य पोहचवत होता.

या दहशतवादी हल्ल्याची तयारी 6 महिन्यांपासून सुरू होती. मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये स्फोट घडवण्याची तयारी सुरु होती. पाकिस्तान आणि आयएसआय यासाठी दाऊदच्या गँगची मदत घेत होती. भारतामधील लोकांची निवड करुन त्यांच्याकडूनच हे स्फोट घडवून आणले जाणार होते.

जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया, ओसामा उर्फ सेमी, मुलचंद उर्फ संजू उर्फ लाला, झीशान कमर, मोहम्मद अबु बकर, मोहम्मद आमीर जावेद या सहा अतिरेक्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. यामध्ये ओसामा आणि झीशान यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन पंधरा दिवसांचं ट्रेनिंग घेतलं होतं तर मुंबईमध्ये राहणारा जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया याचा लॉजिस्टिकसाठी वापर केला जात होता.

Terrorist Arrested : भारतात स्फोट घडवण्याचा तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना अटक, दोघांचं पाकिस्तानात ट्रेनिंग

पाकिस्तानी लष्कराचे जब्बार आणि हमजा या दोन अधिकाऱ्यांनी ओसामा आणि झीशानसह इतर सोळा जणांना घातपाताची ट्रेनिंग दिली. तर ओसामा आणि झीशानने लोकांची नियुक्तीसुद्धा सुरू केली होती. आणि सर्वांच्या मागे होता पाकिस्तानमध्ये बसलेला त्यांचा हँडलर मुळात मुंबईतला मोहम्मद रहीमुद्दीन उर्फ बिट्टू.
 
मोहम्मद रहीमुद्दीन हा आधी अंडरवर्लड गँगस्टर होता जो दाऊदसाठी काम करायचा. दाऊदने त्याला आधी दुबई आणि नंतर पाकिस्तान इथं बोलावलं. पाकिस्तानमध्ये बसून बिट्टू मुंबईसह देशामध्ये अतिरेकी घातपात घडून आणण्यासाठी मुलांना अप्लाय सोबत जोडत असतो. अशी दोन मुलं होती समीर आणि झीशान, ज्यांना दिल्ली स्पेशल सेलनं अटक केली आहे.

समीर आणि झीशान यांना मुख्यकरून ब्रिज आणि रेल्वे ट्रॅक उडवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं. तसच नियुक्त करण्यात आलेल्या लोकांना ट्रेनिंग देण्याचं कामसुद्धा ओसामा आणि झीशननं सुरू केलं होतं. तर जान मोहम्मदवर स्फोट घढवण्यासाठी लागणारे पैसे, मोबाईल, सिम कार्ड, गाड्या, जे लोक या कटात सहभागी आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था. या सगळ्यांची जबाबदारी होती. तर जान मोहम्मद शेखला पाकिस्तानमधून मोहम्मद रहीमुद्दीन सर्व निर्देश देत होता. अनिस इब्राहिमच्या निर्देशावर जान मोहम्मद हा मोहम्मद रहिमुद्दिनकडून एका कॉलिंग ॲपद्वारे निर्देश द्यायचा.


हा सगळा कट कसा रचला जाणार होता?

  • सहा महिन्यांपूर्वी हा स्फोट घडवून आणण्यासाठी तयारी सुरु झाली होती.
  • यामध्ये दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेश हे मुख्य टार्गेट होते.
  • अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघांना बॉम्ब बनवण्याची जबाबदारी सोपवली होती.
  • तर स्फोटासाठी लागणारे पैसे, साहित्य आणि इतर गोष्टींची पूर्तता करण्याची जबाबदारी ही जाण मोहम्मदची होती.
  • यासाठी अडीच किलो RDX आणण्यात आले होते. हे RDX नेपाळ आणि राजस्थान बॉर्डरवरून आणण्यात आलं असावं.
  • RDX हे उत्तर प्रदेशमधून आणण्यात आले आणि तिथून असेम्बल करुन हे दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये विभागले जाणार होते.
  • उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली या शहरातील मुलांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
  • मुंबई आणि दिल्लीमध्ये सणासुदीच्या काळात तर उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांच्या काळात मोठा घातपात करण्याचा यांचा प्लान होता.

रेल्वे ट्रॅकवर स्फोट घडवण्यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्या कुठल्या याची माहिती या अतिरेक्यांकडून गोळी गोळा केली जात होती. जेणेकरून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकेल. तर मुंबईतील अनेक महत्त्वाची ठिकाणी अटकेत असलेल्या अतिरेक्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. तरी जान मोहम्मद हा मुंबई, कुर्ला, धारावी, ठाणे, मुंब्रा, भिवंडी येथील काही लोकांच्या संपर्कात होता. आता ही लोकं कोण होती ते स्लिपर सेल होती का? याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.

तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले अतिरेकी तपासात सहकार्य करत नसून तपास यंत्रणांची दिशाभूल करत आहेत. ज्यामुळे त्यांना समोरासमोर बसून चौकशी केली जाऊ शकते. मात्र, इतक्या मोठ्या कटात अजून काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यांचा शोध तपास यंत्रणा करत असून येणाऱ्या दिवसांमध्ये याप्रकरणी अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget